Skip to main content

क्रीडा

प्रिय सच्यास

लेखक चतुरंग यांनी रविवार, 24/04/2011 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
२४ एप्रिल हा सण कधीचाच जगभर साजरा होतोय. भारतात तर शेकडो, हजारो लोक केक कापून त्यांचा स्वतःचा वाढदिवस असल्याच्या थाटात तो साजरा करतात. आम्ही तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही...तेही खरं नाही म्हणा तूच आमच्यात आहेस त्यामुळे आम्ही कुठे पोचायचं हा प्रश्नच आहे! तुझं अभिनंदन. लोक तुला क्रिकेटमधला देव मानतात पण खरं सांगू तू देव नाहीस, निदान मी तरी मानत नाही. देव बनणं तसं फार सोपं असतं, दगडालाही शेंदूर फासला की देवपण येतं.

आपल्या लाडक्या सचिन ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

लेखक मोगली यांनी रविवार, 24/04/2011 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सर्वांचा लाडका लिटील मास्टर सचिन तेंडुलकर आज आपल्या वयाच्या ३८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. क्रिकेटच्या विश्वातील या तेजस्वी सुर्याला त्याच्या या वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा...त्याच्या या प्रकाशाने क्रिकेट विश्व उजळुन निघु दे आणि त्याच्या कीर्तीचा झेंडा अखंड फडकत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. (शुभेच्छूक) मोगली

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

(यांना विसरुन कसे चालेल ? )

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 05/04/2011 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा आख्खा देश विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करत होते तेव्हा भारताच्या विजयाच्या शिल्पकाराला आपण विसरत होतो असे मला वाटते. मिपा वर एवढे धागे येउन गेले पण एकानेही विजयाचे योग्य ते श्रेय या इसमाला दिले नाही याचा खेद वाटतो म्हणुन हा धागाप्रपंच. खरे म्हणजे या व्यक्तीशिवाय आपण विश्वचषक जिंकु शकत नाही हे सुरुवातीपासुनच सर्वांना माहिती होते. त्या अनुषंगाने मला सुरुवातीला काही ढकलपत्रे आणि काही भ्रमणध्वनी संदेश देखील आले. पण म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो (अर्थात कोणाला वाटले म्हणुन हा वैद्य मरेल असे नाही). त्या अनुषंगाने लोक या इसमाला विसरले. कोण आहे हा?

क्रिकेट विश्वचषक - २०११ 'अभिनंदन'

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शनिवार, 02/04/2011 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
आय सी सी क्रिकेट विश्वचषक - २०११ जिंकल्याबद्द्ल भारतीय क्रिकेट संघाचे मनापासुन अभिनंदन! आपण एक इतिहास घडवलेला आहे! एक स्वप्न सत्यात उतरले! - (अतिशय आनंदी) इंट्या.:)

पारंपारिक प्रतिस्पर्धी

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 30/03/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर आज बघा. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनंतर २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे. आजचा भारत - पाकिस्तान सामना हा तिसर्‍या महायुद्धापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आहे. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात हे २ देश कधीही उपांत्य फेरीच्या सामन्यात समोरासमोर आले नाहीत. याआधी कधीही त्यांची लढाई अस्तित्वाची लढाई नव्हती.

भारत विरुद्ध पाकीस्तान सेमीफायनल प्रिव्हीव

लेखक नि३ यांनी सोमवार, 28/03/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
भारत विरुद्ध पाकीस्तान क्रिकेट विश्वचषकातील सेमीफायनल आणी तेही भारतात मोहालीमधे मधे..यापेक्षा अधीक तरी एखाद्या क्रिकेट वेड्याला काय पाहीजे वातावरण खुपच तापत चाललय बाहेर गर्मीने आणी करोडो क्रिकेट प्रेमींच्या शरीराच्या आत..ह्या सामन्यामुळे...जसाजसा क्षण जवळ येतोय तशी नुसती जिवाची तगमग वाढत चाललीय... हे आस्ट्रेलीया आणि ईंग्लंड वाले ऊगाचच ashes ला most celebrated rivalry in international cricket म्हणतात ..अरे त्यांना म्हणाव तुमच्या दोन देशांमधे एक तरी युद्ध झाले आहे का??