Skip to main content

मुक्तक

ग्रीष्मोत्सव साजरा!

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 10/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
वसंतोत्सव नंतर ... वसंताने खो दिल्यावर ग्रीष्म चक्र उभे ठाकते.ग्रीष्म हा अवघडलेल्या अवस्थेसारखाच भासतो.

विस्कळखाईत कोसळताना

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 08/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
रेणुबंध होतील खिळखिळे खळकन् फुटतील ठाशीव साचे हादरून जातील स्तंभही तर्काच्या भक्कम इमल्यांचे गाभ्यातून जर्जर पृथ्वीच्या लाव्हारस येईल उधाणून अगणित जीवांचा कोलाहल उरेल भवतालाला कोंदून विस्कळखाईत कोसळताना असेच काही घडेल? किंवा, विज्ञानाचे ज्ञात नियम मग वागतील वेगळेच तेव्हा?
काव्यरस

कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 4)

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 06/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
पुढचा दिवस उजाडला. आज मामु चा दौरा होता. क्षणात अंतू बरवा आठवला. अक्षरशः भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था होती. चिपळूण मध्ये फक्त एक पेट्रोल पंप चालू होता. बाकी पेट्रोल पंप पाण्याखाली गेल्याने बंद होते. चिपळूण ला येणारे रस्ते , घाट बंद झाल्याने पेट्रोल चे टँकर पण 3 4 दिवस येत नव्हते. त्यामुळे 3 ते 4 तास रांगेत उभे राहून फक्त 50 रुपयाचे पेट्रोल मिळत होते. त्यातही चारचाकी साठी नाहीच. मदतीला शेजारील गावांतून गाड्या घेऊन यायचं तरी पंचाईत व्हाययाची वेळ यायची. मुख्य चिपळूण शहरात साफसफाई साठी पाणीच उपलब्ध नव्हते. पिण्यासाठी पॅक बाटल्या मदत म्हणून येत होत्या.

स्मरण चांदणे२

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 06/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण चांदणे२       दिवस कलत असताना,आता लवकरच सुर्यास्त होणार याची जाणीव होऊ लागते,तो होऊ नये अशी काहींची  ईच्छा असते. ते तर शक्य नसते.ते सकाळच्या आठवणीत रमतात.दिवस संपण्याच्या वास्तवाचे विस्मरण होते काही क्षण! बालपणाचे गोडवे अनेकांनी गायले आहेत. लहानपणी काही कळत नसते,म्हणून आपण सुखात असतो,निर्धास्तअसतो.आईवडिलांच्या ,मोठ्यांच्या छायेत सुरक्षित असतो.जीवनाच्या वास्तवापासून दूर,अज्ञानातला आनंद उपभोगत!     वय जसजसे  वाढत जाते तस तशा जबाबदा-या वाढत जातात.

कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 3)

लेखक मालविका यांनी मंगळवार, 03/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
23 जुलै ला पाणी बरचसं उतरलं होत पण अनेक ठिकाणी अजूनही साचून होत. काही ठिकाणी पाणी उतरलं असलं तरी चिखल, आडवी झालेली झाडे, विजेचे खांब, तारा इत्यादी मुले जाणे अशक्य होते. मित्राचे आई वडील होते त्या शंकरवाडीत हीच परिस्थिती होती. ते सुखरूप आहेत हे समजलं पण त्यांची भेट घडू शकली नाही. 2 दिवसात इन्व्हर्टर संपल्याने नेलेल्या मेणबत्त्या आणि कडेपेट्या उपयोगात आल्या. चिपळुणात निदान 3 4 दिवस लाईट येणार नाहीत हे समजून चुकलो होतो. उदयाला पाणी पूर्ण उतरेल आणि मग प्रत्यक्षात सगळीकडे कामाला सुरुवात होईल याचा अंदाज आला. भाऊ ज्याचं कापडाच दुकान होत, त्याच्या इथे देखील अजून ढोपर भर पाणी रस्त्यावर होत.

मी आणि कानयंत्र..

