Skip to main content

क्रीडा

एक होता राजा....

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 13/03/2012 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
"त्याला पायतले यॉर्कर्स खेळता येत नाहीत " - इति माझा अखिल भारतीय खिलारेवाडी तरुण मित्रमंडळाच्या क्रिकेट संघाचा अघोषित कप्तान. "पण पायातला यॉर्कर म्हणजे काय? यॉर्कर फक्त पायातच टाकतात ना? डोक्यावरुन गेला तर त्याला बाउंसर म्हणतात. "- इति मी. "तेच ते. त्याला बाउंसर पण खेळता येत नाहीत" " अर्रे पण त्याला म्हणजे कोणाला" मी हताश होउन विचारले? "सौरव गांगुली.

‘प्रेमाला’ जाऊन भांडे लपविणे...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 06/03/2012 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषानं कसं सडेतोड असावं. मुळूमुळू करणं हा इतरांचा प्रांत. धडाकेबाजपणा हा पुरुषाचा मूळ गुणधर्म. तो त्यानं जपला पाहिजे अन् योग्यवेळी व्यक्त केलाही पाहिजे. मनात कुढत बसणे त्याचा पिंड नाहीच. जे वाटते, जे आवडते, जे पटते ते बोलून मोकळे होणे हाच खरा पुरुषार्थ. तसेच जे मनाविरुद्ध घडते, जे आवडले नाही अन् ज्यात आपले इप्सित साध्य होत नाही त्याचा प्रतिकार करणे, बिनतोडपणे त्याचा जाहीर लिलाव करणे व त्या विरुध्द आवाज उठविणे हाच पुरुषाचा धर्म असतो. असो. इतकं सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे काही पुरुष ताकाला जातात खरे पण भांडं लपविण्याचा प्रयत्न करतात. परंतु समोरची पार्टी महाचाणाक्ष असते.

रवी चतुर्वेदी आता पद्मश्री !

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी बुधवार, 15/02/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी चार वाजता उठून भारत आणि ऑस्ट्रेलीयाची कसोटी पाहणा-या क्रिकेट चाहत्यांचा या वेळी चांगलाच हेटा झाला. वाईटातल्या वाईट पद्धतीने कसं हरावं याचा नमुनाच भारताच्या संघाने यंदा सादर केला. मात्र ऑस्ट्रेलीयामधील पहाटे उठून पाहिलेले सामने असोत किंवा वेस्ट ईंडिजमधले रात्री जागुन पाहिलेले क्रिकेट असो, ती मजा, ते थ्रील काहीतरी वेगळंच असतं. पुर्वी भारताबाहेरील सामन्यांसाठी रेडिओवर अवलंबुन रहावं लागायचं. "धूप खिली हुई और दर्शकोंमें उत्साह" या वाक्यापाठोपाठ येणारा हजारो प्रेक्षकांचा आवाज असो, किंवा "... अगली गेंद...ऑफइस्टंप के काफी बाहर..

ताल-बेताल!

लेखक चतुरंग यांनी रविवार, 12/02/2012 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज बरेच दिवसांनी चेस्.कॉमवर जरा निवांत भटकत होतो. मला परमप्रिय असलेल्या मिखाईल तालचा एक डाव नजरेस पडला. मग तिथून जरा तंद्री लागली आणि थोडी शोधाशोध करुन तालचाच आणखी एक प्रसिद्ध डाव हाती लागला. पेश करतोय मिखाईल ताल वि. बेंट लार्सन. "सम सॅक्रिफायसेस आर साऊंड, अदर्स आर माईन!" मिखाईल ताल!! बुद्धिबळाच्या इतिहासात अतिशय कमीकाळ तेजाने तळपून जे तारे लुप्त झाले त्यात तालचा क्रमांक अतिशय वरचा लागेल. हा माणूस प्रतिस्पर्ध्याला कधीही स्वस्थ होऊ देत नसे. कधी एकदा बलिदान करायला मिळतंय याची त्याला जणू घाईच लागलेली असे!

लिअँडर पेसचं हार्दिक अभिनंदन!

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 28/01/2012 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ भारतीय टेनिस पटू लिअँडर पेस याने पुरूष दुहेरीतील ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा झेकोस्लोव्हाकियाच्या रॅडेक स्टेपॅनेक च्या जोडीने जिंकून अकरावं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळवलं आहे. ३८ वर्षांचा पेस आणि ३३ वर्षांचा स्टेपॅनेक यांनी अमेरिकेच्या बॉब आणि माईक ब्रायन या जुळ्या भावांचा ७-६ (७/१), ६-२ असा पराभव केला.

सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा..

लेखक कॉमन मॅन यांनी शुक्रवार, 27/01/2012 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशात कसोटी चेंडुफळी सामन्यात आता आपल्यावर सलग ८ व्यांदा तोंडावर आपटण्याची वेळ आलेली आहे. तरीही आपल्या संघातल्या सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आदी सो कॉल्ड धुरंधर खेळाडूंना याची जराही लाज वाटत नाही आणि ते आपणहून स्वत:ची खुर्ची रिती करत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. सचिनसारख्या गुणी खेळाडूबद्दल विशेष वाईट वाटतं. १०० व्या शतकाच्या हव्यासापायी त्याने सार्‍या देशाला का दावणीला बांधले आहे हे समजत नाही. त्याला आता इतकंच सागावंसं वाटतं की 'बाबारे, तुला आता वाटल्यास भारतरत्न देतो पण आता पैशांची आणि वैयक्तिक उच्चांकांची अधिक हाव न धरता चक्क घरी बस.

आमंत्रण - जीवनशाळांचा बालमेळा!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 11/01/2012 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनशाळांच्या मुलांचं दरवर्षी एखादं संमेलन भरत असतं. त्याला नाव असतं 'बालमेळा'. त्यात या शाळेतील मुलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. त्याजोडीनेच त्यांचा क्रीडामहोत्सवही असतो. यंदा हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी येथे, गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१२ ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवसात होणार आहे. या निमित्ताने नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सर्वच सुहृदांना आमंत्रण दिले आहे.

येळकोट येळकोट जय मल्हार!!

लेखक यकु यांनी मंगळवार, 06/12/2011 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवडे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्‍ठी) अजून झालेली नसे ना. खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. आमच्या घरात आजी लग्न होऊन येत असताना तिच्यासोबत तिचं कुलदैवत असलेला खंडोबाही (टाक) आला होता. तेव्हापासून आमच्याकडेही सट पाळली जाऊ लागली असावी; निश्चित माहिती नाही कारण विचारायला सध्‍या जवळ वडीलधारं कुणीच नाहीय. खंडोबा हे तसं धनगरांचं कुलदैवत. पण श्रद्धेला बंधन नसतं.