Skip to main content

मांडणी

ब्राह्मणद्वेष

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 07/06/2025 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
ब्राह्मणद्वेष ===== प्रत्येक व्यक्ती लहान वयात जास्तीतजास्त संस्कारक्षम असते, त्याप्रमाणे लहान आकारातला समूह हा बदलांना पटकन सामोरा जाऊ शकतो. त्यात ब्राह्मण मूळात एक नसल्याने (सोलापूरकरसारख्या प्रकरणात ते ठळक दिसते.), त्यात ब्राह्मणत्व निश्चित काय हे आज सांगता येत नाही, त्यामुळे आता ब्राह्मणांचे बरेचसे प्रश्न हाता बाहेर गेल्यात जमा आहेत.

रस्त्यावरील अपघात --चूक कोणाची?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 05/06/2025 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी सध्या बरेच दिवस पुण्यातील (किंवा इतरत्रही) रस्त्यावरील अपघातांचा विषय चर्चेत आहे. एकुणातच अपघातांचे प्रमाण आणि चालकांची मग्रुरी किंवा बेपर्वाई वाढली आहे असा एक सार्वत्रिक निष्कर्ष त्यातून काढला जातो. बहुतेक वेळा अपघात झाला की चूक चालकाचीच असे समजून त्याला चोप दिला जातो. पोलीस केस होते वगैरे वगैरे. पण याची दुसरी बाजू कोणी बघतो का? मी चालकांच्या बाजूने मुळीच बोलत नाहीये, अपराध्याला शासन हे झालेच पाहिजे पण नेहमी चूक फक्त चालकाचीच असते का? मला खटकणारे काही मुद्दे इथे मांडतो आहे --रस्त्यावरील अतिक्रमणे - आजकाल अनेक मुख्य रस्ते आणि गल्ल्या अतिक्रमणाने व्यापल्या आहेत.

वायुसेनेतील आठवणी – भाग ४ "शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे"

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 02/06/2025 22:04 या दिवशी प्रकाशित केले.

वायुसेनेतील आठवणी – भाग ४

"शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे" "सर, आर यू द नेफ्यू ऑफ कॅप्टन पी.एन. ओक? हू वॉज इन आझाद हिंद फौज विथ नेताजी सुभाषचंद्र बोस?" (“सर, तुम्ही कॅप्टन ओक यांचे पुतणे आहात का? जे नेताजींसोबत आझाद हिंद फौजेत होते?”) "यू नेव्हर मेंशनड टू मी व्हाईल इन पुणे! इट्स डन डील… आय विल गो टू कॅप्टन ओक सर टू सॅल्युट हिम!" (“तुम्ही हे पुण्यात असताना कधी सांगितलंच नाही!

कॉपल पांडे जी एस - भाग ३

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 23/05/2025 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
वायुसेनेतील आठवणी -

कॉपल पांडे जी एस – भाग ३

“कला आणि करुणेचा साक्षात सिपाही – कॉपल पांडे”

"मेन लाईक जीएस पांडे आर जीनियस अँड दे आर अबव्ह ऑल एक्सपेक्टेशन्स."

(“जीएस पांडेसारखे माणसं असामान्य बुद्धिमत्तेची असतात आणि सर्व अपेक्षांच्या पलीकडे जातात.”) माझं मन पुन्हा भूतकाळात हरवलं… दुपारी २ वाजता मी ऑफिसमधून बाहेर पडत होतो. पवार, ऑफिस बॉयने माझ्या कारमध्ये ब्रीफकेस ठेवली. रियर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं तर कुणीतरी सावधपणे माझ्या दिशेने येत होतं.

त्यांनी हल्ला केला... आम्ही कडिनिंदा केली!

