Skip to main content

कथा

अशीच ही एक चीज असते ज्याला सत्य म्हणतात.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 23/03/2009 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
"सत्य हे सापेक्ष नसतं.ते व्यक्तिपरकही नसतं.ते कदाचीत दुग्राह्य असतं किंवा लपलेलं असतं.सत्याची उपेक्षा करावी असं कुणाला वाटेल ही.पण सत्य ही अशीच एक चीज आहे." माझा हा वकिल मित्र पहिल्यापासून त्याच्या डोक्यामधे सत्याची सणक ठेवून आपल्या केसीस लढवायचा.मला वाटतं त्याच्या लहानपणापासून ही त्याच्यात म्हटलं तर खोड होती.तिचा फायदा त्याला त्याचा वकिली धंदा चालवताना बरेच वेळां उपयोगाला यायचा. त्या दिवशी मी त्याला त्या पैजेची आठवण करून दिली.त्याचं खरं असून सुद्धा त्याला शंभर रूपये मिळाले नाहीत.ती गंमत मला त्याच्या तोंडून पुन्हा ऐकायची लहर आली. मी त्याला म्हणालो, "सत्याच्या मागे जाण्याची ही तुझी संवय तुला

मनोमन प्रार्थना.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 18/03/2009 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
"कधीकधी कुणाजवळ बसून,ऐकून घेणं खूपच महत्वाचं असतं." जान्हवी लिखिते त्या हॉस्पिटलमधे जवळ जवळ तीस वर्षं कामाला होती.हे हॉस्पिटल एका छोट्याश्या शहरात होतं.कुणा आजार्‍याला भेटण्यासाठी किंवा माझ्या डॉक्टर मित्राला सांगून कुणातरी माझ्या नातेवाईकाला ह्या हॉस्पिटलमधे उपचारासाठी दाखल करण्याच्या निमीत्ताने माझ्या इकडे बर्‍याच खेपा व्हायच्या.

"आपण एकटे नसून,आपण इथे पुर्वी पण होतो."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 16/03/2009 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं,कुठच्याही नवीन समस्येला जूनं उत्तर असतं.त्या जुन्या आणि होऊन गेलेल्या अक्कलवंत कानगोष्टी आपल्या बरोबरच असतात त्या आपल्याला आश्वासन देतात, "आपण एकटे नसून,आपण इथे पुर्वी पण होतो" श्रीधर आणि मी एकाच गावात वाढलो आणि शिकलो.मी शिक्षण पुरं केल्यावर जास्तशिक्षणासाठी परदेशी गेलो.आणि या वयात परत आपल्या गावात येऊन उर्वरीत आयुष्य लेखन करण्यात वापरायचं ठरवलं आहे.पण श्रीधरने माझ्या सारखं काही केलं नाही.

एक संवाद ..भाग १..( मी आणि ती)

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 15/03/2009 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभामध्ये होणार्‍या बायकोला घेऊन आलेल्या मुलाचा लग्नघरात तिच्याशी झालेला संवाद.... _____________ मगाशी भेटल्या त्या सगळ्या आत्या माझ्या..त्या बर्‍या आहेत.. म्हणजे? भोचक प्रश्न कमी विचारतात.. असं होय? पण मला नाही हं सगळी माणसं लक्षात राहायची... जमेल तशी थोडीथोडी ठेव लक्षात... ओके.. तशी आमच्याकडे चक्रम माणसांची कमी नाही... असू दे.. मला सवय आहे.. हे बघ, ती जी दिसतेय ती ... कोण? अगं, ती काय...पैठणी घातलेली... हॅ..ती काय पैठणी आहे होय? नसेल मग..

"हजेरी" हे नाम आहे क्रियापद नाही.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 14/03/2009 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
हजेरी म्हणजेच "असणं" काही "करणं" नाही. "असण्यावर" माझी श्रद्धा आहे.अलीकडेच मला ह्याची आठवण आली.त्याचं असं झालं की कोकणात त्यावर्षी खूप मोठं वादळ आलं होतं.नारळाची उंच उंच झाडं मुळासकट उन्मळून पडली होती.काही घरांची छप्परं उडून गेली होती.नळे, कौलं तुटून घरं उजाड झाली होती.

!!! जाणत्या राजाला मानाचा मुजरा !!!

