Skip to main content

जीवनमान

माझं "पलायन" १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 02/07/2019 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझं "पलायन" १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

तुझे शहर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 02/07/2019 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय – डोळे न उघडता तुला पाहून आलेय रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे – तुझा हात घामेजला आहे मंदिरातले कासव ओलांडले आहे – तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे – लोबानचा गंध दरवळत आहे मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे – हात चिकट, तोंड गोड झाले आहे भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत – तुझे डोळे चमकत आहेत रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे – तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे त्या झाडाखाली क्षणभर थांबलो आहोत – तू सावली, मी नि:श्वास झालो आहोत लाचा घेताना मी गोंधळले आहे – तू म्हणतोस, रंग जाऊ दे, आठवणी राहू देत

"व्रात्यस्तोम"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 30/06/2019 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी ऋतुप्राप्ती होण्या अगोदरच मुलींची विवाह होत असत … पण ऋतुप्राप्ती झाल्यानंतर जर एखाद्या मुलिचे लग्न करायचे झाल्यास "व्रात्यस्तोम" विधी करावा लागे असा संदर्भ "उंच माझा झोका" मधे ऐकला.. ज्यांच्यावर अजिबात संस्कार झालेले नाहीत किंवा वेळेवर झाले नाहीत त्या लोकांना शुध्द करण्यासाठी व्रात्य स्तोम विधी केला जातो . ऋतू येण्यापूर्वी मुलीवर विवाह संस्कार झाला पाहिजे अशी कल्पना असण्याच्या काळात उशिरा विवाह झाल्याने म्हणजे योग्य वेळी संस्कार न झाल्यामुळे पतित व्यक्तीला यात शुध्द करून घेतले जाते . परधर्मीय , परदेशीय व्यक्तीबरोबर राहिल्यास जेवण केल्यास सुध्दा या विधीने शुध्द होता येते .

आयुष्य

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 30/06/2019 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य खूप साधे आणी सरळ आहे पण दिसते इतके सोपे पण नाही.. आयुष्य समजावून घेण्याच्या भानगडीत न पडलेले बरे.. मस्त जगत राहणे हाच एक मार्ग आहे.. ब्रह्मांडातल्या अदृश्य शक्ती तुम्हाला मदत करायला उत्सुक आहेत.. तुमचा ज्या प्रमा्णात विश्वास व श्रद्धा आहेत त्या त्या प्रमाणात तुम्हाला मदत मिळत असते. * आयुष्याचा उद्देश काय? मी इथे का आलो आदी प्रश्नाच्या जंजाळात अडकू नका.. कारण त्याची उत्तरे आपणास मिळणार नाहीत.. जीवन जगण्यासाठी आपण कारण निर्माण करायचे असते.. एखादी कला..विचार छंद यात स्वतःला झोकून द्या,,जीवन जगण्याचा तो उद्देश बनू शकतो..त्यांतूनच जीवनाचा अर्थ उमगत असतो.

माझं "पलायन" ११: पुन: सुरुवात करताना

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 28/06/2019 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
११: पुन: सुरुवात करताना डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/06/2019 03:29 या दिवशी प्रकाशित केले.

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

कलाकारः सुत्रधार आणि दोन सहकारी कलाकार (दोघांकडे एक एक वाद्य असेल तर उत्तम.) (शक्य असल्यास पथनाट्य सादरीकरणाआधी स्थानिक जनतेच्या अवलोकनार्थ, वातावरण निर्मीतीसाठी पाण्याच्या अपव्ययाचे, दुष्काळाचे प्रातिनिधीक छायाचित्रे असलेला फलक लावावा.) एक सहकारी कलाकार (पाणीवाल्याच्या भुमिकेत ): पाणी घ्या पाणी, पाणी घ्या पाणी! दुसरा सहकारी (स्त्री भुमिकेत): अरे ए पाणीवाल्या कसे दिले पाणी? पाणीवाला: शंभर रुपयाचा एक ग्लास पाणी, पाणी घ्या पाणी. स्त्री: काय!

ती म्हणाली " चिमणी " , मी म्हणालो भुर्रर्रर्र

लेखक खिलजि यांनी सोमवार, 17/06/2019 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
ती म्हणाली " चिमणी " मी म्हणालो भुर्रर्रर्र ती म्हणाली " कावळा " पुन्हा उत्तरलो भुर्रर्रर्र आलतूफालतू उत्तरं देऊन आमचं प्रेम झालं सूर्रर्रर्रर्र लक्षात ठेवून होतो चांगलंच गुढघ्यात असते अक्कल डोकं बाजूला ठेऊन काम होतंय थोडीच पाहिजे शक्कल कशाला करावा अभ्यास ? कशाला हवी ती नोकरी ? कुणी सांगितलंय घासायला पटवावी श्रीमंत बापाची छोकरी सासरा बिचारा राबेल कन्या भोळीच असेल होऊन जायचं घरजावई आपोआप झोळी भरेल {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
काव्यरस

जर्नी इस द रिवॉर्ड

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 14/06/2019 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
जगातले काही शोध असे आहेत, ज्यामध्ये पूर्ण समाजाला बदलूंन टाकायची शक्ती असते. कम्प्युटरचा शोध या महत्वाच्या शोधांपैकीच एक. कम्प्युटर जेव्हा प्राथमिक अवस्थेत होते तेव्हा कोणी विचारही केला नसेल, कि येत्या काही दशकांत तुम्ही घरबसल्या दुसऱ्या खंडातल्या लोकांशी संवाद साधू शकाल, खिशात १००० गाणी ठेवून फिरू शकाल. खरं तर तेव्हा अशी कोणी कल्पना असती तर त्याला अगदी वेड्यात काढलं असतं, पण म्हणतात ना वेडी माणसंच इतिहास घडवू शकतात.

भविष्याचे भूत...

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 10/06/2019 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
अंगावर भयचकिताचा सरसरीत काटा येणे म्हणजे काय ते आज अक्षरश: अनुभवास आले. रोजच्या राजकारण आणि भक्तरुग्ण वादाची झिंग एका झटक्यात उतरली, आणि मन भानावर आलं. असं काही झालं, की आपोआप सहावे इंद्रिय जागे होते, आणि भविष्य जणू भेसूर होऊन वर्तमानाच्या रूपाने विक्राळपणे समोर येते.

एक वादळ शांत होतांना

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 04/06/2019 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा बॉक्सिंग हा शब्द मनात येतो तेव्हा- तेव्हा तुमच्यासमोर सर्वात पहिले नाव येत ते The undisputed heavyweight champion of the world ‘महंमद अली’चं! १७ जानेवारी १९४२ ला केंटकी मधल्या लुइजविल शहरात त्याचा जन्म झाला. त्याचं आधीचं नाव 'कॅशियस क्ले' १२ वर्षाचा असताना त्याची सायकल चोरीला गेली होती, त्याची तक्रार करण्यासाठी तो मार्टिन नावाच्या एक पोलिस ऑफिसरकडे गेला, तिथे त्याचा आवेश पाहून, मार्टिनमामांनी हि उर्जा बॉक्सिंगमध्ये खर्च करायला सांगितली आणि एक जग्गजेत्याचा प्रवास सुरु झाला. त्याचा उर्जेवर आणि चपळतेवर प्रचंड विश्वास होता.