मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

जाने तु या जाने ना....

सौरभ वैशंपायन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एप्रिल मध्ये हा लेख मला सुचला होता. तसं याला काय नाव द्यावं ते सुचत नव्हतं, आधी याचं नाव "दिल हि दिल मै!" असं होतं. मात्र सध्या "जाने तू..." गाजतोय, आणि त्याची थीम दे़खिल याला साजेशीच निघाली हा योगायोग आहे. हि २ जणांची पत्र आहेत. दुसरं पत्र उत्तर म्हणुन लिहिलय. काय आहे ते वाचुनच बघा आवडतं का ते! कदाचित एखाद्याच्या आयुष्यात असं झालहि असेल.....किंवा होईल हि. ---------------------------------------------------------------------------------------------- १. Hi Dear!!!!!! कशी आहेस? काय चालु आहे सध्या? अभ्यास कसा चालंलाय? नीट अभ्यास कर! सहा महिन्यांनी M.B.A. ची परीक्षा असेल ना?

आई..! तुझी, आ..ठ..व..ण येते...!

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं. मॉं (ऊली) याने आई म्हणजे सबकुछ माऊली! "आई, आई .... (मै आई,बेटा मै आई)" म्हणजेच, "अगं मी येते!, अरे मी येते! " असं जी आपल्या मुलांना ओरडून सतत म्हणत असते ती "आई" तिच माऊली, तिच मॉं, तिच माय, म्हणजेच "my"- माय- माझी, MOM म्हणजेच My Own Mother तिच शब्दशः आई. नुसता "आई" हा शब्द्च पहाना, पहिलं अक्षर, "आ" म्हणजे आकाशा एव्हडी प्रचंड मन असलेली. दुसरं अक्षर "ई" म्हणजेच जी ईश्वरा एव्हडी देवतुल्य.

आता दोषारोपाना जागा नाही आता फक्त प्रेम.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जाता जाता मी शिलाला म्हणालो, "म्हणूनच मी प्रार्थाना करीत असतो,की मला रोज एक नवी चूक करू दे.त्या चुकेतूनच मी काही तरी नवीन शिकेन.आणि म्हणूनच मी मला माणूस समजेन.मात्र तिच चूक परत परत करणारा माणूस होऊच शकत नाही." हा पण एक योगायोगच होता.मी माझ्या पुतणीच्या मुलीच्या लग्नाला जातो काय आणि जवळ जवळ चाळीस वर्षानी मला त्या समारंभात शिलाची भेट होते काय.शिला अमेरिका सोडून कायमची इकडे राहयाला आली होती,हे तेव्हाच मला तिच्याशी बोलताना कळलं.प्रथम मी तिला ओळखलंच नाही.सहाजीकच आहे इतक्या वर्षानी पाहिल्यावर माणसाच्या चेहर्‍यात राहणीत जो बदल होतो तो पटकन लक्षात येत नाही.पण बोलण्याची ढब,हंसतानाची स्टाईल,चेहर्‍या

प्रति(मा)भा उरी धरूनी तू काव्य करीत रहावे

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"हो मी तुझी कविता ब्लॉगवर आली रे आली की प्रथम वाचतो.पण शरद ह्यावेळची तुझी कविता खूपच दुःखी होती.तुझ्या कवितेचा संग्रह पाहिला तर जास्त करून त्या दुःखी असतात.एखाद्दया कवीला दुःखाशिवाय कविता लिहायला विषय़च नसतो का रे?" काल शरद मला चौपाटीवर भेटला.थोडी दाढी वाढलेला चेहरा,खाली लेंगा,वरती झुळझुळीत पैरण,पायात चप्पल असा पेहराव करून सकाळीच समुद्राच्या दिशेने क्षितीजाकडे टक लावून उभा होता.माझी खात्री होई पर्यंत मी त्याचा जवळ गेलो आणि हा शरदच आहे असं पाहिल्यावर म्हणालो, "अरे, काय तुझी ही दशा करून घेतली आहेस,मला तू शरद असशिल याची खात्रीच नव्हती." हंसायला पाहिजे म्हणून हंसल्याचा अविर्भाव करून मला म्हणाला

