मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

मांडकुली एक खेडेगांव

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दक्शिण कोकणांत मांडकुली म्हणून एक खेडेगांव आहे.ते बऱ्याच लोकानी पाहीले नसावं.मी पाहू शकलो कारण माझी मावशी तिथे रहाते.वेंगुर्ल्याहून ऊत्तरेकडे सावंतवाडीच्या दिशेने गेल्यास वाटेत छोटी छोटी गांवं लागतात.कुडाळला न जाता बिबवण्या गावाच्या पूर्वेला जात राहील्यास वाटेत करली नावाची नदी लागते.पावसाळ्यात ही नदी तुडूंब वाहत असेते.मात्र ऊन्हाळ्यात ह्या नदीत पाण्याचे दुर्भीक्ष असतं.प्रवासाच्या मार्गात एखाद दुसरं पाण्याचे डबकं दसतं. उन्हाळ्यात शेती करणारे काही शेतकरी ह्या असल्या डबक्यातून पाण्याचा उपसा करून शेताला पाणी द्यायचे.ईलेक्ट्रीक पंप येण्यापूर्वी कोळंब्याने पाण्याचा उपसा करायचे.एका लांबच लांब उंच झ

विचाराच्या पलिकडले.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रो.देसाई आज आपल्या धाकट्या भावाला तळ्यावर घेवून आले होते.मझी त्यांची पहिलीच ओळख झाली होती.बोलता बोलता कुठचा विषय कुठे गेला ह्याचं भानच राहिलं नाही. मी त्यांच्या भावाला सहजच म्हणालो, "कॉलेजच्या जीवनातला एखादा संस्मरणीय अनुभव आठवत असेल तर सांगा" थोडासाचा विचार करून ते म्हणाले, "मी तुम्हाला तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे माझ्या आयुष्यातला एक संस्मरणीय अनुभव अवश्य सांगतो. एकोणीशे सत्तरच्या दर्म्यान मी कॉलेज मधे प्रवेश केला.देवाच्या अस्थित्वावर माझा विश्वास अजूनही जागच्याजागी होता.पण शिकत असताना एका क्लास मधे मी माझ्या श्रद्धेच्या पलिकडे जावून पाहिलं आणि खरं सत्य म्हणजे काय ते मला कळून चुकलं. माझा

विनम्र राहिल्याने अंगात एक प्रकारची क्षमता येते.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एका विद्वान माणसाने मला सांगितलं, "तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे." कोकणातला पाऊस सर्वाना माहित आहे.एकदां पडायला लागला की मग मागे वळून बघणार नाही. तो अति प्रचंड वृष्टीचा दिवस होता.दिवसाच रात्र झाली आहे असं वाटत होतं.ढगानी सारं आकाश व्यापलं होतं.सर्व घराच्या दारं खिडक्या लाऊन लोक घरात घुडूप होऊन बसले होते.अशा प्रसंगी माझ्या पतिना एका एकी हृदयाचा झटका आला.कुणाला मदतीला बोलवायला जायला शक्यच नव्हतं.पावसाच्या कहराबरोबर माझ्याही घरात असाच कहर झाला होता. ती घटना होऊन गेल्यावर नंतर जवळ जवळ तीन चार दिवस पाऊस सतत पडत होता.मी घाराच्या पडवीत

योगायोग,योगायोग आणि योगायोग

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"अनपेक्षीत घटनांची गुंतावळ ही माझ्या आयुष्याची एक मोठी खूण झाली आहे.मला वाटतं,माझ्या आयुष्यात आलेल्या योगायोगानी मला माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवला,कधी धक्का पण दिला आणि तो पण अशातऱ्हेने की मी कदाचीत तो मार्ग पत्करला पण नसता,पण त्यामार्गाने मला जाण्याची जरुरी भासली म्हणून तसं करावं लागलं. ह्या योगायोगांशी झुंझ देताना मला त्यासाठी अनपेक्षीत ठिकाणी जावून राहण्याची पाळी आली." मुंबईहून मद्रासला जाताना ट्रेनमधे मला एक बाई भेटली ती सहज बोलता बोलता आपली कथा मला सांगू लागली. ती पुढे म्हणाली, " माझी मावशी मद्रासला राहते.तिची परिस्थिती पण यथातथाच होती.

"जसा व्याप तसा संताप!"

