Skip to main content

राजकारण

शिवरात्र-नरहर कुरुंदकर...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 21/02/2012 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज मनात आलं,मी तर तात्विक अर्थानं काही धार्मिक उरलेलो नाही.त्यामुळे आज मी काही कुठे स्वतःसाठी शिवरात्री निमित्तानं स्वतः शंकराची पूजा उपासना वगैरे करायला बसणार नाही.पण असं असलं तरी व्यावहारिक अर्थानं अश्या दिवशी काही चांगलं करावं,असं वाटण्या इथपर्यंत मी धार्मिक आहेच...मग काय करायचं..? झटकन लक्षात आलं,की आपण जर का शिवरात्र या दिवसाचा एक चांगला अनुषंग मनात ठेवत आहोत.तर नरहर कुरुंदकरांच्या शिवरात्र या पुस्तकाची आपल्याला जमेल तशी ओळख का करवुन देऊ नये...? अलिकडेच सागर यांनी कुरुंदकरांचं एक पुस्तक वाचकां समोर ठेवलच आहे. तसाच माझाही हा एक अल्पमती प्रयत्न....

प्रत्यक्षातला 'मोहन भार्गव'...

लेखक विसुनाना यांनी शनिवार, 18/02/2012 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
आशुतोष गोवारीकरांच्या तुफान यशस्वी 'लगान' नंतर त्यांनी दुसर्‍या खानसाहेबांना घेऊन 'स्वदेश' नावाचा एक चित्रपट काढला. 'नासा'त काम करणारा मोहन भार्गव नामक एक तरूण शास्त्रज्ञ भारतात परततो. भारतातल्या 'कोडी' नामक खेड्यात एक पाणचक्कीवर चालणारे विद्युत जनित्र निर्माण करतो आणि त्या गावाला वीज मिळू लागते अशी काहीशी कथा. मुळात लोकांचा अशा स्वप्नवत कथेवर विश्वास बसला नसावा. त्यामुळे तो चित्रपट तितका यशस्वी झाला नाही. सांगण्याचं कारण हे की महाराष्ट्रात नुकत्याच शमलेल्या जि.प.

संसर्गजन्य जिवाणू

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 29/01/2012 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी एका माणसाच्या शरीरात नाकावाटे शिरलो. म्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा. कारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू.

कुत्री आणि टोळ

लेखक ए.चंद्रशेखर यांनी शुक्रवार, 27/01/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख लिहायला घेताना का कोण जाणे, मला लुई कॅरॉल (Lewis Carroll) हे टोपणनाव घेतलेल्या लेखकाने लिहिलेल्या 'ऍलिस इन वन्डरलॅन्ड' (Alice in Wonderland) या पुस्तकातल्या काही प्रसिद्ध पंक्तींची खूप आठवण येते आहे. या पंक्ती आहेत
"The time has come," the Walrus said, "To talk of many things: Of shoes--and ships--and sealing-wax-- Of cabbages--and kings-- And why the sea is boiling hot-- And whether pigs have wings."
एकमेकाशी काहीही संबध नसलेल्या अनेक गोष्टींचा या पंक्तींच्यात जो असंबद्ध मेळ घातलेला आहे त्याला बहुदा कोठेही तोड नसेल.

We The People of India....१

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 18/01/2012 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, येथे मिपावरती भारतीय राज्यघटनेवर काही माहितीपर लेखांची एक मालिका लिहायची असे बरेच दिवस आमच्या मनात जे होते त्याची आज आम्ही हा छोटेखानी प्रास्ताविक-लेख लिहून मुहुर्तमेढ करत आहोत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली १९४७ साली जी समिती स्थापन झाली होती त्या समितीने जवळजवळ अडीच ते तीन महिने अथक परिश्रम घेऊन भारतीय राज्यघटना तयार केली, जी आपण स्विकारली आणि अंगीकारली. ही भारतीय राज्यघटना म्हणजे केवळ एक कायद्याचे जाडजूड निर्जीव पुस्तक नव्हे, तर गीता, बायबल, कुराण यांच्या तोडीची आणि

आंदोलन आणि फलित

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 28/12/2011 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज काही कामानिमित्त बांद्रा कुर्ला संकुलात गेलो होतो. कामादरम्यान वेळ होता म्हणून १२ वाजण्याच्या सुमारास एमएमआरडीएच्या मैदानात चक्कर टाकली. आज अण्णा हजारे उपोषणस्थळी उपस्थित नव्हते. तुरळक गर्दी होती सुमारे दोन हजार लोकांची. मंचावरून बहुधा मनिष सिसोदिया यांचे भाषण चालू होते.

ब्रेक अप...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 27/12/2011 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझी अपेक्षापूर्ती न करणाऱ्या या अनामिक नात्याचा मला भयंकर कंटाळा आलाय बघ. तू म्हणशील पुरुष इथून तिथून सारखेच असतात, मलाही तसंच समज हवं तर. तुझे सारे आरोप अन् आक्षेप मला मान्य आहेत. हो, मीही पुरुष आहे. मीही तुझ्यावर प्रेम करतांना एकच अपेक्षा ठेवली होती. ती सुरुवातीला तू समरसून पूर्ण करीत गेलीस. परंतु आता काळ बदलला, आपण जरा समंजस झालो आहोत. तुला तुझे करियर घडवायचे आहे. तू आता मध्यावर आली आहेस. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. तू जीव तोडून काम करतेस, प्रसंगी ओव्हर टाईमलाही थांबतेस.

कधीकाळी झालेल्या कविता

लेखक यकु यांनी शुक्रवार, 23/12/2011 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकाळी झालेल्या कविता (1) वेळही अशी ती होती उगवती न फटफटलेली पक्षीही तुरळक जागे नुकतेच जरा फडफडले माणसे होऊन जागी चालली खाया वारा या शांत पहाट वेळी ती मला भेटते म्हटली आलीच पहा ती आली येताच तिला ओळखले मी मनात माझ्‍या गुपचूप सांगूच नको मी म्हटले ती बसली अगदी चुपचूप अशी दोघे गुपचूप बसता बोलणे खुंटले अ‍गदी पण बोलून काही ना येता ती कसली भेट म्हणावी सावरुन मी हे वदलो डोळ्यात तुला साठवण्‍या मी रात्र-पहाट ही केली पाहून घेऊ दे आता तुज सुंदर शांत सकाळी ते वस्त्र रंग गुलाबी मुखचंद्र अनावरण करता ह्रदयास हुडहूडी भरली नजरेस तिच्या त्या वरता बोलास काही ना सुचले ते मूक-मूक गल