Skip to main content

राजकारण

आय आय टी रामैय्या

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी मंगळवार, 17/04/2012 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
पंचवीस-सव्वीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे आपल्या जवळच्याच आंध्रप्रदेशातली. तेलंगणातल्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना गणित शिकवत आयुष्य घालवलेला चुक्का रामैय्या नावाचा एक हाडाचा शिक्षक होता. शिक्षकी पेशा एक व्रत म्हणुन स्विकारण्यापुर्वी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेला, गांधींजींच्या सत्याग्रह आंदोलनात तुरूंगवास भोगलेला एक देशभक्त! वारंगळमधल्या आपल्या गुडुर या मुळगावी अस्पृश्यता विरोधी चळवळ चालवून आपल्याच ब्राम्हण समाजातून वाळीत टाकल्या गेलेला एक पुरोगामी विचाराचा माणुस.

सॅम पित्रोडा नवे राष्ट्रपती?

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 08/04/2012 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
फोन ही हल्ली अन्न, वस्त्र, निवारा आणि विज यानंतरची पाचवी मुलभुत गरज बनली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुरध्वनी जर कुठे उपलब्ध असेल, तर तो भारतात असं म्हणतात. अवघ्या काही वर्षांपुर्वी मात्र हे असं मुळीच नव्हतं. आपल्यापैकी अनेकांना ट्रंक कॉल लावून तासनतास वाट बघत बसण्याचे दिवस चांगलेच आठवत असतील. ट्रींग ट्रींग करणारा काळा फोनही अनेकांच्या अगदी स्पष्ट स्मरणात असेल. तारेपासुन ते ब्रॉडबॅण्डपर्यंत दुरसंचार क्षेत्रात अगदी तासातासागणीक होणा-या या प्रगतीला सत्यनारायण गंगाराम पांचाल नावाचा एक माणुस जबाबदार आहे, असं सांगीतलं तर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही.

फायली : एक दाबणे !

लेखक यकु यांनी मंगळवार, 03/04/2012 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक: मानस चक्रवर्ती, 'लूज कॅनन' या स्तंभातून हिंदुस्तान टाइम्स, दि. 01.03.2012 http://paper.hindustantimes.com/epaper/viewer.aspx भारतात पुकारलेल्या आणीबाणीचे रेकॉर्ड पंतप्रधान कार्यालयातून गायब झाले आहे - भारत सरकार. -------------------------------------- जुन्या सरकारी कागदपत्रांचे रक्षण करणार्‍या सरकारी अधिकार्‍याची मी घेतलेली ही मुलाखत. याचे कार्यालयीन पद Librarian and Information Archives Registrar (LIAR) आहे. मी: ही एवढी महत्त्वाची कागदपत्रे अशी कशी सहज गायब होऊ शकतात?

आज की ताजा खबर ...ठाण्यात आनंद दिघे साहेब अवतरले ......

लेखक यशोधन वर्तक यांनी शनिवार, 10/03/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
धुळवडीची संध्याकाळ...सर्व जग रंगांत आणि बऱ्याच इतर गोष्टीनी रंगून जावून शांत झालेले . रस्त्या रस्त्या वर तुरळक वाहतूक . संसारिक आणि पेंशनर चेहेरे फक्त रस्त्यावर उरलेले....... अचानक जांभळी नाका तळपली जवळील शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याजव आनंद दिघे अवतरले. सुरुवातीला कोणाचच लक्ष त्यांच्याकडे गेले नाही . काही जुने जाणते शिवसैनिक ,असे की आता त्यांना कोणीही विचारात नाही तळ्याजवळ छत्रपतींच्या पुतळ्याची अवस्था पाहायला आले होते .आनंद दिघे साहेबाना पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. हा हा म्हणता त्यांच्या भोवती गर्दी जमली . दिघे साहेब नेहमीच्या सवयीने पाई चालत आनंद आश्रमाच्या दिशेने निघाले..

Social Networking वरील निर्बंध....

लेखक अमितसांगली यांनी सोमवार, 27/02/2012 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
सरकार करे वो चमत्कार और जनता करे तो बलात्कार.... इंटरनेट विश्वात आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल अक्षेपार्ह प्रसिद्ध झाल्यामुळे केंद्र सरकारने गुगल, याहू, फेसबुक यांच्याविरुद्ध कडक धोरण अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. 'सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या वादग्रस्त मजकुरासंबंधी गूगल व फेसबुक या संकेतस्थळांनी योग्य काळजी घ्यायला हवी.

INDIA UNBOUND

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 25/02/2012 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहास आपण सगळेच शिकतो. इतिहासाची शालेय पुस्तके असो वा कोणा अभ्यासकाने कागदपत्रे मिळवून लिहीलेला राजकीय इतिहास असो, क्वचितच त्यातून सामान्य माणसाच्या आयुष्यावरचा परिणाम दिसतो. त्यामुळे इतिहासावरून एक सामान्य माणूस म्हणून काय शिकायचे असाच प्रश्न पडतो. संपूर्ण शाळेत आणि इतर अवांतर वाचनात भारताचा इतिहास मी वाचला. एक निसर्गसंपन्न, संस्कृतीचे पाळणाघर असलेला आणि तत्त्वज्ञानाचा गाभारा असलेला देश म्हणून भारताच्या उज्ज्वल भूतकाळाचा उदोउदो वाचला, इंग्रजांची तथाकथित जुलमी राजवट आणि त्याविरुद्ध दिलेला तेजस्वी लढा, मोठमोठे तत्त्वनिष्ठ नेते आणि क्रांतिकारक यांचे बलिदान हे सगळं वाचलं.