मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सामान्य माणूस असामान्य गोष्टी करतो तेव्हा......

श्रीकृष्ण सामंत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कोकणातल्या तुळस नावांच्या एक खेड्यात रमाकांत तुळसकरने खूपच सामाजीक कार्य केलं आहे,असं माझ्या एका मित्राने मला सांगितल्याने मला माझ्या शाळेतला दोस्त रमाकांत तुळस्करची आठवण आली.हा तोच तर नसेल,असं कुतुहल मनात येऊन मी त्या खेड्यात मुद्दाम गेलो.आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मनातला तोच रमाकांत होता.मला इतक्या वर्षानी पाहून त्याला ही खूप आनंद झाला. इकडतिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्याला म्हणालो, "काय रे बाबा! तू मला मुंबईत शिकत होतास असं कुणी तरी मागे सांगितलं होतं.मग तू मुंबईहून इकडे केव्हा आलास?" मला रमाकांत म्हणाला, "शिक्षण संपल्यावर थोडेदिवस नोकरी केली.पण माझं मन मुंबईत रमेना.मी इकडे सामाजिक कार्य आणि समाजसुधारणा वगैरे विषयावर खूप वाचलं आणि भाषणं पण ऐकली. मोठ्या मोठ्या गप्पा मारून आयुष्य फूकट घालवण्यापेक्षा आपण स्वतः काही तरी करून दाखवावं असं मनात आलं.मग करून दाखवायचं तर मग आपल्या गावातच का तसं करू नये असा विचार येऊन,मी मुंबई सोडली.आणि सरळ तुळसीला आलो. मला असं वाटतं,आपण राहतो त्या पृथ्वीला भेडसावत असलेल्या समस्या बद्दल काळजी करीत राहून त्या समस्याना जर सामोरं न जाता राहिलो तर तसं करणं निव्वळ निष्फळ ठरेल.जर उपाय केले गेले तरच जग सुधारल जाईल. माझी खात्री आहे की सामान्य व्यक्तिला असामान्य गोष्टी करता येतील.मला वाटतं सामान्य आणि असामान्य व्यक्ति मधला फरक कुणाला कसली उपदी आहे ह्या वर अवलंबून नसून ते आपलं जग आपणासर्वांसाठी किती चांगलं करतात ह्यावर आहे. काही लोक जे कार्य अंगिकारतात ते तसं कां करतात ह्याची मला कल्पना नाही.मी जेव्हा लहान होतो,तेव्हा मी मोठा झाल्यावर कोण होईन हे माहित नव्हतं. मला निदान काय व्हायचं नाही ते नक्कीच माहित होतं. मी मोठा होऊन, लग्न करावं,दोन चार मुलं असावीत म्हणजे सर्व साधारण लोकाना इच्छा असतात तसं व्हायचं नव्हतं.तसंच एखादा राजकारणी वगैरे नक्कीच व्हायचं नव्हतं. राजकारणाचा अर्थ तरी काय असावा हे पण मला त्यावेळी माहित नव्हतं. माझा मोठा भाऊ जन्मापासूनच कानाने बहिरा होता.मी त्याचं नेहमी संरक्षण करायचो.एखादं व्यंग असणं हे आपलं कमनशीब समजलं पाहिजे पण म्हणून उभं आयुष्य जगण्यासाठी त्या व्यंगावर मात करून आपल्यात उपजिवीकेचे साधन असण्यासाठी शिक्षणा सारखी दुसरी गोष्ट नाही.आणि त्यातूनच मी हा मार्ग पत्करला ज्याने मला जो मी आता आहे ते घडवलं. ज्यावेळी मी आमच्या गावांत पहिला कार्यक्रम म्हणजे शाळा काढायचं ठरवलं त्यावेळी आम्ही फक्त तिनजण होतो.मला ह्या कार्या साठी लागणारी माहिती आणि दोनचार दुसर्‍या कल्पना असल्याने ही योजना कशी हाताळायची हे माहित होतं. पण मनात यायचं समजा कोणी प्रतिसाद दिला नाही तर? कुणी पर्वाच केली नाही तर?पण एव्हडं माहित होतं की ह्या प्रश्नांना उत्तर म्हणजे एकच की हे चॅलेंज स्विकारायला हवं.