जगाच्या कल्ल्याणा संतांच्या विभुती (साईविलास) !!!!!!!!
ज्या लोकांची या विषयावर टोकाची मते आहेत त्यांनी आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा. सक्ती नाही.
प्रतीक्रिया मनमुक्त द्याव्यात जशा उमटल्या तशा. तेवढीच तेवढी तेवढी मुक्ती.
शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती)
जिवनात चढउतार येतच असतात. हार-जीत,सुख-दुख,मान-अपमान, मनासारखे -मनाविरुद्ध काही घडणे अशा विरोधाभासी घटनांची निरंतर साखळी म्हणजे आपले जीवन.
म्हणुन घडतय ते १००% आपल्या नियंत्रणात नाही याचा बोध व्हावा यासाठीच साधनावीधी.सोप्या शब्दात सांगायचं तर दोन्हीही विरोधाभासी घटनांमधे मनाचे संतुलन ढळु न देणे. कुठल्याही टोकावर न जाता मध्यम मार्गाने चालणे. रबर ताणायचा कीती हे थोड्याशा प्रयत्नाने साध्य करता याबद्द्ल दुमत नसावे अशी आशा करतो. साधना यासाठीच की कितीही मोठं दु:क्ख असुद्या ते दु:क्ख आहे हे कोणालाही समजते. पण सुख आल्यावर हेही काही काळाने का होईना ते दु:ख्खात बदलते हे लवकर लक्षात येत नाही.आपले संतुलन सुखाने बिघडते. आता प्रश्न असा आहे की मी सुखाच्या आनंदाला मुकायचे का ? तर अजिबात नाही. सुख आल्यावर आनंद , दुक्ख आल्यावर दु:क्खाकडे तटस्थपणे पहा. निरासक्त होउन बस्स. तेवढंच पुरेसे आहे . त्यातुन तुमचा तुम्हाला बोध होईल. आता अध्यात्माच्या नावाने इतकी बोंबाबोंब झालीय जगात की एवढंच करायचं आनी दु:क्खातुन मुक्ती हे केवळ अशक्य वाटायला लागतं. करुन न पाहता शंका उमटतात.मन इतकं बावरलेलं झालय की ते समतेने पाहुच शकत नाही कारण जन्मापासुनची सवय. असो. आपण नेहमी बाहेर पहातो, उदा: मिपावरील प्रतिक्रिया पहा कुठल्याही धाग्यावरील. एका धाग्यावर मत नोंदवलेलं असेल तर दुसरीकडे त्याच व्य्क्तीने विसंगत विधान केलेलं आढ्ळुन येइल. बर्याचदा ते विनोदाचा भागही असेल.पण काही वेळा ते आपल्याच आधी केलेल्या विधानाच्या विरुद्ध असेल. आपण नकळत पण सतत दुसर्याच्या वागणुकीचे डोळ्यात तेल घालुन मुल्यमापण करत असतो. सगळी साधना हिच की आपण आपल्याच वागणुकीचे मुल्यमापन करावे म्हणजे आपल्याला आपलाच बोध होईल. विचार करुन बोलले तर नंतर शब्द गेल्यावर वाइट वाटुन घेण्याची वेळ येणार नाही.असो. झाले हे प्रबोधन फारच झाले काय?
नाही मग हे वाचा
http://www.aisiakshare.com/node/3140
झाले मग हे वाचा.
http://misalpav.com/node/28489
कविताताई मनावर घेउ नका फक्त यातील गंमत अनुभवा. हे अगदी मनापासुन सांगतोय.मला रात्री जाग आली आनी एकदम आठवले कवीताताइंना साई भेटले अन मी तर प्रत्यक्ष साई. अर्थातच तुमच्या सारखे त्यांना ओळखनारे लोक (ज्ञानी) जगात दुर्मीळ.मीही याच ज्ञानी वर्गातला साधक आहे. म्हण्जे पुर्ण ज्ञान झाले नाही आणि पुर्ण अज्ञानही गेले नाही. पन जगात तर अज्ञानी लोकांची संख्या जास्त असते. पण कलीयुगाचा महीमा पहा मी प्रत्यक्ष साई असुनही मलाच त्याचा विसर पडला. पुरावे देतो थांबा. त्यातही काही लोकांच्या प्रतिक्रवाचामी देतोय त्या काळजीपुर्वक तपासा हे लोक पुढे चालुन ज्ञानी होणारच हे सत्य त्यातुन प्रकट होतेय.
