मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नियती ...

यश पालकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही ती तुमच्या आयुष्यासोबत समांतर चालत असते. वाऱ्यासारख तीच अस्तित्व जाणवत असत. कधी रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करून जाते तर कधी सोसाट्याचा वारा सुटल्यावर घर उध्वस्त करून जातो. नियती पण रंकाला राजा बनवते आणि कधी क्षणात होत्याचे नव्हते करून जाते. आपण सारी स्वप्न सजवतो पण नियतीच्या मनात काय चाललं आहे ह्याचा आपणास मागमूसही नसतो. सार काही सुरळीत चालू असताना नियतीच वागण आपल्याला जाणीव करून देत कि ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य चालू आहे.असं जरी असल तरी ह्याचा अर्थ हा नाही कि आयुष्याचा खेळ खेळायचाच नाही. उलट नियतीच्या खेळाला धैर्याने ,संयमाने तोंड द्यायचं आणि विस्कटलेला डाव सावरायचा आणि पुन्हा उभं राहायचं.कधी न कधीतरी नियतीचे फासे आपल्या बाजूने नक्कीच पडतील .... यशवंत

वाचने 12125 वाचनखूण प्रतिक्रिया 73

In reply to by आयुर्हित

हाडक्या 19/06/2014 - 16:07
तुमच्याकडे मधुमेहापासून नियतीपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे असलेली पाहून फार्फार कवतिक वाटतं. एक मिपाकर म्हणून तुमचा आमाला अभिमान वाटतो.! *biggrin* (ऊर भरून येतो.. मान उंचावते.. इत्यादि इत्यादि बाकी घ्या समजून. )

In reply to by गवि

बॅटमॅन 19/06/2014 - 15:04
तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचाच...अन हा ब्रदर अरुणाचलम-बोगस माणूस आहे साहेब-पण गुरुदेवांचा गाववाला पडला. सगळीकडे वशिलेबाजी आहे!!!! बाकी कायकिणी गोपाळरावांनी नंतर समाधीतून जागं केलं की नाही ;)

यू सी द को-इफिशियंट ऑफ द लिनीयर इज जक्स्टापोझिशन्ड बाय द हिमोग्लोबिन इन द अ‍ॅट्मोस्फेरिक प्रेशर इन द कंट्री!!

In reply to by तुषार काळभोर

१० वेळा वाचले तरी डोक्यावरुन गेले...कुठुन उचल्लेय? ( कृपया अभ्यास वाढवा म्हणु नये)

विटेकर 19/06/2014 - 14:56
ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य ......... साफ चूक ! मना त्वाचि रे पूर्वसंचित केले | तयासारखे भोगणे प्राप्त झाले || संचित म्हणजे काय ? वाचा " कर्माचा सिद्धांत " आमेन!

In reply to by विटेकर

धन्या 19/06/2014 - 15:40
संचित म्हणजे काय ? वाचा " कर्माचा सिद्धांत "
कर्माचा सिद्धांत माणसावर प्रचंड अन्याय करतो. या जन्मात मला ज्या वाईट प्रसंगांना, दु:खांना सामोरं जावे लागत आहे त्या माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या वाईट कर्माचे फळ आहे हे मला माहिती नाही. मी या जन्मी सुखी असेन तर माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या सत्कृत्याचे फळ आहे हे ही मला कळत नाही. हा कसला न्याय ज्यात मला शिक्षा किंवा बक्षिस मिळते मात्र ते कोणत्या गोष्टीसाठी मिळते हेच मला माहिती नाही. बाकी हीराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक अफलातून आहे. दु:खितांना प्रचंड दिलासा या पुस्तक वाचनाने मिळतो.

