Skip to main content

कथा

अळूची भाजी खाऊन वाचलो तर.......

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 08/10/2008 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांचं नुकतंच लग्न झालं होतं.नेहमीच्या रिवाजाप्रमाणे त्यांना त्यांच्या सासरवाडील एका लग्नाच्या निमीत्तानं जेवायला बोलावलं होतं.ताट, पाट मांडून पंगत तयार झाली होती.

विनोदी कथा : सळई, साई आणि बाजीगर बीरबल

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 08/10/2008 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: यात कुठल्याही घडलेल्या घटनेवर टिका करण्याचा तीळमात्र उद्देश नसून, ती घटना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ज्या पद्धतीने मांडतात त्यावर टिका करण्याचा हेतू येथे आहे. न्यूज चॅनेलवर खाली पट्ट्या सरकत असतात. त्यावर लिहिलेले असते- थोड्याच वेळात आपण बघणार : 'रॉड आणि गॉड' (सळई आणि साई)..... सळई नाही घेवू शकली जीव..... यमाची सळई, साई माघारी पळवी...... एका माणसाच्या डोक्यातून आरपार गेली सळई..... तो मृत्युला पळवी. ( एक प्रतिनिधी- "श्री आक्रमक बातमीदार" हातात माईक घेवून पळतच येतो.

बटाटा हाईट्स

लेखक अरुण वडुलेकर यांनी मंगळवार, 07/10/2008 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
बोरिबंदर यायला तीनच स्टेशनच राहिली, तसा, लिमयेचा आवाज कानावर येऊन आदळला, " लिखित्या ऊठ रे. डाऊनच्या लोंढ्यात मरायचंय का? च्यायला! लिखित्या, लेका झोप कशी रे लागते एवढ्या गर्दीत." खरंच आज झोप अगदी अनावर झालेली होती. मुंबईतील महानगरपालिकेतील चांगली नौकरी आणि भरभक्कम पगार केवळ या दोनच दोन जमेच्या बाबी वगळता सध्याचे बाकी सारे जीवन जीवघेण्या धकाधकीचे होते. चांगल्या नौकरीचा प्रश्न मुंबईने सोडवला होता तरी निवासाचा प्रश्न खर्डी सारख्या दूरवरच्या गांवात येऊन सुटला होता. प्रवासातच रोज जाऊन येऊन किमान तीन तास जात होते. विश्रांतीही जेमतेमच होत होती. त्यातून वाचनाचे व्यसन लागलेले.

विज्ञानशास्त्र, आपलं मन आणि जीवन विकसित करतं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 06/10/2008 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई बरेचसे मुडमधे दिसले.तळ्यावर जाता जाता ते मला वाटेतच भेटले.तिथूनच आम्ही अशा विषयावर बोलायला सुरवात केली,की मला वाटलं भाऊसाहेब आपल्या कॉलेज मधल्या जुन्या आठवणी न काढता काही तरी नवीन माहिती देतील.पण झालं उलटंच. मी त्याना म्हणालो, "भाऊसाहेब,आजकाल मुलांना नुसतं वर्गात शिकवत नाहीत.त्यांना जे वर्गात शिकवतात,त्याचं प्रॅक्टीकल दाखवण्यासाठी बाहेर पण घेऊन जातात.आणि अलीकडे सायन्स म्युझीयम,प्लॅनेटेरीयम,मुलभूत संशोधन करणार्‍या संस्था अशा ठिकाणी नेऊन त्याना माहिती देतात.त्यामुळे विज्ञानाचा प्रसार परिणामकारक होतो.तुम्हाला नाही का वाटत?" मी एव्हडं बोलायचीच फुरसत,प्रो.देसायानी आपल्या लहानपणातल्

सोबत

लेखक आगाऊ कार्टा यांनी रविवार, 05/10/2008 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
नाना भटजी हे गावाच्या पंचक्रोशीतले एकमेव भटजी... तसे भिक्षुकी करणारे आणखी एक दोन जण होते.. पण नाना हे जुनेजाणते आणि स्वभावाने अत्यंत गरीब त्यामुळे त्यांना मागणी फार.. वर्षभर काहीनाकाही धार्मिक कृत्ये चालू असल्यामुळे नानांना अजिबात वेळ नसे. त्यातून गणेशोत्सवात तर बघायलाच नको. सकाळी जे पहाटे ४वाजता बाहेर पडत ते संध्याकाळी दमूनभागून घरी परतत.

