Skip to main content

राजकारण

फायली : एक दाबणे !

लेखक यकु यांनी मंगळवार, 03/04/2012 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक: मानस चक्रवर्ती, 'लूज कॅनन' या स्तंभातून हिंदुस्तान टाइम्स, दि. 01.03.2012 http://paper.hindustantimes.com/epaper/viewer.aspx भारतात पुकारलेल्या आणीबाणीचे रेकॉर्ड पंतप्रधान कार्यालयातून गायब झाले आहे - भारत सरकार. -------------------------------------- जुन्या सरकारी कागदपत्रांचे रक्षण करणार्‍या सरकारी अधिकार्‍याची मी घेतलेली ही मुलाखत. याचे कार्यालयीन पद Librarian and Information Archives Registrar (LIAR) आहे. मी: ही एवढी महत्त्वाची कागदपत्रे अशी कशी सहज गायब होऊ शकतात?

आज की ताजा खबर ...ठाण्यात आनंद दिघे साहेब अवतरले ......

लेखक यशोधन वर्तक यांनी शनिवार, 10/03/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
धुळवडीची संध्याकाळ...सर्व जग रंगांत आणि बऱ्याच इतर गोष्टीनी रंगून जावून शांत झालेले . रस्त्या रस्त्या वर तुरळक वाहतूक . संसारिक आणि पेंशनर चेहेरे फक्त रस्त्यावर उरलेले....... अचानक जांभळी नाका तळपली जवळील शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याजव आनंद दिघे अवतरले. सुरुवातीला कोणाचच लक्ष त्यांच्याकडे गेले नाही . काही जुने जाणते शिवसैनिक ,असे की आता त्यांना कोणीही विचारात नाही तळ्याजवळ छत्रपतींच्या पुतळ्याची अवस्था पाहायला आले होते .आनंद दिघे साहेबाना पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. हा हा म्हणता त्यांच्या भोवती गर्दी जमली . दिघे साहेब नेहमीच्या सवयीने पाई चालत आनंद आश्रमाच्या दिशेने निघाले..

Social Networking वरील निर्बंध....

लेखक अमितसांगली यांनी सोमवार, 27/02/2012 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
सरकार करे वो चमत्कार और जनता करे तो बलात्कार.... इंटरनेट विश्वात आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल अक्षेपार्ह प्रसिद्ध झाल्यामुळे केंद्र सरकारने गुगल, याहू, फेसबुक यांच्याविरुद्ध कडक धोरण अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. 'सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या वादग्रस्त मजकुरासंबंधी गूगल व फेसबुक या संकेतस्थळांनी योग्य काळजी घ्यायला हवी.

INDIA UNBOUND

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 25/02/2012 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहास आपण सगळेच शिकतो. इतिहासाची शालेय पुस्तके असो वा कोणा अभ्यासकाने कागदपत्रे मिळवून लिहीलेला राजकीय इतिहास असो, क्वचितच त्यातून सामान्य माणसाच्या आयुष्यावरचा परिणाम दिसतो. त्यामुळे इतिहासावरून एक सामान्य माणूस म्हणून काय शिकायचे असाच प्रश्न पडतो. संपूर्ण शाळेत आणि इतर अवांतर वाचनात भारताचा इतिहास मी वाचला. एक निसर्गसंपन्न, संस्कृतीचे पाळणाघर असलेला आणि तत्त्वज्ञानाचा गाभारा असलेला देश म्हणून भारताच्या उज्ज्वल भूतकाळाचा उदोउदो वाचला, इंग्रजांची तथाकथित जुलमी राजवट आणि त्याविरुद्ध दिलेला तेजस्वी लढा, मोठमोठे तत्त्वनिष्ठ नेते आणि क्रांतिकारक यांचे बलिदान हे सगळं वाचलं.

गुन्हेगारीचे राजकीयकरण ....

लेखक यशोधन वर्तक यांनी बुधवार, 22/02/2012 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
आयबीएन लोकमत वाहिनी वर प्रसारित झालेल्या " आजचा सवाल " या कार्यक्रमात ...राजकारणाचे गुन्हेगारीकरण या विषयावर चर्चा झाली. राजकीय पक्षाचे प्रमुख आणि जबाबदार पदाधिकारी गुन्हेगारांना निवडणुकीची तिकिटे का देतात नेते आणि उमेदवार गुंडांची मदत का घेतात किंवा घेतात की नाही ? असा साधारण चर्चेचा विषय होता . ही चर्चा बघताना आणि ऐकताना ..." सिंघम " सिनेमा बघताना जितकी करमणूक झाली नाही तेवढी करमणूक झाली. अनेक पक्षांचे नेते येवून गुंडांना निवडणूक लढवण्यापासून कसे रोखता येईल त्याची उपाययोजना करण्याच्या गप्पा मारत होते.

' सच्या दिलाचा राजा '

लेखक रामकुमार यांनी मंगळवार, 21/02/2012 02:41 या दिवशी प्रकाशित केले.
' सच्या दिलाचा राजा ' हातावर बसलेली माशी जशी पटकन आपण उडवावी तशीच माझ्या अंगावरील पांघरुणे मी उडवली कारण आज होता; निवडणुकीचा निकाल या धावपळीत दिवस गेला. मावळत्या दिशेला पाहिलं तर दिवस कासराभर राहिला होता. पाहता - पाहता अजगराने जसा बेडूक गिळावा तसा अंधाराने दिवस गीळाला. मी माझ्या वाड्यात आलो तर सर्व वाडा चीडीचाप स्मशान शांतता. एरवी असणाऱ्या दिवसात आणि आजच्या असणाऱ्या दिवसात जमीन आसमानाचा फरक होता हे पाहुन मला काही वेळ करंट बसल्यासारखे झ|ले असा का ?