हे घ्या पुरावे:
http://misalpav.com/node/21788
काही खास
विलासरावला प्रत्यक्ष भगवान शंकरानं जरी चिलीम ऑफर केली तरी ते ती हातात घेणार
नाहीत हे मी आता सांगू शकतो.
स्वत: विपश्यना करीत प्रत्येक पाऊल टाकणारे, 'आपल्याला कशातलं काही कळत नाही' हा गुरुमंत्र असणारे विलासराव रस्ताभर सगळ्या जगाची नालस्ती करीत होते - आणि मी त्यांना दाद देत होतो. अर्थात हे फक्त माझी परिक्षा पाहण्यासाठीच.
मला कळतं असा आव मी आणत होतो, मग विलासरावच्या रुपातले साईबाबा मला सोडणार काय? माझा बेकअलीपणा त्या रस्ताभर सांडत होता. परिक्रमा झाल्यानंतर विलासराव त्यांच्या प्रेमाच्या लोकांची साईबाबांच्या रुपात भेट घेतील. म्हणजे मी विलासरावच्या रुपात साईबाबांसोबत फिरत होतो, आणि मला ते कळत नव्हतं, मी त्यांना अक्कल शिकवत होतो, पण साईबाबा विलासराव या मुंबईच्या माणसाच्या रुपात माझ्यासोबत फिरत आहेत हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं नाहीच - ते मला माझ्यावर विनाकारण खूश झालेल्या एका नाथपंथीय योग्यानं दाखवलं. कसं ते पुढे सांगू.
आत्मशून्य आणि विलासराव मुंबईतून परिक्रमेसाठी निघत असताना विलासरावांनी त्याच्यासाठी आणि स्वत:साठी सारखाच शर्ट, पंचा आणि रुमाल घेतला होता. म्हणजे दोघांचा पेहराव सारखाच. तीन तासांपूर्वी आत्मशून्य त्या पेहरावात रस्त्यावरून जात असताना त्या कॉन्स्टेबलने पाहिलं होतं आणि आता तो आत्मशून्यच हे कसं ते मला विलासरावांनी समजून सांगितलं होतं? तुम्हाला, हे वाचणार्यांना काय कळलं? हे परब्रह्मच वेगवेगळ्या रुपात फिरतंय आणि वेगवेगळी रुपं दाखवून मरणांत परिक्षा घेतंय.
माझ्या ओळखीच्या असलेल्या विलासरावच्या रुपात आलेल्या साईबाबांनी किती प्रकारे मला इशारे केले असतील, पण मी ते सगळं मातीत घालत होतो. आता, घडून गेलेल्या प्रत्येक गोष्टीची संगती मला अचूक लागतेय, ती गुरुने माझ्यावर केलेल्या कृपेमुळं. तुम्हा वाचणार्यांना स्वत:च स्वत:च्या बळावर कमावलेली नजर असेल, किंवा तुमच्या मस्तकी कधी कोणा गुरुचा हात राहिला असेल तरच तुम्हाला हे सगळं खरं आहे का याचा अंदाज येईल. नाहीतर तुमच्यालेखी यशवंत कुलकर्णी नावाचा कुणीतरी पोट्टा पागल झाला अशी नोंद लागेल.
मध्येच लागलेल्या एका धाब्यासमोर रांजण भरुन ठेवलेले होते, तिथेही विलासरावांनी पाणी पिलं, मीही पिलं. त्यांनी त्या धाब्यावरच्या लोकांना 'पानी पिना है किंवा पानी पिएं क्या' असं काहीतरी दरडावून विचारलं होतं एवढं आठवतंय. तेवढ्या 14 कि.मी. मध्ये विलासरावच्या रुपात आलेल्या साईबाबांनी त्यांच्या प्रत्येक हालचालीतून हजारो दृष्टांत दिले असतील, पण मला त्यावेळी नजर कुठे होती?