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"हे तिचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.मनात म्हणालो, "आपण प्रकृती बद्दल इतका गंभीर विचार कधीच केला नाही. Anorexia चा कधी विचारच आला नाही.कुणीसं म्हटलंय, "जसा व्याप तसा संताप!" हेच खरं" रघूवीर देशपांडे आमचे जुने शेजारी.त्यांच्या मुली आता मोठया झाल्या.त्यात त्यांची मोठी मुलगी,अंजना म्हणजेच आता सौ.

कोचर्‍याची लिलू

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दुपारी अकराची वेळ असावी.मी चर्चगेट वरून फौन्टनच्या दिशेने जात होतो. वाटेत हायकोर्टच्या फुटपाथकडे वळलो असेन,एकदम एक व्यक्ती अचानक सामोरी आली. "अरे तू मला ओळखलं नाहीस? मी लिलू कोचरेकर" असं म्हणून ती ज्यावेळी हंसली,त्याबरोबर मला तिची ओळख पटली.तिच्या अंगातला काळा कोट आणि ती गळ्यातली सफेद वकली कॉलर,हातातली ब्रिफकेस बघून मी तिला म्हाणालो, "अगं तू वकील केव्हां झालीस ?" "असं काय तुला माहितच नाही काय ? मी आता गेली दहा वर्ष हायकोर्टमधे केसीस चालवते" असं ती मला म्हणाली. कोचर्‍याला माझ्या वहिनीच्या माहेरचे शेजारी कोचरेकर त्यांची ही मुलगी होती.

कमकुवतपणा ही पण एक प्रकारची शक्तिच असते

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात आलं की हिनें आपल्या उद्देशाला किती वाहून घेतलं आहे.नवल नाही की ती मला म्हणाली "मला माझा जॉब आवडतो म्हणून." आमच्या बिल्डिंगच्या अगदी वरच्या माळ्यावर एक चतर्जी म्हणून बंगाली कुटुंब राहत होतं.राहत होतं म्हणण्याचं कारण बरेच वर्षानी ते आपलं घर सोडून कलकत्यात राहायला गेलं.पण इतकी वर्ष मुंबईत राहिल्याने त्यांच्या सर्व मुलाना मराठी अगदी अस्खलीत येत होतं.कदाचीत हे मुळचे बंगाली आहेत असं सांगणं पण जरा कठीण झालं असतं.

उलगता बाजार

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"सामावून घेण्यावर माझा विश्वास वृद्धिंगत झाल्याने मला वाटू लागलं की मी आणि माझी आई येईल त्या प्रसंगातून मार्ग काढून जीवंत रहाण्याची धडपड करूंच." मी आणि माझी आई संध्याकाळच्या उलगत्या बाजारात जाऊन आमची घरासाठी रोज लागणारी खरेदी करतो.उलगत्या बाजारात जाऊन खरेदी करण्याचा फायदा असा की सकाळ पासून आलेले विक्रिकर-लोकं सध्याकाळी अगदी थकून जातात.आणि उरली सुरलेली भाजी,फूलं,फळं कमी किंमतीत किंवा वाटे काढून विकून टाकतात.फळं थोडी जास्त पिकतात,भाजीचा ताजेपणा कमी होतो,आणि फूलं तर बरिच कोमेजलेली असतात.ही फूलं देवाला वाहिली तरी त्याचं त्याला काहिच वाटणार नाही असं मनात येतं.आमच्या परिस्थितीचा कुणावरही ठपका ठेव

प्रत्येक व्यक्ति अमुल्य आहे.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या एका ऍनेस्थेसीऑलॉजीस्ट डॉक्टर मित्राला मी विचारलं "तू ही मेडिकल संज्ञा कां निवडलीस?" त्यावर तो म्हणाला, "त्याचं खरं उत्तर म्हणजे ही शाखा आणि त्यातलं काम हे मला आध्यात्माकडे जाण्याचा मार्ग दाखवतं हे आहे." मी त्याला हे ऐकून म्हणालो, "अरे,तू डॉक्टर असून ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतोस?" हंसत,हंसत मला म्हणाला, "आध्यात्म" ह्या शब्दाला आपण निराळ्या अर्थाने बघू शकतो. श्वास,उश्वास,उत्तेजन,चैतन्य हे शब्दपण वैद्यकीय शास्त्रात येतात, जसे ते श्रद्धेतूनपण जन्म घेतात.आणि हे शब्द माझ्या आयुष्याची आणि माझ्या कामाची व्याख्या करण्यास कारणीभूत आहेत. माझं आध्यात्मी मन आणि माझं वैद्यकीय शिक्षण ह्या दोन्ही गोष्