Skip to main content

राजकारण

जय हिन्द (१)

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 21/08/2012 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
१. ऑफिसला सकाळी बाहेर पडताच गेटबाहेर काही लोक वाट पहात उभे असलेले लोक कलेक्टरांना दिसले. हे आता सवयीचेच झाले होते. जेंव्हा जाऊ तेंव्हा हा कलेक्टर आपल्याला भेटतोच असा अनुभव आल्यामुळे वेळी अवेळी केंव्हाही लोक भेटत. त्यावर उपाय म्हणून मग कलेक्टर फक्त आपल्याच ऑफिसमध्ये बसण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग्ज घेत. म्हणजे मीटिंग्जनाही अडथळा नको, आणि लोकांनाही नाराज करायला नको. अ‍ॅडिशनल डीएमना ते सर्व अर्ज निवेदने गोळा करायला सांगत आणि नंतर स्वतः डोळ्यांखालून घालत.

राष्ट्रपतींचा दयाळूपणा -

लेखक विदेश यांनी रविवार, 19/08/2012 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
. नवीन मा. राष्ट्रपती "दयाळू" आहेत की नाहीत, हे मला माहित नाही. जुन्या मा. राष्ट्रपतीनी दयाळूपणा दाखवण्यात "उच्चांक" केला आहे, हे मला विविध माध्यमांद्वारे माहित झाले. आपल्या न्यायव्यवस्थेवर किती विश्वास ठेवावा, हे मला कळत नाही. खालचे न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय- ह्या तिन्ही न्यायालयांच्या न्यायमूर्तीनी "पूर्ण विचार करूनच" समोरच्या आरोपीला फाशीची शिक्षा दिलेली असणार ना ? असे असतांना, केवळ "दयेच्या अधिकारा"खाली मा. राष्ट्रपती सदर शिक्षा रद्द करण्याचा उच्चांक प्रस्थापित करून जातात- हे खरोखरच अनाकलनीय कोडे वाटते ! मा.

बेसुमार -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 14/08/2012 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
. उद्या आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन ! रोज आपण मारे बेंबीच्या देठापासून ओरडत आहोत.. भ्रष्टाचार - - बेसुमार महागाई -- बेसुमार भाववाढ - - बेसुमार वाहने -- बेसुमार लोकसंख्या - - बेसुमार अनाधिकृत बांधकामे -- बेसुमार घुसखोर -- -बेसुमार रोगी, व्यसनी, कुपोषित -- बेसुमार रस्त्यात खड्डे .. ! ! ! आता आपल्या देशाला स्वतंत्र होऊन इतकी वर्षे लोटली .. "बेसुमार" म्हणून ओरडणारे.. मतदानाच्यावेळीच आपला "अबाधित मतदानाचा हक्क" विसरून - घरातच का बरे गप्प बसून रहातात - ? बेसुमारीला बराचसा आळा घालणे, आपल्या बोटाच्या शाईवर अवलंबून आहे - असे मला तरी वाटते . तुम्हाला ? ? ? .

ज्यां दूधकि नदियां बाहे...

लेखक आळश्यांचा राजा यांनी शनिवार, 11/08/2012 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
१९७६ साली, म्हणजे माझ्या जन्माच्या जवळपास प्रदर्शित झालेला "मंथन" मी आजवर पाहिला नव्हता. मला आता राहून राहून याचे आश्चर्य वाटतेय. म्हणजे गाजलेला प्रत्येक सिनेमा मी पाहिलेलाच आहे, किंवा पाहिलेला असायला हवा वगैरे काही मनात नाही; पण माझ्याच डोक्यात घोळत असलेल्या "प्रांतांच्या गोष्टीं" च्या अनेक बीजांपैकी एक जणू साकार होऊन चित्रपटरुपात आपल्या समोर येतंय असं वाटत राहिलं. म्हणून आश्चर्य. ही समीक्षा नाही. चित्रपट समजणे आणि तो समजाऊन सांगणे एवढी प्रगल्भता माझ्याकडे नाही. हे एक शेअरिंग आहे. चित्रपट गाजलेला तर आहेच.

Munich Massacre...

लेखक मोदक यांनी बुधवार, 08/08/2012 03:01 या दिवशी प्रकाशित केले.
3

वांग मराठवाडीची संघर्षगाथा...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 03/08/2012 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून. त्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे.

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह! - २

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 03/08/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावरचा मूळ धागा बिपिन कार्यकर्ते यांचा आहे. शीर्षक तेच घेऊन भाग दोन असे स्वरूप केले आहे. त्यासाठी त्यांची परवानगी घेतलेली नाही. त्याबद्दल क्षमस्व. काल मंत्रालयात बैठक झाली. पतंगराव कदम आणि रामराजे नाईक-निंबाळकर त्यावेळी होते. माझ्या मंत्रालयीन स्रोतांकडून मी त्या बैठकीसाठीच्या टिपणातील एक कागद मिळवला आहे. तो नुकताच हाती आला. हे एक कोष्टक आहे. जलसंपत्ती खात्याने तयार केलेले. ते जसेच्या तसे खाली देतोय. या संस्थळाच्या प्रत्येक सदस्याने त्या कोष्टकाचा आपापला अन्वयार्थ लावावा, येथे मांडावा. धरणग्रस्तांचे मुद्दे खरे-खोटे ठरवावेत. यानिमित्ताने तुमच्या मनात येणारे प्रश्न येथे उपस्थित करा.

चावडीवरच्या गप्पा - 'टोल'वाटोलवी

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 25/07/2012 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
अरे वा!, सामान्यांची, आम जनतेची काळजी घेणारे आहे कुणीतरी”, खणखणीत आणि अनुनासिक आवाजात बोलत घारूअण्णांनी चावडीवर हजेरी लावली. “काय झाले?”, कोणीतरी विचारले. “काय? आजकाल पेपर वाचायचा सोडून सकाळी सकाळी नातवासाठीच वापरता की काय?” घारूअण्णा एंट्रीलाच नाट लागल्यामुळे खवळले. “अरे त्या राजने, म्हणजे आजच्या तरुणाईच्या भाषेतल्या राजसाहेबांनी टोलवसूली विरूद्ध आवाज उठवला आहे, टोल भरू नका असा आदेश दिला आहे जनतेला”. घारूअण्णांचा तांबडा चेहेरा आनंदाने फुलून गेला होता. “चला!

(काऽऽय रेऽऽ देवाऽऽ)

लेखक रमताराम यांनी बुधवार, 25/07/2012 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
(कवि संदीप खरे यांची क्षमा मागून...) आता पुन्हा उपोषण होणार मग देश ढवळून निघणार मग बेदींना कंठ फुटणार मग मध्येच मोदी बोलणार मग जुनाच खेळ चालू होणार... काऽऽय रेऽऽ देवाऽऽ... मग जुन्या खेळात जुने खेळाडू पुन्हा एन्ट्री घेणार... मग सारीपाट मांडणार... मग मांडलेला सारीपाट काहींना पसंत नसणार... मग ते कुणीतरी ओरडणार मग अण्णा-मित्र असतील तर रडणार रामदेव बाबा असतील तर चिडणार मग नसतोच खेळलो तर बरं असं वाटणार आणि या सगळ्याशी आता प्रणवदांना काहीच घेण-देणं नसणार... काय रेऽऽ देऽऽवा मग त्याचवेळी लोकपाल विधेयकावर चर्चा चालू असणार... मग त्यात बेदी, केजरीवाल नि काँग्रेसचं कुणी असणार... मग त्याला अण्णांनी आप
काव्यरस