चालत चालत दहा किलोमीटर अंतर कापलं. आजूबाजूला शुकशुकाट असलेल्या रस्त्याच्या कडेला एक फुलवाला फुलांच्या माळा करीत बसला होता. तिथं माठ भरून ठेवलेला होता. पुन्हा तिथं पाणी पिलं. विलासरावांच्या रुपातील साईबाबांनी त्याच्याशीही दोन गोष्टी केल्या. त्याला काय कळलं असेल देवजाणे. पुन्हा दोनतीन किलोमीटर पुढे पोहोचलो असू. महेश्वरमध्ये गेल्यानंतर कुठे जाऊन थांबायचं ते विलासरावच ठरवत होते
तिथे शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या वृद्धाला विलासरावांनी थांबण्याच्या सोईबद्दल विचारलं. तो म्हणे तुमची थांबण्याची व्यवस्था मागेच असलेल्या लॉजमध्ये होऊ शकते. त्यानं दोन-दोनदा विलासरावांना नमस्कार केला. विलासरावांनी कुणालाही काही दरडावून विचारलं की बिनदिक्कत पुढे जात होते, मग मीच माझ्या लाजकाजं त्या उत्तर देणार्याला धन्यवाद किंवा थँक्यू म्हणत होतो तेव्हा विलासरावच्या रुपातील साईबाबा मला सांगत होते, कशाचे धन्यवाद? नर्मदे हर, नर्मदे हर म्हणायचं. मी भेटलेल्यांपैकी बर्याच लोकांना नर्मदे हरही म्हणालो आणि धन्यवाद थँक्यूही म्हणालो.
एका गाड्यावर खरबूजं विकायला ठेवली होती. विलासरावच्या रुपातील साईबाबा म्हणाले 'मला खरबूजं फार आवडतात. आज रात्री खरबूजच खाऊ.' म्हटलं घेऊन टाकू. वीस रुपये देऊन एक खरबूज घेतलं. मध्येच त्यांनी त्यांना भेटलेल्या कुठल्यातरी 'प्रति साई'चा किस्सा सांगितला. तो जो कोण माणूस असेल त्यानं स्वत:ला 'प्रति साई' घोषित केलंय आणि तो आश्रम बांधून रहातोय. त्याच्या गावापासून शिर्डीपर्यंत तो उलटा चालत जातो. पेपरमध्ये बातम्या वगैरे येतात. प्रति साई आहे तर शिर्डीपर्यंत उलटा कशाला चालत जातो म्हणून मी खूप मोठ्यानं हसलो. विलासरावच्या रुपातील साईबाबा त्यालाही भेटून आले होते - तेव्हा त्याने विलासरावांच्या रुपातील साईबाबांना विपश्यनेबद्दल चार गोष्टी विचारल्या आणि विलासरावांनीही त्या त्याला सांगितल्या.
राजराजेश्वर मंदीराच्या दिशेनं निघालो. या मंदीरात जायचं अर्थातच विलासरावच्या रुपातील साई बाबांनी ठरवलं होतं. मंदीराचं गेट ओलांडून आत गेलो. एक वृद्ध ब्राह्मण कद घालून मंदीराच्या पायरीवर बसला होता. विलासरावांच्या रुपातील साईबाबांनी त्याला इथे थांबण्याची व्यवस्था होऊ शकते का हे विचारलं. तो म्हणे, 'कम हियर, व्हेअर डू यू केम फ्रॉम?' मग विलासरावांनी काय सांगायचं ते सांगितलं. कुठले आहात, कुठून येताय वगैरे चारदोन गोष्ट झाल्या. तो मंदीराच्या समोरच्या प्रांगणाकडे हात दाखवून म्हणे, 'यहां सो जाओ.' विलासरावांनी त्या वृद्ध ब्राह्मणाच्या इंग्रजी बोलण्याची माझ्यासमोर टर उडवली.
आयला यक्कुशेठ, काय करताय
प्रास - Tue, 29/05/2012 - 19:18
आयला यक्कुशेठ, काय करताय हो?
दोन दिवसाच्या परिक्रमेची गोष्ट अशी काही सांगताय की जणु आमच्या डोळ्यांपुढेच घडतेय. पण जे काही बुद्धी टिपतेय त्यांची पूर्णच्या पूर्ण संगती लावणं अवघड होऊन बसलंय ना....
मला कल्पना आहे की हे असलं काही अनुभवल्यानंतर ते तसंच्या तसं मांडणं खूपच कठीण होत असावं पण आमचा आपला नेहमीप्रमाणेच यक्कुशेठांच्या लिखाणाला समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शक्य तितक्या लवकर पुढले भाग टाका. वाट बघत आहे.
विलासरावांबद्दल काळजी वाटतेय पण त्यांच्यातल्या अध्यात्मिक शक्तीची कल्पना आहेच म्हणून ठीक....
आत्मशून्यची काळजी करणारे आम्ही कोण पामर?