मला एकट्याला त्याची क्षमता यायला मी माझ्या गावातल्या आणखी व्यक्तिंना बरोबर घेऊन होतो म्हणून. रामू गाबित,दाजी सकपाळ,मुकुंद अवसरे ह्यांच्या सारखी गावातली शेकडो मंडळी मिळून आम्ही एकत्र आलो होतो. सगळे एकत्र येऊन गावात काही असामान्य बदल करायला पुढे सरसावलो होतो. शाळेसाठी शाळा नव्हती.ते काम म्हणजे प्रत्येकाच्या अंगातली इर्षा होती. त्यामुळे अख्या गावात चैतन्य आणून काही निराळी गोष्ट ती आमची इर्षा हे करून दाखवीत होती. माझी खात्री होती की मी जे काही माझा हक्क आणि माझी जबाबदारी म्हणून कार्य करीत होतो,ते माझ्या गावात दंगे मारामारीला प्रोत्साहन देणारं नव्हतं तर उलट ते कार्य म्हणजे गावातल्या सर्वांच्या समस्यांची सोडवणूक करायचा प्रयत्न होता.मला वाटतं अलीकडे धैर्याने आपलं मत सांगणं आणि धैर्याने माहिती मिळवणं ही पण एक कला झाली आहे. मला खात्री आहे की अशा गोष्टीवर विश्वास ठेवणं आणि गावातल्या लोकांना ते बोलून दाखवणं हे कदाचीत सर्वमान्यही नसेल आणि समाधान देणारं ही नसेल.पण मला वाटतं जीवन म्हणजे काही "पॉप्युल्यारीटी कॉनटेस्ट " नाही.लोक माझ्या विषयी काय बरळत असतील त्याची मला पर्वा नाही,आणि माझ्यावर विश्वास ठेव,लोकानी खूप गरळ ओकली आहे.माझ्या पुरतं बोलायचं झाल्यास,माझ्या दृष्टीने मी योग्य कार्य करीत असताना कुणी दुसर्‍यानी ढुंकून माझ्याकडे बघीतलं नाही तरी चालेल. मला नक्की एव्हडं माहित आहे की शब्द वापरणं सोपं आहे.आपण जे कार्य करतो तेच आपल्यासाठी सत्यकथा आहे. आणि माझी खात्री आहे,जरूर तेव्हड्या सामान्य लोकानी आपल्या कार्याला पाठींबा दिला तर नक्कीच कसलंही असामान्य कार्य करायाला कसलीच आडकाठी येत नाही. एव्हडं सगळं ऐकून झाल्यावर मला रमाकांत गावात फिरायला घेऊन गेला.रसत्यातला जो तो त्याला वाकून अभिवादन देताना पाहून मला त्याचं धन्य वाटलं.माझी प्रतिक्रिया येण्यापूर्वीच तो मला म्हणाला, "सामान्य माणसाकडून मिळणारा हा प्रतिसाद मला मुंबईत राहून लाखो रुपये कमवून विकत घेता आला नसता." त्याची पाठ थोपटण्या पलिकडे मला शब्दाने शिफारस करण्यासाठी शब्दच आठवले नाहीत. श्रीकृष्ण सामंत

वाचने 2901 वाचनखूण प्रतिक्रिया 7

शितल 16/09/2008 - 22:23
खरंच अशा लोकांची समाजाला आज गरज आहे. मा़झ्या वडिलांना गावाकडे शाळा उभारणी करताना ही गावाकडील लोकांची मदत झाली होती. :)

In reply to by शितल

शितलजी, प्रतिक्रिये बद्दल आभार. खरंच आपले पिताजी तेव्हडेच असामान्य आहेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर 16/09/2008 - 22:27
"सामान्य माणसाकडून मिळणारा हा प्रतिसाद मला मुंबईत राहून लाखो रुपये कमवून विकत घेता आला नसता." त्याची पाठ थोपटण्या पलिकडे मला शब्दाने शिफारस करण्यासाठी शब्दच आठवले नाहीत. सुंदर....! आपला, (अण्णासाहेब कर्व्यांवर श्रद्धा असलेला) तात्या.

"सामान्य माणसाकडून मिळणारा हा प्रतिसाद मला मुंबईत राहून लाखो रुपये कमवून विकत घेता आला नसता." त्याची पाठ थोपटण्या पलिकडे मला शब्दाने शिफारस करण्यासाठी शब्दच आठवले नाहीत. :-)