Skip to main content

मुक्तक

कंटाळा

लेखक पाटिल यांनी रविवार, 17/10/2021 या दिवशी प्रकाशित केले.
एके दुपारी आम्ही कार्यालयात टंगळमंगळ टोलवाटोलवी इत्यादी महत्वाची कामं करत बसलो असतानाच शेजारचे रावसाहेब नामक समवयस्क सहकारी मित्र बोलले की, "पाटील, आज जरा कंटाळाच आलाय बुवा." यावर आम्ही बोललो की, "रावसाहेब, तुम्हाला कंटाळा आलाय ही उत्तमच गोष्ट झाली. कारण आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सतत सिद्ध करत राहणं, स्वतःला सतत वागवत राहणं, ही काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे मनुष्याला अधूनमधून कंटाळा येणं अगदी साहजिक आहे. उदाहरणार्थ कामाचा, राहत्या जागेचा, शहराचा, गोंगाटाचा, माणसांचा वगैरे कंटाळा येणं हे नैसर्गिकच आहे.

कधीही समाधान न होणाऱ्या भेटी!

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 14/10/2021 या दिवशी प्रकाशित केले.
8 ऑक्टोबर 1998. हवाईदल दिनाच्या निमित्ताने पुण्याच्या लोहगाव हवाईदल स्थानकाला (Air Force Station) मी पहिली भेट दिली तो दिवस. त्याआधी दोन-तीन वर्ष असं होत होतं की, लोहगाव विमानतळावर सामान्य नागरिकांना विमानं पाहण्यासाठी खुली असल्याची बातमी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये यायची. त्यामुळे लोहगाव विमानतळावर विमाने पाहण्याची इच्छा असूनही संधी मिळत नव्हती. 1997 मध्येही असेच झाल्यावर मात्र निश्चय केला की, पुढच्या वर्षी हवाईदल दिनाला या विमानतळावर जाऊन प्रत्यक्षात विमाने पाहायचीच. हवाईदलात असलेले आमचे एक नातेवाईक त्यावेळी बदली होऊन लोहगाव हवाईदल स्थानकावर रुजू झाले होते. हवाईदलात ते अधिकारी होते.

हाच क्षण

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 08/10/2021 या दिवशी प्रकाशित केले.
चाल चाल चालत गेलास वणवण भटकून थकून गेलास हाच क्षण मोलाचा रोवून पाय थांबायचा दार दार ठोठवत गेलास उंबरा उंबरा झिजवत राह्यलास हाच क्षण मोलाचा तोडून दार घुसायचा वाच वाच वाचत गेलास वाचून वाचून साचत गेलास हाच क्षण मोलाचा फोडून बांध लिहायचा
काव्यरस

शहाणी मुलगी ... 2 (#तूम्हणालास)

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 03/10/2021 या दिवशी प्रकाशित केले.
तू म्हणालास, संस्कारी असणंच असतं एकदम best. नाहीतर आयुष्यं बनतं न सुटणारं total mess. यावर मी बिचारी उलटं काय बोलणार? "तसं नसतं रे" म्हणून झाकली मूठ खोलणार?? ( माहीत आहे मराठीत "खोलणार" म्हणत नाहीत आणि संस्कारी लोक याला लेखनच गणन नाहीत.) पण ते असूदेच. थोडं यमक जुळू देच. हां तर, तुझं म्हणणं मला फारसं नाही पटलं, पण तुझ्या वागण्याचं कोडं मात्र सुटलं. आता कळलं दोघांमधलं दोन हात अंतर.. आधी सीमारेषा बाकी सगळं नंतर. साडेपाच सेकंद handshake, stopwatch लावून छान खुलतो रंग तुझ्यावर..
काव्यरस