डॉ. बंडूमामा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 04/10/2008 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
सत्येंद्र आजगांवकर म्हणजेच डॉक्टर बंडूमामा.माझ्या आईचा चुलत भाऊ.आईला सख्खे भाऊ नव्हते.बंडूमामा उंच,गहूवर्णी आणि लाघवी स्वभावाचा.मधूनच एक नाकाची पुडी दाबून दुसऱ्या नाकपुडीतून "सॉक,सॉक "असा आवाज काढायची संवय त्याला जडली होती. बंडूमामाची हजेरी त्यावरून ओळखावी.बंडूमामाची घरची गर्भश्रीमंती आणि घरच्या शैक्षणीक वातावरणाचा वारसा,यामुळे बंडूमामाला वैद्दकीय शिक्षण घेणं फारसं कठीण झालं नाही.शिक्षण पूरं झाल्यावर जे.जे.

"जीवन असं जगावं की नंतर पश्चाताप होऊ नये."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 03/10/2008 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
असाच मी एकदा सूट्टी घेऊन गोव्याला गेलो होतो.गोव्याच्या समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक छोटी छोटी घरं आहेत.एक घर भाड्याने घेऊन मी थोडे दिवस राहत होतो.आमच्या बाजूच्या घरात एक जोडपं असंच काही दिवस मजेत घालवण्यासाठी येऊन राहिलं होतं.सुरवातीला आम्ही सकाळीच ऊठून समुद्र किना‌र्‍यावर फिरायला म्हणून जात होतो.सकाळीच कोळ्यांच्या मासे जाळ्यात पकडून टोपल्या भरभरून आणणार्‍या मोठ्या होड्या किनार्‍यावर आल्यावर कुतुहल म्हणून निरनीराळ्या प्रकारचे मासे निवडून आणलेल्या टोपल्यामधून आम्हाला हवे ते मासे त्यांच्याकडून विकत घेऊन दुपारच्या जेवणाला त्याचा उपयोग करायचो.ताज्या मास्यांची चव निराळीच असते.त्यामुळे रोज मासे ख

"काय करूं मी बोला,घरी बाळ ना पुन्हां"ललिताचं जीवशास्त्र

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 30/09/2008 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
"ते इवलंस मृत- शरिर माझ्या हातावर होतं,आणि माझ्या हाताच्या बोटांच्या टोकांवर त्याचं डोकं संभाळलं होतं आणि त्याचे इव्हलेशे कुल्हे माझ्या हाताच्या तळव्यावर सामावून गेले होते.मला त्यावेळी रडूं पण आवरंत नव्हतं.पण काय करणार?" गडकऱ्याना तिन मुली.त्यांची धाकटी मुलगी त्यामानाने हुषार होती.तिला पहिल्यापासून वैद्दकीय शास्त्राची आवड,आणि तिच्या मनासारखे परिक्षेत मार्कस मिळून ती कॉलेज मधून पहिली आली होती.गडकरी तिच्या बद्दल नेहमीच मोठ्या विश्वासाने बोलत असायचे.

अजि म्यां बी बर्म पाहिले...

लेखक अरुण वडुलेकर यांनी मंगळवार, 30/09/2008 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गातल्या त्या सुरम्य उपवनात बहरलेल्या प्रजक्ताखाली भाईकाका मनातल्या मनात एक बंदिश जमवीत होते. तितक्यात वाघ मागेलागल्यासारखे धापा टाकीत रावसाहेब पुढ्यात येऊन ठाकले. " अहो पी यल्ल! हितं काय करताय एवढं सक्काळी, सक्काळी म्हणतो मी?" " कांही नाही हो. एक चाल बांधत होतो. कां? काय झालं?" " ते चाल लावायचं सोडून सोडा हो. खाली कुणी तरी करतंय हो ते काऽऽम." "अरे वा! खाली कांही नवीन मंडळी सांगितिक प्रयोग करताहेत असं कानावर आलं होतं. तुम्ही कुणाबद्दल बोलताय?" " कोण तर ते नवीन आहे बघा.