In reply to by धन्या

@बाकी हीराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक अफलातून आहे. दु:खितांना प्रचंड दिलासा या पुस्तक वाचनाने मिळतो. >>> अगदी अगदी...! माझ्यासारख्या आळशी माणसाला,स्वतःला प्राप्त झालेल्या दु:ख्खांना अनेक बचावात्मक आणि काल्पनिक गोष्टींना हताशी धरून वाट द्यायला मिळते! लबाड्या लपवायचा चान्स मिळतो. फक्त एकदा असं झालं,की- जे काहि होत आहे,ते गेल्या जन्मीच्या कर्माचं फळं आहे.या मझ्या समजुतिमुळे मी माझ्या मित्राच्या खिशातनं त्याला न विचारता पेन घेतलं. त्यावर तो निर्बुद्ध माणूस , चोर..चोर असे ओरडला! मी त्यास म्हणालो,अरे मित्रा-ही चोरी नाही..हे फक्त कर्म-फलित आहे. तुझ्या नशिबात होतं पेन चोरिला जावं.माझ्या नशिबात होतं,मी ते चोरावं. तेंव्हा..तक्रार करू नकोस..हे आपल्या दोघांच्याही गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ आहे. तेंव्हा ते गपचूप खा बरं!!! त्यावर त्यानी माझ्याकडून पेन हिसकाऊन घेतलं,आणि मला एक चापट मारून म्हणाला- हे ही आपल्या दोघांच्या गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ आहे! मग मात्र मला त्या दुष्ट माणसापुढे काहिच बोलता येइ ना! :-/ हे ही "गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ!" आता मी या सगळ्या फळांचं फ्रुटसॅलेड तयार करून भगवंताला पुढं जाणार आहे. आणि,त्याच्या फळांचा त्यालाच नैवेद्य दाखवून, जाब विचारणार आहे.... अर्थातच माझ्या गेल्या जन्मात असं काहि माझ्या हातून घडण्याचं कर्म,मी केलं असेल तर........................आणि तरच...........................!!!!!!!!!!!!!!!!

सस्नेह 19/06/2014 - 15:16
पाठीमागच्या अपार्टमेंट्च्या चौथ्या माळ्यावरच्या चिकनिसांची मधली कार्टी ? असेल बै ! ती जरा आगावच आहे . काय करेल सांगता येत नाही ! *wink*

In reply to by सस्नेह

बॅटमॅन 19/06/2014 - 15:19
चिकनीस??? नक्की आडनाव आहे की "प्रेयसीस पत्र" सारखे "चिकनीस" असे नाव दिलेय =)) तदुपरि आगाव हा शब्द अगदी बोलीभाषेतल्यागत लिहिला म्हणताना बरं वाटलं. :) (दक्षिणमहाराष्ट्रदाक्षिण्यवादी) बॅटमॅन.

धन्या 19/06/2014 - 15:31
हे सगळं नियती करते? मी तर ऐकलं होतं की जन्म झाल्यापासून सहाव्या दिवशी सटवी येते आणि भाळी नशिब लिहून जाते. त्यापुढचे सारे सटवीच्या लेख्याप्रमाणे घडते.

In reply to by सूड

पैसा 19/06/2014 - 20:31
तू टाईप केलेले दोन्ही मला 'र्‍या' असेच दिसतायत. ते सांगतायत तो पायमोडका 'र्' स्पेसल लिनक्समधे टाईप केला असेल तर दिसतो.

In reply to by पैसा

सूड 19/06/2014 - 21:15
>>पायमोडका 'र्' स्पेसल तांच म्हणतांय गे मिया. माका हंयसर IE त पायमोडको 'र्' दिसतांहा नि क्रोमात '-या'!! (हो '-या' मियां हायफन देवान लिवलोहां). :)

In reply to by सूड

बॅटमॅन 20/06/2014 - 17:47
तांच म्हणतांय गे मिया
आता हा गे मिया कोण?
माका हंयसर IE त पायमोडको 'र्' दिसतांहा
अँड आय थॉट थेअर इज़ ओन्ली हडपसर इन पुणे.
मियां हायफन देवान लिवलोहां
मियां एकदम "हाय फन" आहे हे कळ्ळं , पण पुढं देव कुठनं आला 'मरे' ;)

In reply to by पैसा

BOSS (Bharat Operating System Solutions) अशी काहीतरी सरकारी लिनक्स आहे जी उबंटू प्लॅटफॉर्म ला C-DAC ने बनवलीये. त्यात मी chrome टाकू शकलो नाही. फक्त Firefox आहे.