गुरुजींचे पालकांना पत्र

लेखक भम्पक यांनी मंगळवार, 28/09/2021 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय पालक, सगळीच मुलं पुढे जाऊन डॉकटर, इंजिनिअर बनत नाहीत.प्रत्येकाच्या वकुबाने प्रत्येक जण तसा बनतो.आणि हो डॉकटर,इंजिनिअर बनणे हे काही यशस्वीतेचा मापदंड नाही.कळेल पुढे पोरांना.पण त्यांना चांगला माणूस घडवूया आपण.आम्ही तर आहोतच,परंतु तो तुमचे अनुकरण करणार आहे त्यामुळे तुम्ही सावध असा.या चार भिंतीत आम्ही जगाचे शिक्षण देऊच त्याला,परंतु तुमचा सहभाग हा त्यात सिंहाचा वाटा असेल. हा समाज प्रत्येक घटकाचा बनलेला आहे, प्रत्येक घटक हा त्याच्या उपयुक्तते प्रमाणे महत्वाचा आहे.म्हणजे अगदी खालच्या पातळीवरचाही मनुष्य तेवढाच महत्वाचा आहे जेवढा वरिष्ठ पातळी वरचा.आपण हे त्याला बिंबवूया.म्हणजे तो प्रत्येकाचा आदर

समुद्र..

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 28/09/2021 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्र ,सागर नजर टाकावी  तिथपर्यंत अथांग असतो.म्हणूनच तो मला कायम खुणावतो. सागर किनारा अलवार लाटांच घर असतं.कधी त्या दुडू दुडू अवखळपणे धावत येतात बिलगतात त्या किनाऱ्याला,तर कधी उंच उंच होत जोरात धडकतात.. पटकन किनारी मोकळ्या होतात.

ब्रेथलेस

लेखक पाटिल यांनी शनिवार, 25/09/2021 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यात अचानक खड्डा आल्यामुळे समजा आपण करकचून ब्रेक मारल्यानंतर पाठीमागचा एखादा आपल्यासारखाच मध्यमवर्गीय गाडीवाला आपल्यावर येऊन चढला असता सदर घटनेमध्ये नेमकी चूक कुणाची हे निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नसतो ह्याचं साधं कारण असं आहे की आपल्याकडे कोणत्याही रस्त्यावर गाडी चालवताना फूटभर खोल खड्डा अकस्मातपणे समोर येतच असतो, हे जनरल नॉलेज अगदी लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडत असल्याने ते एव्हाना आपल्या एकूणच जगण्याचा भाग झालेलं असतं तरीही यामागचं खरं कारण म्हणजे जनतेचं ध्यान चालू क्षणावर तल्लखपणे टिकून रहावं ह्या उदात्त भूमिकेतून मायबाप सरकार, प्रशासन आणि कंत्राटदार वगैरे

संभाव्याच्या अब्ज छटांतून

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 23/09/2021 या दिवशी प्रकाशित केले.
संभाव्याच्या अब्ज छटांतून वर्तमान उजळतो कशाने? कोण ठरविते? किंवा सारे, यदृच्छयाच घडून जाते? भूतभविष्यातील भासांचे इंद्रजाल मायावी छेदून काल-प्रवाहा स्तब्ध करोनी ऐलपैल वर्तमान उरते कालौघाची गाज अनाहत चराचराला व्यापुनी उरते "क्षण आत्ताचा क्षणजीवी नच" क्षणोक्षणी वर्तमान म्हणते
काव्यरस

मिसळपाव दिवाळी अंक २०२१ - आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 18/09/2021 या दिवशी प्रकाशित केले.

अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल

काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत. आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे.

शून्याशी गाठ

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 17/09/2021 या दिवशी प्रकाशित केले.
शून्यातून​ पाय फुटल्यासारखे आकडा भराभर धावतात... खुप खुप दमल्यावर शुन्याच्या मागे सामावतात... भोपळा भोपळा हिणवले पहिल्यांदा हाच तर गिरवला... डोळ्यांची भाषा झाली क्लिष्ट जेव्हा शून्य नजरेने गोंधळ घातले... कधी असंच पुढं आल्यावर तो 'पूज्य' राहत नाही कुठल्याशा वळणावर अचानक शून्याशी गाठ सुटत नाही... त्याला पाठीवर घेऊन चालतांना छातीवरल्या आकड्यांंच ओझ कधी जाणवत नाही की अनायसे कुबड भासत नाही... -भक्ती