वसंतोत्सव
नंतर ...
वसंताने खो दिल्यावर ग्रीष्म चक्र उभे ठाकते.ग्रीष्म हा अवघडलेल्या अवस्थेसारखाच भासतो. शुष्कतेची जाणीव देणारा मधेच पावसाच्या सरी देऊन मोकळा होत जातो नाही का?ग्रीष्मातला उकाडा आता कडक जाणवत नाही, की वातानुकुलित यंत्राने तो हरवून गेला आहे.पण भव्य आकाशमंडपाखाली रुजू पाहणाऱ्या पालवीने आता हिरवाईचा बहरच धारण केलाय.पक्ष्यांची आता पिल्लांसाठी नवी घरटे बांधायची लगबग असते.वसंतात रुजलेला निसर्ग इवले इवले जीवांच पोषण पूर्ण होणार असते.
हिरवी पाती
गुलमोहर-बहावा वसंतवैभव पण ग्रीष्मात अशा अनेक वैभवाने सृष्टी न्हाऊन जाते.गच्च गच्च हिरव्या पानात लिली,जाई –जुई,चाफा विविधरंगी फुलांच्या राशी बागेमध्ये ओसांडत असतात.तर लोणची ,गुळांबा ,साखरांबा पदार्थ तयार करून यांची वर्षभरासाठी साठवणूक होते.गुळांब्याच महत्व ‘डायटवाल्या दिवेकर बाईंनीही’ मानले आहे व त्याचा आग्रह धरला आहे.
ज्येष्ठातल पुष्पवैभव स्त्रियांना पाहता याव म्हणुन ‘वटपौर्णिमा’ व्रत असावं.मान्सूनचे आगमन होताच हवेत गारवा भरला जातो.वाऱ्याचा तुफान वेग त्याच्याबरोबर पानाच्या सळसळीचा आवाज कानांत घुमतो. आषाढातले दिवस मेघांच दार अलगद उघडतात .सावळ्या मेघांची सैरभैर धावाधाव सुरु राहते .तासंतास समाधी लावून पहावे एव्हढे सुंदर आकाश या काळात दिसते.कालिदासाला देखील हे दूत भासले आणि मेघदूताची निर्मिती झाली.
पाऊस भावना कवितेत,लेखात,भटकंतीत,एका छत्रीत दोघांना आणि प्रत्येक मनाला चिंब करीत राहतात.त्याबरोबर चहाचे घोट आणखिण काय हवं?
तिथेच रानातल्या वनस्पती विज्ञान भाषेतील विड(weed) असलेल्या या वनस्पतींनी तर “खिलनेकी जिद पर अडी” करत अक्षरशःनिसर्गात तल्लीन होतात.सोनकी,तगर ,किरळ,टणटणी,वाघनख्या इत्यादी यांची फुले रानावनात फुललेली असतात.यातली काही औषधी असतात.
वाघ नखी
रानफुल १
रानफुल २
एरवी काट्यांनी सजलेला बाभळीचाही बहरही निराळच आनंद देतो. मागे मी बाभळीच्या बहरावर चार ओळी लिहिल्या होत्या,तो पर्यंत बाभळीचा बहर मी मन लावून पाहिलाच नव्हता,यंदा मन भरून अनुभवला:)
आणि बाभळ शोधता-अनुभवता
विठ्ठल नाम घेत भक्तीरसात वारकरी दिंडीत अखंड मार्गक्रमण करीत राहतो.अलैकिक शक्तीने वातावरण भारावून जाते.आषाढी एकादशीला विठूच्या पायी माथा टेकवत उभा महाराष्ट्र भरभराटीच साकड त्याला घालतो.हेच शक्ती सामर्थ्य गुरुपौर्णिमाला पूर्णानंद देते.
वरुणराजा बरसत बरसत थकत नाही.शेतातली पिक डोलत राहतात.
आषाढी अमावस्येला दीप अमावस्येचा मान देत ग्रीष्म वर्षा ऋतूला प्रकाशाचे देणे देतो.
-भक्ती
आषाढाच्या प्रथम दिनिं तया दिसे मेघ गिरिशिखरा
आलिंगुनिया रम्य, जणों गज तटा धडकतां झुकला
(अनुवाद : रा. प. सबनीस)
सावळा मेघ
बापट यांची ‘बाभूळझाड –एक सल’,इंदिरा संत यांची ‘बाभळी’ या कवितांचा आस्वाद मिळाला. यांनीही काट्यांमध्ये एक मनोहारी सोन बहर व्यक्त केलाय..
बाभुळमाय
वाचने
11464
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा !
वारा वारा धारा धारा सांगतसे
मस्त झालाय लेख.
कुमार,गोजिरा,प्रचेतस धन्यवाद.
छान लिहलंय !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatreललित वगैरे असणार
हा हा !
In reply to ललित वगैरे असणार by कंजूस
सेम तु सेम
In reply to ललित वगैरे असणार by कंजूस
काल्पनिक नसल्याने दवनीय नाही
In reply to सेम तु सेम by बाबुराव
छान लेख
धन्यवाद :)
In reply to छान लेख by मित्रहो
व्वा, सुंदर वर्णन आणि त्याला
+१
In reply to व्वा, सुंदर वर्णन आणि त्याला by चौथा कोनाडा
+१
In reply to +१ by Bhakti
मस्त...
धन्यवाद पैजारबुवा.
In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार
मस्त लेख..
धन्यवाद तुषार! ग्रीष्मातलं
In reply to मस्त लेख.. by तुषार काळभोर
सुरेख.....!
In reply to धन्यवाद तुषार! ग्रीष्मातलं by Bhakti
असंच पण जांभळी फुलं असलेलं झाड
In reply to धन्यवाद तुषार! ग्रीष्मातलं by Bhakti
छान!
धन्यवाद जुइ.
In reply to छान! by जुइ
छान लिहिलय
सुंदर वर्णन.
भुंग्या फुलाप्रमाणे असणारे एक