मिसळपावावर येत असलेल्या सूक्ष्म/दिर्घ वगैरे कथा, पीजे वाचून एक जुनी ऐकलेली गोष्ट आठवली, जरा चढवून लिहीत आहे...
विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. त्याने झाडाजवळ जाऊन वेताळास खांद्यावर घेतले आणि परत मौनव्रतात पादक्रमण करू लागला. वेताळ विक्रमादित्यास परत पाठीवर उताणा पडलेल्या अवस्थेत राहून गोष्ट सांगू लागला...
देव प्रसन्न झाल्यामुळे सुखाने राहात असलेल्या लाकूडतोड्याच्या बायकोने आपल्या नवर्यास (म्हणजे त्याच लाकूडतोड्यास) कुर्हाड पडलेली आणि देव प्रसन्न झालेली विहीर दाखवण्याचा हट्ट केला. लाकूडतोड्या पण मोठ्या गर्वाने तिला घेऊन गेला.
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल.
शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक.
नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच!
पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.
शेवटची बस चुकेल की काय म्हणून मी धावत चाललो होतो. तर पाठीमागून हाक आली - "ए डीजे, माझ्यासाठी बस थांबव!" मी आवाजाला उत्तर दिले - "ओके, नीना." पण मी ड्रायव्हरला काही सांगायच्या आत नीना बसच्या दाराशी होती.
माझ्याशेजारी तिला जागा करून तिला म्हणालो, "इतका उशीर का करतेस ऑफिसात? ही शेवटची बस चुकली असती म्हणजे?" "वा रे वा! तू मोठा वेळेवर निघालायस." "नाही, म्हणतो की आधीच लुकडीसुकडी आहेस, अशी जेवणे चुकवशील तर वाळूनच जाशील." अशा प्रकारची वैयक्तिक टीका मुलींना चालते, असा माझा अनुभव आहे.
लासवेगास येथे नुकताच " ६६६ वा आंतरराष्ट्रीय भूतंखेतं व गूढं साहीत्य मेळावा" पार पडला. देशविदेशचे ख्यातनाम ब्लॉगप्रेमी ज्यांनी अनेक भूतंखेतं व गूढं साहीत्य मोठ्या प्रेमाने पाळले आहे, ते सर्व दरवर्षी न चुकता ही वारी करतातच. नेत्रदीपक नसला तरी डोळे पांढरे करणारा हा सोहळा, डोळे भरभरून पहायला असंख्य भेदरट मोठ्या उत्साहाने जमतात. एकमेकांना घाबरतात व घाबरवतात.
तर अश्या ह्या सोहळ्याला ह्यावर्षी १० भाग्यवान "भयाण चाहता" स्पर्धेत आमचा नंबर लागला. काय करणार, आमचा फोटो (रुप) पाहून पहील्या १० मधे तर नक्कीच वर्णी लागणार ह्याची खात्री होतीच. मोठ्या धडधडत्या अंतःकरणाने संमेलनात स्वारी पोहोचली.
काही फायदा होतो म्हणून वाचन करु नये, हे जरी खरं असलं तरी त्यातून वेगवेगळे अनुभव आपण लेखकाच्या दृष्टीतून घेऊ शकतो. नाहीतर एका आयुष्यात असे घेऊन घेऊन अनुभव तरी किती घेणार? बसल्याजागी वेगवेगळे अनुभव - व्हिकॅरियसली म्हणजे दुसऱ्याच्या उसन्या दृष्टीतून का होईना, आपण पुस्तकाच्या वाचनातून घेऊ शकतो. 'का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रु प्रकटिता', असं कमलिनीबद्दल ज्ञानेश्वरीत म्हटलंय तसंच काहीसं.
अर्थात कुणाला कुठला अनुभव, कुठला विचार आवडेल हे सांगणं अवघड. त्या त्या व्यक्तीच्या पिंडावरती ते अवलंबून.
आभाळ फाटल्यागत पाऊस पडत होता. डोळं उघडायला सुदा सवड देत नव्हता. आणि तसल्या पावसात मधुआण्णा सायकल दामटीत उंब्रजला निघाला होता. उगंच एक हात डोळ्यावर धरून रस्त्याचा अंदाज घेताना उलट्या बाजूनं कुणीतरी वळखीचं चालल्यागत वाटलं तशी त्यानं हाक दिली, "आरं ए संपा कुठं निघालायंस रं?". दुसर्या बाजूनं सायकलवर मुंडकं खाली घालून तराट चालल्याला संपा कसाबसा ब्रेक लावून थांबला. आणि त्याच्या अगदी समोर धाडकन झाड कोसळल्याचा आवाज झाला. संपाच्या डोळ्यातनं पाण्याचे वघळ खाली येऊन पावसाच्या धारेत मिसळून जात होते.
अभिजित..
तराटः वेगात
वघळः ओघळ