Skip to main content

क्रीडा

भारतरत्न बिग टी अन बिग बी ....

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 16/11/2013 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
अख्रेर सचिन रमेश तेंडुलकर याना " भारतरत्न" हा सर्वोच्च सन्मानाचा किताब जाहीर झाला आहे. हा सन्मान खरे तर क्रिडापटूना द्यावा का असा प्रथम प्रश्न होता. नंतर त्यात सांघिक खेळातील एखाद्याच खेळाडूला द्यावा की नाही असाही वाद होता. सचिन बरोबरच डॉ. राव यानाही ही हा सन्मान मिळत आहे. आपण दोघांचेही त्रिवार अभिनंदन करू या. बाकी सचिनच्या बाबतीत एक विशेष गोष्ट अशी की जे खेळ तो खेळत होता तो बारकाव्यांचा ( प्रिसिजनचा) खेळ आहे. १४० किमी ने येणार्‍या चेंडूला चार इंच रूंदीच्या बॅटने सुमारे ९ इंच रूंदीचा यष्टी पट सुरक्षित ठेवायचा.म्हणजे दरवेळी चार इंचाची वाट चेंडूला मिळण्याची शक्यता जवळ जवळ १०० टक्के.

धन्यवाद सचिन.....

लेखक सुहासदवन यांनी शनिवार, 16/11/2013 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
गेली चोवीस वर्षे क्रिकेट नावाचा एक खेळत होतास तू, त्यातल्या खऱ्या खोट्या चांगल्या वाईट अनेक गोष्टी पचवून. का भारतीयांनी क्रिकेट फक्त पहायचं आणि टाळ्या वाजवायच्या. का फक्त इतरांनी केलेल्या विक्रमान्बद्दल बोलायचं. तू ते बदललस. क्रिकेट खेळता खेळता तू त्याला आपला गुलाम बनवलंस. जणू विक्रम हे फक्त तू आधी करायचेस म्हणूनच दैवाने लिहिलेले होते की काय असं खेळलास तू. अगदी दृष्ट लागण्यासारखा. पण कोणाचीही दृष्ट लागली नाही तुला. ना यशाची ना पैशाची ना टीकेची.

आनंद - कार्लसन डाव ६

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 16/11/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
काल पहिला पाडाव झाला! आज काय होणार? आधीच्या दोन्ही वेळा २०१० आणि २०१२ मधे एक डाव हारल्यावर ताबडतोब पुढच्या डावात आनंदने वचपा काढला होता. गेल्फंडला तर त्यने केवळ १७ खेळ्यात हरवले होते. चमत्कार पुन्हा होईल का? विशेषतः कार्लसनला हरवणे हे कितपत कठिअण आहे?

आनंद - कार्लसन डाव ५

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 15/11/2013 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक डोळा तिकडे मुंबईत आणि दुसरा चेन्नै अशी अवस्था झाली होती. त्यापैकी आता फक्त चेन्नैत जीव अडकला आहे!बहुप्रतीक्षित असा डाव क्र. ५ सुरु होतोय.

एफर्टलेस मॅगी नूडल्स !

लेखक साळसकर यांनी गुरुवार, 14/11/2013 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
६ नोव्हेंबर २०१३. भारत बनाम वेस्टईंडिज. पहिला कसोटी सामना. सारा प्रकाश झोत सचिन रमेश तेंडुलकर वर. कारण देखील तसेच. क्रिकेटच्या या देवाची अखेरची कसोटी मालिका. कारकिर्दीतली शेवटून दुसरी आणि १९९ वी कसोटी. पहिल्या दिवशी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणारी वेस्टईंडिज २३४ ला गारद आणि भारत बिनबाद ३७. दुसर्‍यादिवशी सचिन बॅटींगला येणार म्हणून काही जणांनी चक्क सुट्ट्या टाकलेल्या. ज्यात एक मी देखील होतो, जो दुकान सोडून घरी थांबलेलो. सचिन बॅटींगला २ गडी बाद झाल्यावर येतो म्हणून घरी तशी सक्त ताकीदच देऊन ठेवली होती की दुसरी विकेट पडल्यापडल्याच मला उठवा.

मी त्याला देव मानत नाही…

लेखक रामबाण यांनी सोमवार, 11/11/2013 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
मी त्याला देव मानत नाही… पण त्याची एकही इनिंग पाहायची संधी मी सोडली नाही, सुरुवातीची ११ वर्ष तरी. त्यासाठी किती जुगाड केलेयत, गणती नाही. असं करणाऱ्या कोट्यवधींपैकी मी ही एक होतो... तो_१ छापखाना गल्लीतला मामाचा वाडा. दारासमोर गणपतीचं मंदिर, पिंपळाचा पार. काळे गल्लीतून फारफार दहा मिनिटं लागायची. लहानपणी हक्कानं जाण्याचं ठिकाण. मामीचे वडिल म्हणजे तात्यांची भेट तिथं कधीतरी झाली. मॅच असली की तात्यांनी रेडिओवर कॉमेंट्री लावलेली असायची.

आनंद - कार्लसन - डाव २

लेखक चतुरंग यांनी रविवार, 10/11/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
माफ करा मंडळी, यायला उशीर झाला. आज झोपेनं दगा दिला आणि वाजलेल्या गजरावर मात केली! असो डावाकडे वळतो. बाप रे यावेळी डावाने केवळ १५ मिनिटात भन्नाट प्रगती केली आहे.

आनंद - कार्लसन सामना - डाव १

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 09/11/2013 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार, दि, ९ नोवेंबर २०१३ आज बुद्धीबळ विश्वविजेतेपदाचा पहिला सामना सुरु होतोय. प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या या शतकातल्या सामन्याला सुरुवात होते आहे. चला आस्वाद घेऊयात! कार्लसन येऊन बसलाय आनंद अजून आलेला नाही. एकच मिनिट राहिलं आहे.

देवासाठी काय करावे बरे

लेखक देशपांडे विनायक यांनी सोमवार, 28/10/2013 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
सचिन तेंडूलकर शेवटच्या रणजी सामन्यात ५ वर त्रिफळा चीत झाले डॉन ब्राड्मन शेवटच्या सामन्यात ० वर बाद झाले सचिनचा प्रवास त्या दिशेने चालू झाला असे वाटू लागले म्हणून विचारतो कि या देवासाठी भक्तगण तर भरपूर आहे पण त्यांची प्रार्थना त्याला शेवटच्या सामन्यात १०० धावा करून देईल का ? हा प्रश्न पडण्याचे कारण सचिनने काढलेल्या प्रत्येक धावेकारता त्याच्याबरोबर खेळपट्टीवर कुणालातरी थांबावे लागे हे विसरले जातेय !! हे विसरणे म्हणजे हा सांघिक खेळ आहे हे विसरणे !!! संघ जिंकतो किव्हा हारतो खेळाडू नव्हे !