Skip to main content

राहणी

सुलभ शौचालय - अशोक नायगांवकरांची कविता

लेखक यकु यांनी बुधवार, 15/12/2010 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रोळीच्या संपतला मी म्हटले तु रूळावर काय शी करायला बसतोस? अरे केवढी मोठी गाडी आणि माणसे जातात या रूळावरून? तु संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोस? अरे सरळ शौलायात जावे सुसंकृतपणे तशी संपत म्हणाला - साहेब

खरंच stupid विचार करते का मी?

लेखक गुंडोपंत यांनी सोमवार, 06/12/2010 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
ही नैराश्यावर मात करण्याची लढाई कधी संपत नाही. नैराश्याचा विषाणू निरनिराळ्या प्रकारे वेष बदलून हल्ले करत राहतो. त्यासाठी निरनिराळे डावपेच लढवत रहावे लागतात. नैराश्य हा सर्वांनाच ग्रासणारा विषय आहे. पण तरुण वयात हा विषय आलेला दिसला की... माझी एक शेंडेफळ भाची आहे. बी एस सी बायो-टेक्नॉलॉजी करून आता एम सी ए करते आहे. ही मुलगी ठरवले की करणारी आहे, असे मी पाहतो आहे. पण कधी कधी तिला निराश वाटते. नुकत्याच एका परीक्षेनंतर तिने असे विचार प्रकट केले. त्यावर मी तिला उत्तर लिहिले. हे उत्तर लिहिल्यावर मला वाटले की कदाचित यातले काही भाग सगळ्यांनाच उपयोगी पडतील म्हणून ते येथे देतो आहे.

विकीलीक्समुळे उघडकीला आलेली खळबळजनक माहिती.

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 30/11/2010 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
वॉशिंग्टन - नुकत्याच विकीलीक्सवर गोपनीय कागदपत्रांच्या प्रसिद्धीमुळे अमेरिकेत खळबळ उडालेली आहे. अमेरिकेच्या गृहखात्याने या घटनेचा धिक्कार केलेला असून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा दावा केला आहे. तर विकीलीक्सच्या मते अमेरिकन सरकारने महत्त्वाच्या बातम्या गोपनीयतेची सबब सांगून जनतेपासून लपवून ठेवल्या होत्या. या एकमेकांवरच्या चिखलफेकीच्या वातावरणात त्या कागदपत्रांमधून बाहेर येणाऱ्या सत्यांमुळे अमेरिकन सरकारची परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे. आमच्या वार्ताहराने या कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर एक सनसनाटी बातमी हाती लागली. ती म्हणजे ३_१४ विक्षिप्त अदिती ऊर्फ श्री. श्री. सौ. सौ.

आमचा पाव - एक गाव

लेखक यकु यांनी सोमवार, 29/11/2010 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
पावात यायचं म्हणजे हा एक ताप असतो. म्हणजे इथं आलं की लवकर परत जावं वाटत नाही. तास उलटतात, दुपार होते. डबा खाऊन होतो, चारचा चहासुध्दा होतो आणि हळूहळू दिवस कलून दिवेही झगमगू लागतात. तरी पावातले सोहळे काही संपत नाहीत. अगदी रातच्या साडेतीन वाजताही एखादा पावकरी दूरवर पसरलेल्या नदीत अगदी संथपणे होडीत बसून माशांचे जाळे उसवत असावा तसा दिसून येतो. काही लोक थांबावं की जावं? थोडावेळ थांबूच, नको, नको गेलेलंच बरं म्हणून डुबी मारतात, आणि आणखी पाचदहा मिनीटात श्वास कोंडला की पुन्हा एकदा डोकं वर काढतात!

महाराष्ट्र दर्शन - भाग ४/ "पैठण"

लेखक स्पा यांनी गुरुवार, 25/11/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 भाग ३ - http://www.misalpav.com/node/15529 आजचा दिवस "पैठण" साठी राखून ठेवला होता...... सकाळी मस्त आराम केला... दुपारी २ वाजता MTDC चीच "तवेरा" न्यायला आली...... मागे एकदा मी पैठण ला जाऊन आलो होतो.... पण खूप लहान होतो त्यावेळी.... बाकी पैठण्या स्वस्तात मिळणार म्हणून " महिला मंडळ " आनंदात होतं. साधारण ४ च्या सुमारास पैठण ला पोहोचलो.

गुंजग्रामीचे दिवस

लेखक यकु यांनी मंगळवार, 23/11/2010 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी.

महाराष्ट्र दर्शन - भाग ३/ "वेरूळ "

लेखक स्पा यांनी सोमवार, 22/11/2010 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 अर्ध्या तासात वेरूळ आले सुद्धा ...... मला नुकतीच झोप लागली होती.... परत बस मधून उतरा.... तेसुद्धा १ च्या रणरणत्या उन्हात...... जीवावर आलं होत.... "पण" वेरूळ ला जाण्याचीच एवढी ओढ होती, कि बाकीचे त्रास त्यापुढे नगण्य वाटत होते..... एका मोठ्या "उद्यानासमोर" बस थांबली .......समोरच वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्या दिसत होत्या.... बघूनच मन "प्रसन्न" झालं.... आमच्या गाईड ची पीर पीर सुरु झाली . इथे एकूण ३४ लेण्या आहेत .

घाण्या वरचा बैल

लेखक रणजित चितळे यांनी सोमवार, 22/11/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
(ईयत्ता सहावीच्या कवीतेवर आधारीत) गोष्ट एका गावातली. तेलाची घाणी अन् त्यात कोलुवर फिरणारा बैल. बैलाच्या गळ्यातली वाजणारी घंटा म्हातोबाला दिलासा द्यायची. म्हातोबा शेजारच्या खोपट्यात आडवा पडलेला. त्याला त्या घंटेचा आराम. जो पर्यंत ती घंटा किणकिणायची तो पर्यंत सगळे व्यवस्थित चालले आहे ह्याची त्याला खात्री. मग तो खुशाल झोप काढायचा. जेव्हा बैलाला तहान भुक लागायची तेव्हा घंटा वाजायची थांबायची. ती थांबली की लागलीच एक बादली आंबोण त्याच्या पुढे तो घालायचा. त्याच वेळेस सुकं खोबरे घाणीच्या तोटीत आहे का पाहुन लागेल तसा नवा घाणा तयार करायचा. हे असे संध्याकाळ पर्यंत चालायचे.