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 13/03/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।। नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।। यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।। आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।। धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।। देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।। हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा का

"न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर बहिरी आणि मुकी पण असते"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 11/03/2009 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसायानी मला त्यांच्या कॉलेजच्या प्रोफेसर असतानाच्या जीवनातली एक गंमतीदार पण हृदयस्पर्शी घटना सांगितली. प्रो.देसाई त्यावेळेला रुईया कॉलेजमधे नुकतेच ज्युनीअर लेक्चरर म्हणून कामाला लागले होते.ते मला म्हणाले, "न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर मुकी आणि बहिरीही असते.कसं ते ही माझी गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला कळेल. माझ्या फिझीकसच्या वर्गातली मुलं,मुली आणि मी गणपतीपुळ्याला सहलीसाठी गेलो होतो.गांवातल्या एका शाळेत आमचा मुक्काम होता.शाळांना त्यावेळी उन्हाळ्याची सुट्टी होती.गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा अप्रतिम दिसायचा.त्या दिवसात बर्‍याच लोकाना हा पिकनीक स्पॉट माहित नसल्याने परिसर फारच स्वच्छ होता.समुद

तो आणी ती

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 10/03/2009 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा माझ्या एका जवळच्या मित्राची..आणी त्याच्या प्रेयसीची. कथेत "तो" आणी "ती" लहानपणापासूनच तो एकदम चंचल वृत्तीचा. नविन गोष्टी करुन पाहण्यात त्याला फार मजा वाटायची. अभ्यासातही फार हुशार आणी चाणाक्ष. सर्वांचा लाडका. एकदा त्याने तिला कुठेतरी पाहिली आणी तिच्याबद्दल कुतुहल निर्माण झाले आणी तिला भेटायची ओढ लागली. आता तिला भेट्णार कसे आणी भेट घलुन कोण देणार हा विचार त्याच्या मनात घोळु लागला. हळुहळु दिवस सरत होते आणी तिला भेटायची ईच्छा सुद्धा तीव्र होत होती. एक दिवस त्याच्या एका मित्राच्या वाढदिवस पार्टीमधे ती त्याला दिसली आणी त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.

राम आणी वाली

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 09/03/2009 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर बागडत असताना एका ठिकाणी प्रभु रामचंद्रानी वालीची हत्या करुन कसे अधर्म चरण वगैरे केले आहे ह्याची मनोरंजक कहाणी वाचायला मिळाली. त्यात सितेकडे केलेली अग्नीपरिक्षेची मागणी कशी अन्यायकारक वगैरे होती हे ही वाचायला मिळाले. रामचंद्र हे आधी राजा असल्याने त्यांनी स्वत:चा आदर्श जनतेपुढे घालुन देण्यासाठी त्यांनी सितेकडे अशी अपेक्षा व्यक्त केली असावी काय ? वाली वधाविषयी मात्र खुप बोलायची इच्छा आहे. खरेतर मागे मिपावर हा प्रश्न उपस्थीत झाल्याचे पुसटसे आठवते पण तेंव्हा भवतेक कंटाळ्यामुळे हे येव्हडे सगळे टंकले नाही. आज वेळ मिळाला आहे तर हा राम आणी वाली संवाद तुमच्या पुढे सादर करत आहेत.

धर्म

लेखक चेतन१२३प यांनी रविवार, 08/03/2009 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
धर्म! बाजारातुन भाजी घेऊन ये लवकर. पावशेरच आण. हे घे पैसे. उठ बघु लवकर." आईच्या बोलण्याने धर्म लेख अर्धवट सोडुन उठला. आईने टेबलवर ठेवलेले पैसे आणि पिशवी घेऊन तो घरातून खाली मान घालूनच बाहेर पडला. काही वेळापुर्वीच तो कॉलेजमधुन परत आला होता. कॉलेजमध्ये आज परत त्याचा सर्वांनी अपमान केला होता. तो सहन न झाल्याने धर्माने दु:खाश्रु ढाळले होते. माझ्या आयुष्यातच हे सर्व का घडतं? हा प्रश्न त्याला पडला होता. अल्पभाषी असणाऱ्या त्याला पदोपदी अवमान सहन करावा लागत होता. शरीराने क्रुश म्हणुन सगळॆ त्याला सुपरमॅन म्हणत. आजतर संपुर्ण वर्गासमोर एका मुलीने त्याला सुपरमॅन म्हणुन हिनवले होते.