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी मंगळवार, 29/04/2025 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
२००७ – त्यांनी समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट करून ६८ लोक मारले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०११ – त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करून २६ लोक मारले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०१३ – त्यांनी हैदराबादमध्ये १८ जण उडवले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०१४ – वाघा बॉर्डरवर ६० लोक घायाळ, आम्ही पुन्हा तीच कडिनिंदा, तीच निर्बंधांची पीपानी वाजवली. २०१५ – गुरदासपूर, ७ ठार, पुन्हा 'खेद व्यक्त', आणि निर्बंधांची पीपानी ! २०१६ – पठाणकोटमध्ये ७ जवान गेले, कडिनिंदा नी निर्बंध…. २०१६ – उरीत १९ जवान मारले, सर्जिकल स्ट्राईक केली, पण पुन्हा शांततेचे गीत गायले! २०
काव्यरस

[स्वैर] वाळवी वि० बुरशी

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 19/04/2025 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
डाव्या-उजव्याचा वर्णपट खुप मोठा पण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे अपवाद आहेत, नियम नाहीत... ज्यांना समूहात आणि परंपरेत सुरक्षित वाटते ते सहसा उजवीकडे झुकलेले असतात. त्यांना मुक्तपणा म्ह० स्वैराचार वाटतो. त्यांना समूहाचा व्यक्तीच्या जीवनावर जास्तीत जास्त ताबा ठेवायचा असतो. मग उतरंडीला महत्त्व येते. उतरंडीमधली सर्वात डोक्यावरची व्यक्ती खालच्या व्यक्तीचे महत्त्व आणि भवितव्य घडवते. त्यात त्या व्यक्तीचे नुकसान झाले तर त्याचे काही तरी करून उदात्तीकरण करून भ्रम निर्माण करायचा असतो. उजव्यांनी सर्वात जास्त अन्याय स्त्रियांवर केला आहे.

खेळ मांडीयेला-भातुकली खेळ

लेखक Bhakti यांनी बुधवार, 16/04/2025 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
अ लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे." ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?" मनात‌ल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)" तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय" " ओके , बार्बीपण असेल का तिथे ?" "चल तुला ठकीच आणते" ती आपली शांतप

'मिसळपाव' चा गदारोळ

लेखक माहितगार यांनी बुधवार, 16/04/2025 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. **कविता:** **शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ** चार भिडू डावे, उजवेही चार, कुंपणाच्या वर, दोन भिडू फार. भिडू भिडतात, त्वेषे परस्परा, मौज ही इतरा, फुकटची जरा. राजकारणाच्या व्यतिरिक्त काही, घडतची नाही, देशात ह्याही. ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती, आता झाले अती, हौस फिटे किती. अवांछित मजकूर, डोळे फिरवतो, दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो. मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा, वाद-विवाद, विषय नानाच. बातमी ताजी, चर्चा नवी, मतमतांतरे, इथे दाटली जगी. 'मिसळपाव' चा थाट, न्यारा असा, प्रत्येकाचा आवाज, इथे घुमतो दाही दिशा. पण, हे भिडू,

कल्पकतेची ऐशीतैशी

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 09/04/2025 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
कल्पकतेची ऐशीतैशी =========== सहसा कोणतीही नवजात कंपनी काही कल्पक उत्पादनाचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न करते. उत्पादन बाजार पेठेकडून स्वीकारले गेले तर कंपनी व्यवसाय चालू ठेवते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काही भारतीय नवजात कंपन्यांवर अकलेचे तारे तोडले आहेत, ते अतिशय संतापजनक आहेत.

गीतारहस्य चिंतन-१

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 04/02/2025 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
मला साधारणतः खुप प्रश्न‌ पडतात.त्यात जर भारतीय अध्यात्मावर प्रश्न असतील तर किती तरी काळ ते अनुत्तरितच राहायचे.पण जानेवारी २०२५ पासून हा जो लोकमान्य टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ वाचनास सुरूवात केली आहे.त्यामुळे अनेक प्रश्नांची सहज उत्तरे मिळत आहेत.या ग्रंथातील आकलन वा लिहून काढावे असे वाटलेले ज्ञान इथे देत आहे.हे सर्व टिळकांचे मत ,विचार आहेत,जे तुम्हाला नक्कीच भरघोस ज्ञान देईल. गीतारहस्य -कर्मयोगशास्त्र प्रकरण १ १.विषयप्रवेश अद्वैत मोक्ष द्वैत विशिष्टाद्वैत, पातंजलयोग हे निवृत्तिपर मार्ग गुलामी होती असे कोणी म्हटले तर ? भगवद गीतेवर टीका