Skip to main content

कथा

सुंदर चित्रं पहायला मला बरं वाटतं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 18/09/2008 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं असं झालं,मी निलकंठ केळकरांकडे माझ्या इनकमटॅक्सच्या काही कामा करता गेलो होतो.त्यांच्या ऑफिसात तशी बरीच गर्दी होती.मला जवळ बोलावून ते मला म्हणाले, "तुम्ही घरात जाऊन बसा.ह्या सर्व कस्टमरांची सोय लावून मग मी आत येतो.आमाची संध्या नागपूरहून थोडे दिवस माहेरपणासाठी आली आहे.तिच्याशी थोड्या गप्पा मारा.

माटुंग्याचे वामनकाका

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 17/09/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
ते आमच्या वडीलांचे काका, आम्ही त्याना, "माटुंग्याचे आजोबा" म्हणायचो. नावाप्रमाणे वामनकाका उंचीने "वामनमुर्ती"च होते.शिक्षण एव्हडं तेव्हडंच त्यामुळे उपजीवीकेचं सोपं साधन म्हणजे "आचारी" होणं.संध्याकाळी पाच वाजल्यावर खांद्यावर सफेत झोळी जिच्यात किलो दोन किलोच्या दोन चार भाज्या, कोथिंबीर, मिरची, नारळ, वगैरे मसाला पुरेल एव्हड्या आकाराची असायची.सुरवातीला होता तो तिचा सफेद रंग आता सुरण,अळू,आणि असल्याच काही भाज्यांमुळे त्या झोळीचं सफेदपण जाऊन रंगी बेरंगीपणा आला होता. पायात चांबड्याची पट्या पट्याची चप्पल डोक्यावर "गांधी "टोपी,डोळ्यावर गांधी टाइप गोलाकृती आणि कानावर काड्या ओडून बसवतात तसा काळा चष्मा

सामान्य माणूस असामान्य गोष्टी करतो तेव्हा......

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 16/09/2008 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणातल्या तुळस नावांच्या एक खेड्यात रमाकांत तुळसकरने खूपच सामाजीक कार्य केलं आहे,असं माझ्या एका मित्राने मला सांगितल्याने मला माझ्या शाळेतला दोस्त रमाकांत तुळस्करची आठवण आली.हा तोच तर नसेल,असं कुतुहल मनात येऊन मी त्या खेड्यात मुद्दाम गेलो.आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मनातला तोच रमाकांत होता.मला इतक्या वर्षानी पाहून त्याला ही खूप आनंद झाला. इकडतिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्याला म्हणालो, "काय रे बाबा!

एक होता शिंपी (एक छोटीशी गोष्ट)

लेखक मन यांनी मंगळवार, 16/09/2008 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
एक होतं आटपाट नगर. त्यात होता एक शिंपी. त्यानं नुकताच बापाचा व्यवसाय सांभाळला होता.आणी हळुहळु शिंपी काम सुरु केलं होतं. जीवन त्याचं कसं छान चाललं होतं. नवनवीन,वेगवेगळे कपडे तो शिवत होता. आणि चरितार्थही व्यवस्थित चालत होता. पण एवढ्यात झालं काय की त्याला टोचली एक सुइ. त्याच्या हाताखाली काम करणारी एक छोटिशी सुइ. झालं . तो भडकला.एवढिशी सुइ, वाकड्यात जातेच कशी? त्यानं दरडावलं सुइला..झापलं मस्त धरुन. पण सुइ म्हणली "मी तर पडले सरळ-सोट्.बोलुन चालुन एक सरळ्-टोकदार सुइ. मी कशाला जाउ वाकड्यात? तुम्ही शिवता तिथं पोचणं, टाके मारणं इतकच तर माझं काम." पण शिंपी काही ऐकेना. त्यानं ठरवलं "देउ हिला हाकलुन.

तुझे भुल जाना जाना...

लेखक फटू यांनी सोमवार, 15/09/2008 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवारची संध्याकाळ संपण्याच्या बेतात होती. पण संधीप्रकाशाचा कुठेही मागमुस नव्हता. अगदी लख्ख उजेड होता. इकडे कॅलिफोर्नियामध्ये रात्रीचे नऊ वाजले तरीही उजेड असतो. आपल्याकडे असं नसतं ना. सहा साडे सहा झाले की अंधार पडायला सुरुवात होते. आणि सात वाजता तर अंधार होऊनच जातो. आपल्याकडेही जर इकडच्या प्रमाणे रात्री आठ वाजता दिवस मावळतीला जाऊ लागला तर... अरमानचं आताच साहीलशी जिमेलवर बोलुन झालं होतं. साहील त्याचा ओरकुटवरचा मित्र. कुठूनतरी "फ़्रेंड ऑफ फ़्रेंड" असं करत त्या दोघांची मैत्री जुळली होती. अर्थात आभासीच. इंग्रजीत सांगायचं तर व्हर्चुअल. जिमेलवर बोलताना इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.

