Skip to main content

कविता

"पाऊस येईल"

लेखक अमेय६३७७ यांनी शुक्रवार, 06/12/2013 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
नको फुलवूस श्वास नको हताश होऊस तुझ्या अंगणातही रे आता पडेल पाऊस येता बरसून धारा मेघव्यथेला घेऊन सहवेदनेची दिठी, डोळा जाईल भरून जाणीवाही नवनव्या उरातून वाहतील जे ना आकळले कधी माग त्याचा काढतील असे जगासाठी जुना तुझा पहिला असेल कायामन भिजताना खूप काही गवसेल नको आकांत जिवाचा नको पाण्यामध्ये देव फक्त स्वागतासाठी तू भुई नांगरून ठेव -- अमेय

अतृप्ती-एक चिरंतना

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 05/12/2013 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
अतृप्त असावे सारे मन तृप्तीतूनच पाही तृप्ती'ही असते क्षणिका अतृप्ती चिरंतना'ही मानवास जन्मी एका नीज सांगे ति ही काही मन क्षणात चाखे तिजला अन् क्षणात काही नाही सारा हा जन्म तरिही का धावे तिच्याच पाठी मरणाही भेटी येता अतृप्ती उरते गाठी ऐश्या या अतृप्ती'ला मी देतो एक सलाम मन तृप्तीचे ना वैरी अतृप्तीचे न गुलाम ==०==०==०==० ************* अत्रुप्त ************* https://lh5.googleusercontent.com/-jahNQ2N2XGE/TqQt3Ev4zAI/AAAAAAAABD4/l0WHSRpPc
काव्यरस

परिपूर्ण गीता

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 04/12/2013 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
वळे न माथा दिशा एकली मूक चालणे आता स्पंदने हरवली आकाशी पार्थिव उरली गाथा काहुर ब्रह्मानंदी विरले कवेत तुझिया नाथा भोगुन झाले प्राक्तन आत्मा म्हणे जाहलो जेता मी-माझेपण, रिक्त-रितेपण व्यथाच नाही दाता निराकार आकार तुझे परिपूर्ण जाहली गीता ………………… अज्ञात
काव्यरस

जगणं

लेखक psajid यांनी मंगळवार, 03/12/2013 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
महाग जगणं कलंकी पदवी, बंबाळ चिरंजीव अश्वथामा !!!! मिळतात गळा घालून माळा, कापतात नरडी माघारी !!!! नेसतात सोवळे घालतात डाका, डोमकावळे रातंदिन !!!! भेटते यश नाहीत पैसं, उघडी मांडी टीचभर !!!! महाग मरण नाही सरण, गटारी भरल्या मूडद्यान्ही !!!! श्री. साजीद यासीन पठाण
काव्यरस

प्रेम-एक काव्यगुण

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 01/12/2013 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाच्या उगमी येथे, सहजी कवित्व झरते जे बोलत जातो मी ही ते ते कवित्व होते जरूरी ना काव्यगुणांची श्वासासम सहजी येते कुणी न करताही तेथे ती-कविता होऊन जाते उस्फूर्तता ही कैशी?, प्रतिभेशी नाही घेणे ते देवाजीच्या घरचे सहजाचे साधे लेणे. कधी हात तिचे दिसतात मज मेहेंदी दिसून येते स्पर्शाची अठवण का ही? मग मनात उरुनी जाते? शरीराचा गंध तसाही मज वेडाऊनच जाई शब्दांचे सरते काम अन कविता केवळ राही प्रेमाच्या गावापाशी मी भिऊनी उभा आहे. आकर्षणी सीमा रेषा हलकीच मधेही आहे. हे नकळत कैसे कोडे ठरवून मनाला पडते? सुटकेची आली वेळ तरी सुटका कोठे घडते???
काव्यरस

वसा संस्कृतीचा

लेखक BONGALE SANTOSH SHAHU यांनी शनिवार, 30/11/2013 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
वसा संस्कृतीचा ऋण सावकारीच फेडण्या कुणब्याला दुष्काळाचा शाप रात्रंदिन कष्ट करायचा नाही थांबला कधी बाप उठून पहाटे रोज माय सारवते दुःखाच्या भिंती सोसत चटके दारिद्र्याचे दिस रोज मावळती राणी डुलणाऱ्या पिकामंधी दिसू लागे साखर गोड जल्म गेला मातीत अवघा तळहाताला आले किती फोड गाई गुरांच्या हंबरात वाढे संसार शेणामातीचा सुख नांदावे घरीदारी वसा जपतो संस्कृतीचा थकलेला चार घास खाऊन जाई तृप्त होऊन वाटसरू जिच्यावर जगतो आम्ही त्या काळ्या आईला कसं विसरू संतोष बोंगाळे

