Skip to main content

मौजमजा

नार्सिसस....

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 16/11/2009 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
"जिनियस माणसं कधी-कधी माथे फिरल्यासारखी वागतात त्याचं कारण काय असेल?" प्रा. बिरुटे, अवलियाला विचारत होते. प्रो. देसाई सुटीवर असल्यामुळे प्रा.बिरुटे अवलियांना घेऊन तळ्याकाठी बसले. एकेक भाजलेला शेंगदाणा टाइमपास म्हणून खातांना असा अचानक प्रश्न विचारल्याने अवलिया नेहमीप्रमाणे भांबावल्या सारखा झाला. "अवलियासेठ तुला सांगतो. मराठी माणसं एकत्र आली म्हणजे फ्लॅट घेतला का ? पोरीच्या लग्नाचं जमलं का ? कार्यालयातले बॉस काय म्हणताहेत ? काय म्हणतं राजकारण ? असे काही सामान्य प्रश्न विचारतात. " "हो तर ! जगरहाटीत अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मागे हात धुवून लागलेले असतात.

महाराष्ट्र खरेच पुढारलेला आहे?

लेखक विकास यांनी शुक्रवार, 13/11/2009 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या चिंतनाचा विषय "विरंगुळा" सदरात मोडला आहे हे पाहूनच प्रतिसाद द्यावात ही विनंती! ;) मनसे आमदारांनी घातलेल्या "विधानसभेतील" गोंधळामुळे मला जितके वाईट वाटले त्याहूनही अधिक वाईट आपण किती मागासलेले आहोत हे खालील चित्रफिती पाहाताना जाणवून शरमेने मान खाली गेली :) तैवानमधे एक स्त्री खासदार सभागृहात सभापती स्त्रीच्या कानाखाली वाजवू शकते (हा व्हिडीओ दुव्यावर टिचकी मारूनच बघता येईल!) -------------- फक्त अठ्ठावन्न सेकंदात लोकशाही कशी वागू शकते ते कोरीयातील सभागृहातील दृश्यात खाली पहा.

यांच असं का होतं ते कळतं नाही ... विचारवंताना समर्पित !

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 13/11/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : त्या दिवशीच्या विधानसभेतल्या अभुतपुर्व प्रसंगानंतर संकेतस्थळांवर "विचारवंतांच" एकदम पेव फुटलं.
काव्यरस

आचार्य नाडीनंदाचा माडीबोध -

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 12/11/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, विसोबा खेचरांनी नाडीऐवजी माडी घालून विडंबनाची प्रेमळ विनंती करून बक्षिसाची चिकनची तंगडी समोर ठेवली होती. त्याचे पुढे काय झाले कळले नाही म्हणून हा नवा धागा टाकायचा अगाऊपणा. त्यांना जबरी वाटले ते इतरांनी चघळावे म्हणून पुन्हा डकवण्यची मुभा घेतली आहे.

मंडळ निघालं गोव्याला

लेखक प्रभो यांनी बुधवार, 04/11/2009 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
"हमे हर साल कम से कम एक हफ्ते के लिये यहां आना चाहिये" इती दिल चाहता है चा आमीर.... असेच काहीशे वेडे बोल एकोणीस जून दोन हजार सहा ला बोलले गेले....ते होते..."आपण सगळे वर्षातून कमीत कमी एकदा भेटायचं .....तेही मस्त आठवडाभरासाठी..आणी याची सुरुवात करायची या नाताळला.....गोव्यात"....

(कवी)

लेखक चेतन यांनी बुधवार, 04/11/2009 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
सुवर्णमयींची माफी मागुन हे दु:ख विडंबन स्वतःला कवी समजुन काहीजण प्रयत्न करतात ढापले म्हणु नये म्हणून शब्द बदलतात समोर जे जे दिसेल त्यावर कविता करतात भुक्कड माणसे! पण वाचकांना अर्थ लागतोच असं नाही अथवा डोके बंद करुन लिहित असतो कवी! इथेच सगळी गोची आहे फुलांनी नटलेला वसंत अल्लड हसणारी लहान मुले प्रेम, प्रेमभंग, मन, आभाळ, श्रावण, पाउस अन् वर्षानोवर्षे चालणारे फुटकळ विषय सगळे जेव्हा लोकांसमोर येते तेव्हा काव्य झालेले असते सजलेले, सजवलेले , व्रुत्ताच्या चौकटीत असते मोहवणारे असते खर आहे- विषय साधे असतात, कवी चलाख असतो!
काव्यरस

स्वाक्षरीसंदेशगाथा

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 03/11/2009 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या सखाराम गटण्याच्या खिशात नेहमी एक लहानशी वही असायची. त्याच्या शाळेत कोणताही साहित्यिक पाहुणा आला की त्याला गांठून आणि त्यांच्याकडून एक संदेश आणि स्वाक्षरी मिळवून तो आपल्या संग्रहात भर टाकत असे. एकदा भाईकाकांनी दिलेल्या एका संदेशामुळे त्याच्या जीवनाचे वारू थोडे भरकटले होते आणि त्यांनीच त्याला छानशी पुस्ती जोडल्यावर ते मार्गी लागले याची चित्तरकथा सगळ्या मिसळपाव प्रेमींना माहीत (कदाचित तोंडपाठसुध्दा) असेल. पुढे सखारामाच्या पोराबाळांच्या संसारात ती वही गहाळ झाल्याचे ऐकले आणि आपण अशी एक वही बाळगावी अशी मनातली सुप्त इच्छा उफाळून वर आली.

(मुक्तिदाता)

लेखक चेतन यांनी शनिवार, 31/10/2009 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण मोडकांची मुक्तिदाता वाचुन हे काही तरी मोडकं तोडकं ;) प्र-भाव, तर्र, बोळा देशी, विदेशी, वारुणी! बालांच्या कल्लोळात, इंद्रियांच्या अविष्कारातही उच्चाराच्या अपेक्षेत, उद्गाराच्या प्रतीक्षेतही तराठलेल्या डोळ्यांत, जडावलेल्या पापण्यांतही विरलेल्या विस्मृतीत, दाटलेल्या आठवणींतही सुन्न एकटेपणात, समुहांच्या दाट गर्दीतही, सकाळी दुपारी, संध्याकाळी रात्रीही भरलेल्या मद्यालयात, आभास अन् अस्तित्त्वाचा आसक्त मुक्तिपावक टुल्लतराठ बेवडा
काव्यरस