लेखक आजी यांनी सोमवार, 02/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर मी म्हातारी झाले. वय चोरुन बघितलं पण शरीर ऐकेना. अनेक वस्तू मला ॲक्सेसरीज् म्हणून गरजेच्या वाटू लागल्या. मला ऐकू येईनासं झालं. घरातला टीव्ही मी खूप मोठ्या आवाजात लावून बसू लागले. त्या आवाजाचा घरच्यांना त्रास होऊ लागला. गेले दीड वर्ष मुलाचं वर्क फ्रॉम होम होतं आणि नातवाची ऑनलाईन शाळा होती. मी आणि सूनबाई तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसायचो. टीव्ही वरील कोरोनाच्या आणि हे सरकार कोसळणार की पाच वर्षे टिकणार, याबद्दलच्या बातम्या कितीदा ऐकायच्या? मग मी टीव्हीवर मनोरंजक कार्यक्रम बघायची. मला ऐकू येत नाही म्हणून आवाज मोठा करायची. संवादच ऐकू आले नाहीत तर सिरीयल ची मजा ती काय हो?

कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 2)

लेखक मालविका यांनी सोमवार, 02/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
22 तारीख. सकाळी 10.30 ची भरती होऊन ओहोटी सुरू झाली. समुद्राच्या जवळ आणि खाडी असल्याने भरती ओहोटी च्या वेळी वाशिष्ठी मध्ये पण पाण्याचे चढ उतार नेहमी होत असतात. पाणी आता थोडं कमी होईल अशी आशा वाटत होती. पण डोळयांसमोर पावसाने भरलेले ढग दिसत होते. पाणी 2 फूट कमी झाल्याचे मेसेज आले. थोडं हायस वाटलं पण पाणी ज्या वेगात भरलं त्या वेगात कमी होत नव्हतं. खर तर ओहोटीच्या वेळी पाणी वेगाने उतारावरून धावत जावं तसं जात असत पण यावेळी बाहेर गेलेल्या पाण्याला आत घ्यायला नदी तयार नव्हती. त्यामुळे हे 2 फूट कमी झालेल पाणी फक्त एक खेळ होता हे लवकरच जाणवलं.

कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 1)

लेखक मालविका यांनी रविवार, 01/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
सुरवातीलाच सांगते मी पूरग्रस्त नाही, पुरामुळे माझं कोणतंही नुकसान झालेलं नाही.आधी अप्रत्यक्षपणे आणि पुरानंतर मी प्रत्यक्ष यात सहभागी होते आणि त्याचाच हा अनुभव. तर माझं गाव चिपळूण. दर पावसाळ्यात बाजारपेठेत पाणी भरणं ही अगदी वार्षिक कार्यक्रम असल्यासारखी गोष्ट. क्वचित थोडं कमी जास्त होत पाणी. पण त्यात विशेष वाटावं असं काही नाही इतकी त्याची सवय झालेली. आज मी 10 वर्षाच्या मुलाची आई आहे. मी जेव्हा पहिली दुसरी मध्ये होते तेव्हापासून मला आठवतंय त्याप्रमाणे पावसाळ्यात पाणी भरल्याची सुट्टी मिळायची किंवा अर्ध्यातुन शाळा सोडून द्यायचे.

मैत्रीणे भरली पोकळी!

लेखक Bhakti यांनी रविवार, 01/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
आशाबाई ,वय ६० आणि त्यांचे यजमान वय ६५ दोघेच गावाकडे राहत होते.यजमानांनी निवृत्तीनंतर गावाकडे बंगला बांधला होता.पहाटे उठावे,गावकडे शेतात जावे,आशाबाईनी सुग्रास जेवण बनवावे,रात्री लख्ख ताऱ्यात ईश्वराचे ध्यान करता निजावे.इतके सुंदर त्यांचे जीवन गेली दोन वर्षे चालू होते.

स्मरण चांदणे१

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 30/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण चांदणे १       दक्षिणेस पसरलेल्या छोट्या माळाच्या आड दडलेले गाव,म्हणून आडगाव.पाचवी पर्यंतचे शिक्षण गावी झाले. नंतरचे बीडला.त्या काळात,केव्हा सुट्टी मिळेल अन केव्हा गावी जाईन असे व्हायचे.शिक्षण संपून पुढे वकील,सरकारी वकील होतो तेव्हा ही ओढ कायमच होती.आई वडील गावी होते.तिथे आमचे घर होते.एकोणीसशे एकोण्णवदला वडील गेले. तिथले घर बंद झाले.बत्तीस वर्षे झाली.पण अजूनही गाव,तिथली देवळे ,उत्सव,जत्रा,माणसे अन ते दिवस,आठवतात. तिथल्या देवळांशी जोडलेले सण,उत्सव ,जत्रा आठवतात.