किती सुंदर विचार

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 15/09/2008 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.त्याना जरा बरं नव्हतं.मला म्हणाले, "तुमच्या सहवासात राहून मला पण काही विचारांची प्रेरणा येते." मी म्हणालो, "भाऊसाहेब,जे सुचतं ते निर्मिती होण्यासाठीच असतं.तुम्हाला जे सुचेल तेच मला सुचणार नाही.आणि हीच तर गम्मत आहे.निसर्गातच बघा,किती विवीधता आहे.एका सारखं दुसरं नाही.मी वाचलंय समुद्रात असंख्य जीवजंतू,वनस्पती आहेत की पुढली हजार वर्ष जरी माणसाने त्याची डेटाबेस करायची ठरवली तरी प्रयत्न पुरा होणार नाही.बरं ते राहूदे तुम्हाला काय सुचतं ते सांगा" मला म्हणाले, "निसर्गाकडून खूप काही शिकता येतं.दुसऱ्याला काही देताना गर्वाने अथवा घमेंड करून देऊ नये.उलट आदराने व प्रे

संपूर्ण जगाची सफ़र अवघ्या ५,०००/- रुपयात

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 14/09/2008 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा साधारण १९८५ सालची. कथानायक माधव आणि नायिका रमा त्या काळाप्रमाणे चाळीतल्या दोन खोल्यात राहणारे तसे मध्यमवर्गीय सुखी जोडपे. रमा भविष्याविषयी काहीशी जागरूक तर माधव वर्तमानात रमणारा बराचसा बेफ़िकीर वृत्तीचा. विज्ञान कथा वाचन आणि भटकंती हे माधवचे छंद, तर असल्या छंदात पैसे उडवण्यापेक्षा बचत करून घर, जमीन-जुमला अशी स्थावर मालमत्ता वाढवायची असे रमाचे व्यवहारी विचार. असे असले तरी त्यांचे निदान अजून तरी खटके उडत नव्हते कारण त्यांच्या लग्नाला आता कुठे जेमतेम वर्षं पूर्ण होत आले होते. अशात एक दिवस माधवला त्यांच्या कारखान्यात वेतनवाढ होत असल्याची बातमी कळली.

मला कळलेला "अद्वैत सिद्धांत - ओळख "

लेखक मन यांनी रविवार, 14/09/2008 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता नाडा एकदा काय झालं; नाड्याची गाठ सुटेना. तशी सुटणं अवघड नव्हतं. कुठलही एक टोक मागं सरलं तर गाठ सुटण्यासारखी होती. पण कुठल्याच टोकाला मागं जाणं मंजुर नव्हतं. त्यापेक्षा,मोकळं होण्यासाठी एक्मेकाला ते खेचु लागले. पण झालं उलटच. ताण वाढला. गाठ आणखी पक्की झाली. खेचुन काहिच होत नाही म्हाल्यावर ते एकमेकाला ढकलु लागले. त्यानं गाठीचा पीळ आणखीनच वाढला. आता तर गाठ सुटायची काहिच चिन्ह दिसेनात. सुटका करुन घेण्यासाठी त्या दोन्ही टोकांनी आता जोर वाढवला. प्रचंड ओढाताण सुरु झाली. आणि यातच... यातच एक टोक तुटलं. गाठ एकदाची तुटली.

एक अमेरिकन प्रेमकथा

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 14/09/2008 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
एक अमेरिकन प्रेमकथा ऒर्कुटवर काही असे काही लोक असतात की जे स्वत:चे पूर्ण नाव, सविस्तर व खरा पत्ता, तसेच खरा दूरध्वनी क्रमांक देखील प्रोफ़ाईलवर लिहून ठेवतात. इतकेच काय जोडीला त्यांची खरे छायाचित्रे देखील हजर असतात. तर इतर काही प्रकारचे लोक खरा दूरध्वनी क्रमांक व पत्ता तर सोडाच आपले खरे नाव ही लिहीत नाहीत. तर स्वत:ची छायाचित्रे म्हणून विदेशी बालकांची छायाचित्रे लावून ठेवतात. (कृपया इथे कुणालातरी व्यक्तिश: दुखविण्याचा उद्देश असल्याचा गैरसमज करुन घेऊ नये.) पुन्हा त्यात आश्चर्य म्हणजे अशा भिन्न प्रकारच्या लोकांमध्ये मैत्री देखील होते. हे पाहून मला पूर्वी वाचलेली एक अमेरिकन प्रेमकथा आठवली.

वेड्या आठ्वणी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 11/09/2008 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
अक्का, आपली माणसं चटका लाऊन जातात,तशी तूं गेलीस.आपली माणसं जातात पण त्यांच्या आठवणी येतात."आठवणी येतात",असे आपण म्हणतो कारण आठवणी कधी जात नाहीत.काही आठवणी वेड्या असतात म्हणून त्या सारख्या येत असतात. तूं बारा एक वर्षाची होतीस.मी सहा वर्षाचा होतो.तुझ्या डाव्या हाताच्या मुठीत माझं बोट धरून तुझ्या बरोबर चालत असताना तिन वर्षाचा सुधाकर तुझ्या कमरेवर,माझ्या हातात फुलाची परडी,असे आपण तिघं मागच्या परड्यात जास्वंदीची फुलं काढायला जात असूं.ही आठवण जेव्हां तूं गम्भीर आजारी झालीस तेव्हां प्रकर्षाने आठवली.