म्हैस 19/06/2014 - 16:22
कर्माचा सिद्धांत ह्या पुस्तकात लेखकाने इकडून तिकडून वाचलेले किवा स्वताचे opinions टाकलेले आहेत. कर म्हणे मारताना तो माणूस त्याच्या मुलाला नारायण नारायण अश्या हाक मारत होता म्हणून त्याला मुक्ती मिळाली. मागच्या जन्मातली माणसं ह्या जन्मात प्राण्यांच्या स्वरुपात तुमच्या समोर आली तर त्याला तुम्ही मिठी मारली असती वगेरे . कैच्या काही.
कर्माचा सिद्धांत माणसावर प्रचंड अन्याय करतो. या जन्मात मला ज्या वाईट प्रसंगांना, दु:खांना सामोरं जावे लागत आहे त्या माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या वाईट कर्माचे फळ आहे हे मला माहिती नाही. मी या जन्मी सुखी असेन तर माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या सत्कृत्याचे फळ आहे हे ही मला कळत नाही. हा कसला न्याय ज्यात मला शिक्षा किंवा बक्षिस मिळते मात्र ते कोणत्या गोष्टीसाठी मिळते हेच मला माहिती नाही.
ते माहित नसण्याचं कारण असं आहे कि , कुठल्या कृत्याबद्दल काय शिक्षा होतीये किवा कुठल्या कृत्याचं काय बक्षीस मिळतंय हे समजलं असतं तर माणसं बक्षिसाच्या लोभाने किवा शिक्षेच्या भीतीने कर्म करत राहिली असती . ज्याला काहीही अर्थ नाहीये . एखादी गोष्ट शिक्षेच्या भीतीने न करण आणि मुळातच प्रेम , करुणा ह्या गुणांमुळे न करण ह्यात फरक आहे . दुसरी गोष्ट म्हणजे जन्मोजन्मीची प्रत्येक गोष्ट जर माणसाच्या लक्षात राहिली असती तर त्याच्या डोक्यात प्रचंड गोंधळ माजला असता. त्याच त्याच आठवणींमुळे जीवन खूप कठीण झाला असतं. म्हणून विस्मृती हि माणसाला मिळालेली देणगी आहे .
जन्म झाल्यापासून सहाव्या दिवशी सटवी येते आणि भाळी नशिब लिहून जाते
ते काही माहित नाही. पण हे नशीब आपल्याच पुर्वकर्माची फलं असतं

In reply to by म्हैस

धन्या 20/06/2014 - 15:21
आता तुमच्या या प्रतिसादाला मी काही उत्तर देणार. मग तुम्ही काही लिहिणार, मग मी पुन्हा उत्तर देणार, मग तुम्ही पुन्हा काहीतरी म्हणणार... हे चालू राहणार. बरं त्यातून निष्पन्न काय होईल तर काहीच नाही. तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहणार आणि मी माझ्या. त्यापेक्षा उत्तर न देणे उत्तम. कसें? जाता जाता मी चारोळया वयात पाडलेली चारोळी:
मार्ग आपला आधीच आखलेला आपण फक्त त्यावरुन चालणं काहीच हाती तसं नसतं आपल्या फक्त नियतीचे ईशारे पाळणं
धन्यावाद (सहारा प्रणाम च्या चालीवर :D )

मी वरील टाईपच्या प्रतिक्रीया दिल्या तर मिपाच्या क्वालिटीत पाॅझिटीव्ह फरक पडेल काय? तदनुशंगे काही विशिष्ट लोकांना आनंद होईल काय ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सस्नेह 19/06/2014 - 22:12
लोकांच्या आनंदाकडे लक्ष देऊ नका..तुम्हाला ज्यात आनंद मिळतो तेच करा. 'स्व' ला ओळखा... *good*

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 20/06/2014 - 14:17
एकट्यादुकट्याने मिपाच्या क्वालिटीत काय फरक पडणार? झालंच तर विशिष्ट लोकांना बरं वाटण्यानेही क्या ही फरक पडेगा?

