Skip to main content

जीवनमान

हॅलोवीन पंपकिन!

लेखक चतुरंग यांनी रविवार, 01/11/2009 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या शुक्रवारी हापिसातून घरी आलो तो मुलगा धावत येऊन मिठी मारत म्हणाला " बाबा, आज हॅलोवीनचा पंपकिन कार्व करायचाय!" हो हो म्हणत त्याला थोपवला. जेवणं वगैरे होईपर्यंत चिरंजिवांनी कसाबसा दम काढला. हातांवर पाणी पडताच "मी टूलकिट काढतो!" म्हणत त्याची धाव क्लोजेटकडे गेलीच. टूलकिट म्हणजे दोन वर्षाखाली भोपळा कोरायला आणलेली छोट्या हत्यारांची एक पुडी.

आप्ले भेन्डीभावु

लेखक यन्ना _रास्कला यांनी रविवार, 01/11/2009 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
जामच पाठी लाग्ले.लिव्हा कायत्री म्हनुन. काय लिहाव ते कायच कळेना. मग मनाताल आपन ज्या सौस्थेच काम कर्तो त्येच्याविश्यीच लिहिल तर. त्येव्हड्च माहितीच आदान आनी परदान. मी पुर्वी माहाराष्ट्र अनिसच काम करत होतो. महाराष्ट्र अनिस हि नरेन्द्रजी दाभोलकरान्ची सौस्था आसुन तिचा श्या* दा* यान्च्या नुस्त्या अनिसशी कायच संबंध नाय.

याहु अकाउन्ट

लेखक पर्नल नेने मराठे यांनी रविवार, 01/11/2009 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, परवा रात्री मी याहु लॉगिन केले. काल सकाळी येउन परत लॉगिन करण्याचा प्रयत्न केला तर पासवर्ड चालत नाहिये असा मेसेज येतोय. मी customer care ला तक्रार नोन्दवीली आहे.alternate id वर रिप्लायची वाट पहात आहे. मी गुगलवर जाउन सर्च केले तर बर्याच लोकाना असा अनुभव आला आहे. माझ्या काही मैत्रीणीचे असे म्हणणे आहे कि माझे याहु अकाउन्ट /आयडी डिअ‍ॅक्टिवेट झाला. डिअ‍ॅक्टिवेट असेल तर बरे होइल कारण बरिच परर्सन्ल माहिती त्यात आहे जसे स्कॅन्ड कॉपीज(पासपोर्ट, पॅन,सर्टीफिकेट्स) म्युचुअल फन्द्स ऑनलाइन स्टेटमेन्ट्स. पण जर हॅक झाला असेल तर कठिण आहे, दुरुपयोग होउ शकतो.

जर - तर

लेखक टुकुल यांनी शुक्रवार, 30/10/2009 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापुर्वी दुसर्‍या नोकरीतल्या हापिसात बसुन संगणकाशी जुंपलेलो असताना योगेश नि आवाज दिला, "अरे तुझा फोन आहे" मोबाइल असताना मला हापिसात कोन फोन करेल विचार करत मि फोन उचलला.. "हेलो" "मिल्या, शिवा बोलतोय" "*** तु मोबाइलवर फोन का नाही केलास?" "अरे सहज, बघत होतो कि तु नक्की ऑफिसमधेच असतोस कि इकडे तिकडे टवाळक्या करतोस" "झाली का खात्रि? बोल आता" "चल येतोस का घरी, मि निघत आहे आता" "अरे नाही यार, आज थोडा उशीरच होइल, तु हो पुढे" "चल ठीक आहे.. सॉरी यार" "कशाबद्द्ल?" "काही नाही.. सॉरी " "ये येड**, नीट बोलशील का?" " काही नाही रे, सोड.. बर तुला एक मेल केली आहे..

एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे.

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/10/2009 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे. आज पराशेठ चा ताईचा सल्ला वाचला अन मला माझी ताई लिहीत असणार्‍या 'साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला' याची आठवण झाली. हा सल्ला जरी हलकाफूलका, खेळकर वातावरणात लिहीला गेला तरी त्यात माझ्या मते एक अतिशय चांगला सल्ला दिला गेला आहे. आजकाल सगळीकडे विज, पाणी यांच्या भविष्यातील टंचाईबद्दल बोलले जाते. तस पाहिले तर या दोन्ही गोष्टी आपण फारच हलक्या घेतो.

गोष्ट छोटी डोंगरा एवढी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 24/10/2009 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या". कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'. ह्या आणी अशा अनेक शेतकर्‍याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्‍या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्‍याच्या खर्‍या अडचणी काय आहेत ? शेतकर्‍यावर आत्महत्या करायची वेळ का येते ?

... देवाचं घर !

लेखक दशानन यांनी शनिवार, 24/10/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं.

समृद्धीची रास, घरोघरी...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 24/10/2009 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे ऐन दिवाळीतले १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यानचे आठ दिवस देशात `सोनियाचे दिन' होते... दिवाळीच्या दिवसांना सोन्याची झळाळी आली आणि मंदीचे सावट त्यात पुरते झाकोळून गेले. गेल्या वर्षीपर्यंत,दिवाळीच्या दिवसांची चाहूल लागताच, कामगारांच्या `बोनस'च्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरून जायचे. यंदा त्या बातम्या दिसल्याच नाहीत... त्या बातम्यांची जागा नव्या बातम्यांनी घेतली. दिवस खरंच बदललेत काय? दिवाळीचे दिवस यंदा सोन्याच्या विक्रीच्या दृष्टीने खासच लक्षणीय राहिले. यंदा या दिवसात लोकांनी तब्बल ५६ टन सोने खरेदी केले.