विलासरावांबद्दल काळजी
यकु - Tue, 29/05/2012 - 19:59
विलासरावांबद्दल काळजी वाटतेय
काळजी? अहो तो माणूस जिथे जाईल तिथे सांगतोय की द्यायचं असेल खायला तर तयार द्या, सदावर्त वगैरे देऊ नका. हाताने बनवत नाही. कुठल्यातरी मंदीराच्या पुजार्यानं नारळ दिलं, त्यावरच गड्याचा दिवस गेला.
त्याच्या आधी कुठलंतरी मंदीर त्यांना आवडलं, तिथे बाहेर, ओट्यावरच ते झोपत होते, तर तिथल्या ब्राह्मण पुजार्यानं त्यांची जात आणि धर्म विचारला. आणि यांनी सांगितला तेव्हा यांना पडक्या खोलीत पाठवून देण्यात आलं. माणूस अहमदनगर जिल्ह्यातून आलाय हे लक्षात घ्या आणि त्यांची काळजी करु नका.
पण त्यांच्यातल्या अध्यात्मिक शक्तीची कल्पना आहेच म्हणून ठीक....
तुम्ही त्यांना आध्यात्मिक शक्तीबद्दल विचारुन बघा आणि काय उत्तर देतात पुन्हा एकदा पहा.
आत्मशून्यची काळजी करणारे आम्ही कोण पामर?
मी महेश्वरचे सगळे घाट पालथे घातले, आश्रमांमध्ये त्याची विचारपूस केली, पण त्याची भेट व्हायची नव्हतीच.
माणूस अहमदनगर जिल्ह्यातून
प्रास - Wed, 30/05/2012 - 11:23
माणूस अहमदनगर जिल्ह्यातून आलाय हे लक्षात घ्या आणि त्यांची काळजी करु नका.
अहो यक्कुशेठ, अहमद नगरचा माणूस अहमद नगरच्या माणसाला व्यवस्थित ओळखणारच की! Wink
तुम्ही त्यांना आध्यात्मिक शक्तीबद्दल विचारुन बघा आणि काय उत्तर देतात पुन्हा एकदा पहा.
विलासरावांना असल्या गोष्टी पुन्हा पुन्हा विचारून त्यांनी दिलेल्या उत्तरांवरूनच काढलेला निष्कर्ष आहे हा...
आत्मशून्याचं आत्मशून्यच सांगेल असं मानून चालू Wink
बाकी पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत....
गुंगवून टाकणारं लिहिलंस
वल्ली - Wed, 30/05/2012 - 09:01
गुंगवून टाकणारं लिहिलंस रे.
विलासरावांसारख्या सज्जन माणसाबरोबर भरपूर गप्पा मारत फिरण्याचा योग वसई आणि कान्हेरीच्या भटकंतीत आलाच होता.
यकुविलास आवडला.
नगरीनिरंजन - Wed, 30/05/2012 - 09:29
यकुविलास आवडला.
हम्म... साईबाबांना भेटायला
लीमाउजेट - Wed, 30/05/2012 - 14:37
हम्म...
साईबाबांना भेटायला हवं... Smile
ते सिल्व्हासा की कुठे नोकरी करीत होते तेव्हा काहीतरी वाचून की कुठल्या घटनेमुळे तीन दिवस सतत रडत राहिले आणि त्यांना उपरती झाली. मग सगळं सोडून ते तिथून शिर्डीला चालत आले. विलासराव अहमदनगर जिल्ह्यातलेच असल्याने त्या दोघांतच संवाद चालला होता. शिर्डीपासून जवळच असलेल्या कोकणखार गावाबद्दल बोलणं सुरु होतं. बहुतेक जनार्दन स्वामी त्यांचे गुरु. कारण जनार्दन स्वामींचा सगळ्यात अव्वल पट्टशिष्य होऊन दाखवीन असं काहीतरी त्यांच्या बोलण्यात आलं होतं. परिक्रमेबद्दल वगैरे बराच वेळ बोलणं सुरु होतं.
शहरात जाऊन चहा, नाष्टा करुन येण्याचा विषय निघाला. ते म्हणे चला, मी पण येतो. मग त्यांनी आधी बहुतेक आम्हाला विश्वेश्वराच्या मंदीरात नेलं. तिथे दर्शन वगैरे घेऊन मंदीरातूनच वर गेलेल्या रस्त्याने आम्ही आम्ही थांबलो होतो त्या मठीत आलो. मी तिथे त्यांचे आणि त्यांच्या पायाचे फोटो काढले. विलासराव म्हणे, झालं! हे लिहिणार आता तुमच्याबद्दल इंटरनेटवर. म्हटलं हो, आपल्याला प्रॅक्टीकल करुन पहाणारी माणसं आवडतात. योगी महाराज हसले.