म्हैस 20/06/2014 - 16:48
धन्या, बरं झालं प्रतिसादांचा सिलसिला थांबवला . तसंही माझ्या प्रतिसादांना तुम्ही कडाडून विरोध करता पण दुसर्या लेखांवर मात्र माझे आधीचेच प्रतिसाद तुम्ही कॉपी करून टाकता हे माझं observation आहे . ;-)

In reply to by म्हैस

ओ ताई, धन्या खोडसाळ आहे, दंगेखोर आहे कधिकधी तो माफक हलकट पणाही करतो पण कसाही असला तरी धन्या वरीजनल आहे. त्याचे प्रतिसाद नेहमीच अभ्यासपुर्ण / मार्मीक असतात. (तुम्ही त्याच्यावर आरोप केला म्हणुन त्याचे जाहीर कौतुक करावे लागत आहे) उगा त्याच्यावर चोरीचा आळ घेउ नका. पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गवि 20/06/2014 - 17:06
हो.. अगदी अगदी.. धन्या खोडसाळ आहे, दंगेखोर आहे.. धन्या चावट आहे .. पण धन्या नीच नाही.. ;)

In reply to by म्हैस

धन्या 20/06/2014 - 17:43
तसंही माझ्या प्रतिसादांना तुम्ही कडाडून विरोध करता पण दुसर्या लेखांवर मात्र माझे आधीचेच प्रतिसाद तुम्ही कॉपी करून टाकता हे माझं observation आहे .
गोड गैरसमज आहे हा तै तुमचा. जास्त काही लिहित नाही. मला व्यक्तिशः ओळखणार्‍यांना मी काय आणि किती वाचतो हे माहिती आहे. :)

उपास 22/06/2014 - 16:24
बरं ते जाउंदे, पण गदिमांनी 'पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा' मधल्या कडव्या कडव्यात जे मांडलय त्याविषयी काय मत आहे? प्रत्यक्ष प्रभू राम म्हणतायत तिथे की माझ्या पूर्वसंचिताचे भोग आहेत म्हणून.. ;)

In reply to by उपास

आयुर्हित 23/06/2014 - 00:36
याचा अर्थ गदिमांनी "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक वाचलेले दिसत नाहि. आणि त्याही आधि लिहिलेले स्वामी विवेकांनदांनी लिहिलेले "कर्मयोग" हेही पुस्तक वाचलेले दिसत नाहि. तसे पाह्ता हे दोन्ही पुस्तके भगवतगीतेवरच आधारलेली आहेत्. भगवतगीता जितक्या अधिक वेळेला वाचाल तशी ती अधिकाधिक समजत जाते असे म्हणतात!

म्हैस 23/06/2014 - 16:26
त्याचे प्रतिसाद नेहमीच अभ्यासपुर्ण / मार्मीक असतात
असेल कि आम्ही कुठे नाही म्हणलंय. म्हणजे बाकीच्या लोकांचे अभ्यासपुर्ण / मार्मीक नसतात असा तर अर्थ होत नाही ना.
गोड गैरसमज आहे हा तै तुमचा.
गैरसमजाचा प्रश्न येतोच कुठे ? सिद्ध करू शकते . असो . जास्त अवांतर नको .

म्हैस 26/06/2014 - 13:06
बाकीच्या लेखावारचे प्रतिसाद बघा कि. जशीच्या तशी माझी वाक्यं आहेत . मी जेव्हा असं म्हणले होते तेव्हा मात्र त्याला विरोध झाला होता. आता सगळेच काही प्रतिसाद इथ टाकत बसत नाही. धन्या ला समजलं बस झालं.

In reply to by म्हैस

धन्या 26/06/2014 - 16:22
कोंबडयाला वाटत असेल त्याच्या आरवण्यानेच दिवस उजाडतो, तर त्याचं सुख हिरावून कशाला घ्यायचं. तुमचं चालू दया मी तुमची वाक्ये कॉपी केली आहेत हे पालूपद. :)