मंदाची बाईआज्जी

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक्दा गप्पा रंगल्यानंतर कुठचा विषय कसा येईल, आणि त्यावरची चर्च्या कुठे पोहोचेल हे सांगणं कठीण. असच आम्ही एकदा गच्चीवर गप्पा मारत बसलो होतो.का कुणास ठावूक विषय काय होता आणि मंदाने तो कुठे नेला.विषय होता त्यावेळची जुनी माणसं आणि त्यांच्या संवयी बद्दल.मधेच कुणीतरी कोकणातल्या समुद्राचा विषय काढला,आणि त्यावर आणखी काही सांगण्य़ापुर्वीच मंदाचा हुंदका ऐकला. मंदाला तिच्या आजीची आठवण येवून ती थोडी भावनावश झाली.तिला आजीचा विषय घेवून काही तरी सांगायचं होतं. म्हणाली, "माझ्या आजीला आम्ही बाईआजी म्हणायचो.विणकाम आणि शिवणकामात बाईआजीचा हातखंडा होता.

द्दावं,द्दावं आणि द्दावं

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"हे दातृत्वच मला दुसर्‍यांशी,जगाशी आणि देवाशी दुवा जोडायला मदतीचं होणार आहे" माणसांची आयुष्ये खरोखरंच गोष्टींचा "एनसायक्लोपीडाया" आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होईल असं मला वाटत नाही. प्रत्येक व्यक्तिची आयुष्यातली कथा दुसर्‍या व्यक्तिपासून निराळीच असते.घटना जवळ पास तशाच घडत असतील,पण अनुभव नक्कीच वेगळे असणार.आणि त्या त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा निराळाच असणार. मंजूचे अनुभव ऐकून मला वाटलं ही पण एक ऐकण्यासारखी कथा आहे.त्यामुळे ती कायसांगत होती ते मी निमुटपणे ऐकून घेत होतो.फक्त तिची ती दुःखी कहाणी ऐकून थोडा मायुस झालो.पण त्यातुनही काही शिकण्यासारखं तिच्या तोंडून ऐकून काही तरी कमवि

सैनिक हो! तुमच्या साठी....

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अलिकडेच माझ्या एका मित्राचा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर माझ्या घरी आला होता.माझा मित्र डॉक्टर-सर्जन- आहे आणि हा मुलगा डॉक्टर- सायकॉलॉजीस्ट- आहे. गप्पा मारता मारता मुलगा म्हणाला, "आलेल्या संकटाला तोंड देवून पुनरप्रस्थापीत होण्याची निसर्गाने मनुष्याला दिलीली शक्ति" ह्या विषयावर आपण थोडी चर्चा करूंया. मला ह्या विषयावर अगदीच तुटपुंजं ज्ञान असल्याने मी ऐकून घेण्याचीच जास्त भुमीका घेतली. सुनील देवधर,हा माझा मित्र कारगीलच्या युद्धात जखमी जवानाना ट्रिटमेंट देवून त्यांना बरं करण्याच्या सेवेत होता.

माजा बा

ब्रिटिश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी चवतीत होतो. स़काली उटलो. अंगोल धवली. च्या न बटर खाल्ला. पलत शालन गेलो. उशीर झाल्ता. मास्तरनी झनकन कानाखाली पेटवली. पाच मिन्टं अन्दार. कायव दिसना. कसातरी बाकड्याव बसलो. हजेरी चाल्लीवती. "मिथुन भोइर~~~ " मास्तर वरडलं माज्या बा ला मिथुन लै आवराचा. माजी आय सांगाची क जवा जवा मिथुनचा पिच्चर थेटरान लागाचा तवा बा कामाव जयचाच नई. आक्का दिस थेटरान परून असाचा. "आत्ताच आयलो न" मी "हं दिसतय मना." "पुस्तकं कारा साल्याव" हजेरी झल्याव मास्तर परत वराडलं "भोईराच्या उट न कालचा धरा वाचुन दाकीव. " माजे पोटान गोला उटला. चवतीत होतू तरी वाचाय जमत न्हवतं.