बाकी नारायण नारायण.
कुठल्या प्रतीसादावर उत्तर द्यायच याचे हक्क राखीव
नरा: नारायण!!!!!!
आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम ..........!!!!!!!
वाचने
14913
वाचनखूण
प्रतिक्रिया
74
नेमके काय आहे हे?
In reply to नेमके काय आहे हे? by सोत्रि
उद्या दहीहंडी आहे ना?
In reply to नेमके काय आहे हे? by सोत्रि
- (डोक्याचे दही झालेला)
गमतीशीर लेख.
विलासराव,
In reply to विलासराव, by प्यारे१
विलासराव,
In reply to विलासराव, by विलासराव
>>>>कविताताई मनावर घेउ नका
In reply to >>>>कविताताई मनावर घेउ नका by प्यारे१
हा प्रतिसाद काही वेगळंच
In reply to हा प्रतिसाद काही वेगळंच by विलासराव
>> आताही मला काहीही म्हणायचं
>> दिलेल्या धाग्याच्या सर्व
In reply to >> दिलेल्या धाग्याच्या सर्व by सोत्रि
अहो सोत्री अस पहा
In reply to अहो सोत्री अस पहा by विलासराव
खरड लिहिली?
In reply to >> दिलेल्या धाग्याच्या सर्व by सोत्रि
सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती)
साईबाबांबद्दल बोलायचं झालं तर
In reply to साईबाबांबद्दल बोलायचं झालं तर by कवितानागेश
साईबाबांबद्दल बोलायचं झालं तर
In reply to साईबाबांबद्दल बोलायचं झालं तर by विलासराव
"मी साई आहे असं मला म्हणायचंय
In reply to साईबाबांबद्दल बोलायचं झालं तर by विलासराव
विलासराव, हा धागा (बहुदा) राहणार नाही.
In reply to विलासराव, हा धागा (बहुदा) राहणार नाही. by संजय क्षीरसागर
तुम्ही जे म्हणतायं ते योग्य
In reply to तुम्ही जे म्हणतायं ते योग्य by विलासराव
झाली का टरफलं उचलून?
In reply to झाली का टरफलं उचलून? by कवितानागेश
मी एवढच म्हणेन मी शेंगा
In reply to विलासराव, हा धागा (बहुदा) राहणार नाही. by संजय क्षीरसागर
मी इथे नवीन असतांना माझ्या
In reply to मी इथे नवीन असतांना माझ्या by विलासराव
विलासराव, तुम्ही माझ्या धाग्यावर गोंधळ घातलेला नाही.
In reply to विलासराव, तुम्ही माझ्या धाग्यावर गोंधळ घातलेला नाही. by संजय क्षीरसागर
ओके संक्षी.
In reply to ओके संक्षी. by विलासराव
विलासराव, वाद कुठेय? चर्चा आहे!
In reply to विलासराव, वाद कुठेय? चर्चा आहे! by संजय क्षीरसागर
ओके. चर्चा थांबवुयात.
In reply to ओके. चर्चा थांबवुयात. by विलासराव
आय एम डन!
In reply to विलासराव, वाद कुठेय? चर्चा आहे! by संजय क्षीरसागर
मुक्ती चार नाहीत, एकच आहे आणि
In reply to मुक्ती चार नाहीत, एकच आहे आणि by धन्या
मुक्त होता परि बळे झाला बद्ध|
In reply to मुक्त होता परि बळे झाला बद्ध| by प्यारे१
एक्ग्झॅक्टली !!!
In reply to एक्ग्झॅक्टली !!! by धन्या
मी पण मी पण ब्यॅटींग करणार
In reply to एक्ग्झॅक्टली !!! by धन्या
रमण महर्षींशी संपूर्ण सहमती व्यक्त करतो!
