नमस्कार मंडळी,
एकदा असाच मनात विचार आला, आपण काय जपुन ठेवतो बरं? पैसा? माणसं? सुखं? ईतर काही?
नाही.. मग काय? तर आठवणी. ज्या कायम सोबत राहतात, अगदी मरेपर्यंत. बाकी सगळं क्षणिक. नाही का?
**************************************************
आज नविनच लोकांना भेटलो, कधी विचारच काय तर कल्पना सुद्धा केली नव्हती. एका मित्राला भेटायला काय गेलो आणि एक नविन विश्व पाहुन आलो. शनिवार रात्र म्हणुन पार्टी चालु होती तिथे, नविन चेहरे, नविन लोकं, खरं तर मित्राला बरोबर घेउन लगेच निघायचे होते तिथुन पण हे लोकं एवढे आग्रही होते की मला तिथे तास दोन तास थांबायला भाग पडलं. पहिल्यांदाच मार्गारिटा प्याली, आवडली.