मैत्री......एक आगळंवेगळ नातं

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 28/11/2013 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
(सदरचा लेख याला कविता म्हणावी की निबंध काही समजत नव्हते माझी मुलगी आरती दहावित शिकते तिने स्वता तयार करुन वाचयला दिला नि थक्क झालो. तिचे हे पहिलेच लेखन वाचुन खुप आनंद झाला. पहा आपल्याला कशी वाटते.) कु. आरती आनिल तापकीर , भारती विध्यापीठ कन्या प्रशाला , कोथरूड ,पुणे गाव- मुलखेड . तु मैत्रीण नाहीस , मैत्रीतला पहिला शब्दच तु आहेस . तु एक दिवस जरी शाळेला आली नाहीस कि असं की काही तरी घरीच विसरले . तुझ्यासारखी मैत्रीण मिळण्यासाठी नशीबच लागते . मैत्री करण्यासाठी प्रेम लागतं . तू माझं जीवनच बदलून टाकलं आहेस . मनातलं स्वप्न साकार करण्याची जिद्द दिली आहेस.

ऐक सखे

लेखक अमेय६३७७ यांनी गुरुवार, 28/11/2013 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला उसासे हवे आर्जवांचे   नवी वागण्याची तर्‍हा ही कशी उगा श्वास श्वासांस जाळीत येतो  फिरे जो तुझा हात देहानिशी  तिथे चंद्र माथी चढूनी नभाच्या  मनासारखे चांदणे शिंपुदे  रतीला म्हणावे तुझ्या साजणाचे  जरासे निखारे विखारास दे   प्रिये खेळ आहे खरा संयमाचा  कसे आवरावे कळेना तुला  अगे मंद चालीतली रागदारी  असे ही नव्हे हा स्वरांचा झुला  जसे मोगर्‍याने फुलावे सुखाने  तसे वाढवूया निशेला सखी   हळू माधुरीचे भरू देत प्याले  उधाणास येऊ नको सारखी    -- अमेय

बेधुंद मनीचे बोल...

लेखक आनंदमयी यांनी गुरुवार, 28/11/2013 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
बेधुंद मनीचे बोल निसटून चालले होते चंचलशा त्या लहरींना मी हळूच टिपले होते ते बोल खुळेसे काही अविचल त्या अस्फुट तारा वळणाशी भिरभिरणारा तो सोसाट्याचा वारा बांधून कधीचे ज्यांना मी उरात जपले होते मी बोल बोलता सारे अस्तित्वच बहिरे झाले अविभाव आर्त स्वत्वाचे ते अजून गहिरे झाले जिद्दीच्या तेज कणांनी आयुष्य रापले होते त्या उधाणलेल्या लहरी संकोच गोठवुन गेल्या, विझलेल्या सामर्थ्याला अवचीत पेटवुन गेल्या...! मी ध्येय गाठले तेव्हा हे भान हरपले होते... © अदिती शरद जोशी

मडकी

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 27/11/2013 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळाच्या सावलीत जमिनीच्या पोटातून झरणारी माया पित शांत पहुडली होती सगळी कुणा दोन अनोळखी हातांनी ओंजळीत मावतील तेव्हढी उचलून नेली कच्ची बच्ची एकमेकांची ओळख घट्ट धरून मुठीत एका अनोळखी वर्तुळावर जावून पडली सारी सुरु झाला खेळ तशी, कधी भिजत, कधी थिजत शोधत राहिली हरवलेली जमिन फिरत राहिली काळचक्रावर भोवळ येईस्तोवर काही घडली,काही मोडली दोन हात तिम्बत राहिले त्यांना मनाजोगता आकार येईपर्यंत भाजून काढताना, हात कुणालातरी सांगत होते 'तावून सुलाखून निघाल्यावरच पक्की होतात मनं… वाजवून बघावीत एकदा , आणि नेभळट वाटली तर मांडूच नयेत बाजारात.' ऐकता ऐकता शोधत राहिली आपल आभाळ आपल्याच आतल्या अंध-या पोकळीत पुन्ह