In reply to रमण महर्षींशी संपूर्ण सहमती व्यक्त करतो! by संजय क्षीरसागर
अहो पाटील, सगळ्यांना नाही जमत
In reply to अहो पाटील, सगळ्यांना नाही जमत by प्यारे१
एकतर प्रतिसाद तुम्हाला दिलेला नाही
In reply to एकतर प्रतिसाद तुम्हाला दिलेला नाही by संजय क्षीरसागर
>>> माझ्या विचारांशी जे सहमत
In reply to एकतर प्रतिसाद तुम्हाला दिलेला नाही by संजय क्षीरसागर
>>> माझ्या विचारांशी जे सहमत
In reply to अहो पाटील, सगळ्यांना नाही जमत by प्यारे१
हम्म
In reply to साईबाबांबद्दल बोलायचं झालं तर by विलासराव
आपला दृष्टीकोन समजला. पण
In reply to आपला दृष्टीकोन समजला. पण by प्यारे१
आपला दृष्टीकोन समजला. पण
In reply to आपला दृष्टीकोन समजला. पण by विलासराव
हम्म्म!
In reply to आपला दृष्टीकोन समजला. पण by प्यारे१
याचा काय अर्थ आहे?
In reply to याचा काय अर्थ आहे? by असंका
अभ्यास वाढवावा ही नम्र विनंती
In reply to अभ्यास वाढवावा ही नम्र विनंती by प्यारे१
मी कालपासून काम धाम सोडून
In reply to मी कालपासून काम धाम सोडून by असंका
असं करण्याची गरज नाही. कामधाम
In reply to असं करण्याची गरज नाही. कामधाम by प्यारे१
हा इन जनरल प्रतीसाद आहे.
साईराम साईराम जय साईराम,
चान चान .
काय्येक कळ्ळं नाय !!
In reply to काय्येक कळ्ळं नाय !! by सूड
सूड सरांशी तीव्र सहमत
एक
In reply to एक by इरसाल
हैला !
In reply to हैला ! by सस्नेह
तुम्हीपण म्हणजे !
In reply to तुम्हीपण म्हणजे ! by इरसाल
उजव्या सोंडेचा गणपती
In reply to उजव्या सोंडेचा गणपती by बॅटमॅन
मस्त धागा आहे तो. आजच पाहीला
In reply to एक by इरसाल
पाचेक वर्तुळं झाली की
In reply to पाचेक वर्तुळं झाली की by यशोधरा
किंवा "आवडी"चा
In reply to किंवा "आवडी"चा by आदूबाळ
आवडीच्या लोगोत चार असत्यात !!
In reply to आवडीच्या लोगोत चार असत्यात !! by सूड
बरोब्र!
In reply to बरोब्र! by आदूबाळ
ते
In reply to एक by इरसाल
हे वर्तुळ नै हो !
In reply to हे वर्तुळ नै हो ! by डॉ सुहास म्हात्रे
एक मस्त फोटू
In reply to एक मस्त फोटू by सस्नेह
गेल्या साली कश्याला ? ह्ये
In reply to गेल्या साली कश्याला ? ह्ये by डॉ सुहास म्हात्रे
ओ आप्पा,
In reply to ओ आप्पा, by प्यारे१
राईट्ट, राईट्ट... शाम्शूमच
In reply to गेल्या साली कश्याला ? ह्ये by डॉ सुहास म्हात्रे
गेल्या साली कश्याला ? ह्ये
In reply to गेल्या साली कश्याला ? ह्ये by विलासराव
अहो ब्रम्हांडच आमचे मूळ गाव..
In reply to अहो ब्रम्हांडच आमचे मूळ गाव.. by डॉ सुहास म्हात्रे
इक्का, विडिओ नक्कीच सुरेख असणार!
In reply to इक्का, विडिओ नक्कीच सुरेख असणार! by संजय क्षीरसागर
एरर का येतेयं...
In reply to एरर का येतेयं... by सूड
येस, विडिओ बघितला
In reply to एरर का येतेयं... by सूड
सही जवाब
In reply to अहो ब्रम्हांडच आमचे मूळ गाव.. by डॉ सुहास म्हात्रे
>>>>>>लवकर ठरवा... कारण
In reply to >>>>>>लवकर ठरवा... कारण by विलासराव
ती असेल नसेल हो पण आपण तर असणारच आहोत!
In reply to ती असेल नसेल हो पण आपण तर असणारच आहोत! by संजय क्षीरसागर
आपल्याबरोबरच म्हन्जे
In reply to आपल्याबरोबरच म्हन्जे by विलासराव
आहो, स्वरुपात आपण एकच आहोत म्हटल्यावर
In reply to आहो, स्वरुपात आपण एकच आहोत म्हटल्यावर by संजय क्षीरसागर
आता स्वरुप म्हणजे काय याचा