Skip to main content

कला

अक्षयभाषा सादर करत आहे- त्रिवेणी! (फीनीक्स/मेसा)

लेखक Nile यांनी रविवार, 22/11/2009 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच फीनीक्स जवळील मेसा येथे सादर होत असलेल्या या कार्यक्रमाची माहिती मिळाली. अरिझोनातील मिपा सदस्यांना कळावी हाच उद्देश.

इलिनॉईच्या दुगाण्या

लेखक शरदिनी यांनी गुरुवार, 19/11/2009 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित झरणी बोधित करणी मेलामेली भर्तृहरी अमर्त्य सेना वसंतसेना सेनासमथिंग कलहारी तूच सहारा... तूच सहारा रखरखीत या गूगल संकटनेवारी संतसंतिणी , मुग्ध हिरॉईनी उपग्रहाचा त्वरितध्वनी शरीरबांधणी भेटीगाठी रिचर्ड बेकहॅम चपळ त्रिपाठी ओहो राहुल आहा राहुल ब्रायन लारा दत्ता भट ब्रायन लारा दत्ता भट
काव्यरस

लोहगडची सफर

लेखक झकासराव यांनी मंगळवार, 10/11/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
लोहगडला जाउ जाउ अस करत करत बरेच रविवार नुसतेच येत आणि जात होते. प्रत्येक वेळी प्रत्येकाची वेगळी कारण. होय नाही करत शेवटी मी आणि राजा दोघच जायच फिक्स केल. तर आता नमनालाच जास्त तेल न घालता घ्या फोटू. हा जाताना पायवाटेवरुन काढलेला फोटु. हा जाताना दिसणारा विसापुर. अवाढव्य आहे हा किल्ला. हा दिसतोय लोहगड. हा त्याचा डावीकडचा भाग. बुलंद किल्ला आहे एकदम.

टेराकोटा पॉटरी प्रदर्शन

लेखक अजुन कच्चाच आहे यांनी मंगळवार, 10/11/2009 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
टेराकोटा पॉटरी प्रदर्शन आमंत्रण पुण्यात येऊ शकणाऱ्या मिपाकरांसाठी खास रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथील “आकार पॉट आर्ट”तर्फे भाजलेल्या मातीच्या (टेराकोटा) कलाकृतींचे प्रदर्शन दि. १२ नोव्हें. ते १५ नोव्हें. २००९ च्या दरम्यान पुण्यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात आयोजीत करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाचे उद्ग्घाटन डॉ. अभिजीत वैद्य, एम.डी.

फिल्म डिव्हीजन च्या फिल्म्स कोठे गेल्या?

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 10/11/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
फिल्म डिव्हीजन च्या फिल्म्स कोठे गेल्या? साधारणता: १९८० च्या दशकात ज्यावेळी दुरदर्शनवर वाहिन्यांचा सुळसूळाट चालू झालेला नव्हता त्या काळी दिल्ली दुरदर्शनवर वरचेवर भारतीय फिल्म डिव्हीजन ने तयार केलेल्या काही कार्टून फिल्म दाखवल्या जायच्या. सदर फिल्म्स ह्या देशभक्तिपुर्ण, अर्थपुर्ण, संगीतमय व काहीतरी उद्दात हेतू असणार्‍या होत्या.

सुनीता देशपांडे यांचे निधन...

लेखक विद्याधर३१ यांनी शनिवार, 07/11/2009 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
अत्ताच म्.टा. मध्ये वाचलेल्या बातमी नुसार श्रीमती सुनिता देशपांडे यांचे पुण्यात निधन झाले. "आहे मनोहर तरी" या आत्मचरित्राने प्रसिध्द झालेल्या सुनिताबाईना आदरांजली.

आगे नारी - एक कोंकणी लोकगीत

लेखक धनंजय यांनी सोमवार, 02/11/2009 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्यातली "ख्रिस्ती लोकगीते" गोव्याबाहेर फारशी परिचयाची नाहीत. त्यांच्यावर पाश्चिमात्य संगीताची छाप आहे, पण मूळ ती एतद्देशीय आहेत. गोव्यातील पाककलेसारखेच हे घरोघरच्या, गावोगावच्या कलाकारांना स्फुरलेले रम्य मिश्रण आहे. हल्लीच काही महिन्यांपूर्वी गोव्याच्या ख्रिस्ती लोकगीतांचा एक खजिना मला आंतरजालावरती मिळाला. वेगवेगळ्या लोकांनी केलेली संकलने सुरावटीसकट स्कॅन करून या स्थळावर चढवलेली आहेत. एक सुखद आश्चर्य म्हणजे त्यातले एक संकलन (ख्रिस्तवासी) पाद्री लूर्दीन्य बार्रेतो यांनी केलेले होते - हे नाव माझ्या ओळखीचे होते.

एच्च्. मंगेशकरांचा भ्रमनिरास

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 29/10/2009 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच महाराष्ट्र टाईम्सच्या दिवाळी अंकामध्ये बाळासाहेबांनी लिहिलेला एक लेख वाचला. लेखाचा विषय आहे , " सा रे ग म प ..रिअ‍ॅलिटी शो"... मंगेशकरांचा हा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे..... खूप मजेदार आहे. लेखातले काही मुद्दे असे, १.स्टेज शो करणार्‍या निवडक गायकांमधून महागायक निवडायच्या या पर्वाची आयडिआ बाळासाहेबांची होती. .. (पर्वानंतर यातल्या सर्व कलाकारांच्या गाण्यांचा एक आल्बम चॅनल काढणार असे आश्वासन चॅनलने दिले होते , परंतु चॅनल आता त्याकडे लक्ष न देता पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले सुद्धा....

आली माझ्या घरी ही दिवाळी

लेखक प्रभो यांनी रविवार, 25/10/2009 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीला घरी गेलो होतो.त्याची काही छायाचित्रे मिपाकर कुटुंबियांसोबत शेअर करावी वाटली म्हणून इथे देत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढलेली रांगोळी. ही रांगोळी आईने काढली.

गोष्ट छोटी डोंगरा एवढी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 24/10/2009 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या". कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'. ह्या आणी अशा अनेक शेतकर्‍याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्‍या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्‍याच्या खर्‍या अडचणी काय आहेत ? शेतकर्‍यावर आत्महत्या करायची वेळ का येते ?