Skip to main content

जीवनमान

चवीने खाणार त्याला...

लेखक सुबक ठेंगणी यांनी बुधवार, 16/09/2009 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन गणपतीच्या दिवसातलं घर. घालीन लोटांगण, मंत्रपुष्पांजली होते. देवासमोर क्षणभर हात जोडून सगळे पदर भराभर खांद्यावरून कमरेला खोचले जातात. एकीकडे बॅकस्टेजला पेलेवाटयांची खणखण सुरू झालेली असतेच त्यातच फ्रीजमधल्या गारेगार कोशिंबिरीला खमंग फोडणी पडते, तळणीत पापडकुरडया फुलून येतात, आमटीला उकळया फुटतात, आणि गोरेगोमटे मोदक सारणाचं गोड गुपित सांगण्यासाठी तोंड उघडण्याची वाट बघत चाळणीत ताटकळत बसून असतात. म्हणता म्हणता पानं मांडली जातात. “उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म” म्हणेम्हणेपर्यंतच तोंडात असंख्य चवी पाझरू लागलेल्या असतात.

डोंबारी

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 14/09/2009 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गल्लीत काल छत्तीसगढी डोंबारी आला होता. त्याची लहान मुलगी व त्या डोंबार्‍याचे हे फोटो. ह्या फोटोतील मुलीचे हावभाव फक्त एंजॉय करा. लहान मुलगी कामाला लावली, बालकामगार, दोन मुलांमधली परिस्थिती वैग्रे, वैग्रे काही डोक्यात आणू नका. जस्ट एंजॉय लाईफ अ‍ॅज दॅट गर्ल एंजॉयस हर सिच्यूएशन! अँड कमेंट ऑन दॅट. लाईफ ईज व्हेरी हॅपी दॅन वी थॉट. Dombari डोंबारी १ Dombari2 डोंबारी २

अर्धा कप चहा

लेखक सुनिल पाटकर यांनी रविवार, 13/09/2009 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धा कप चहा चहा पिणं हा तसा प्रत्येकाचा आवडता शौक .मी तसा सतत फिरत असल्यामुळे कुठेनंकुठे अर्धा कप चहा आमचा होतचं असतो.अगदी ए.सी. रुमअमध्ये बसून नाहीतर चहाच्या टपरीवर चक्क उभं राहून.वेगवेगळ्या स्तरात वेगवेगळ्या चवीचे चहा मी रिचवला आहे. सरकारी कार्यालयात कामानिमित्त नेहमीच फेर्‍या होत असतात,असाच एकदा कार्यालयात चहा मागविण्यात आला.चहा घेऊन येणारा ‘पोर्‍या‘ असेल १०-१२ वर्षाचा!

मर्यादा

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 09/09/2009 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
रौद्र तांडवे अंगे घुसळीत चंद्रमोहीत श्वासा सोडीत युगायुगांचे जीवन पेरीत सांभाळली मर्यादा कोटी कोटी मस्त्य थवे एक दुजांचे जीवन नवे मनुजही घेती थोडे बरवे सांभाळूनी मर्यादा नद्या मुखींचा गाळ गळोरा त्यामधूनी ये विश्व आकारा खाडी बनली मस्त्य धुमारा सांभाळूनी मर्यादा खोल तळाशी भुतल क्रंदन ज्वालांचेही रसमय नर्तन सागर अद्भुत खेळ चिरंतन सांभाळूनी मर्यादा जसा होतसे मानव सक्षम सागर भासू लागे धनसम कसे लुटू दोनच कर मम यंत्रे वाढवू मर्यादा अगडबंबशी जाल रोवीली मस्त्यथव्यांची रास खेचली कोटी तृणागत मृत फ़ेकली उधळण अमर्याद खाडीप्रत जाती मस्त्यथवे धारून अंतरी बीज नवे विषमयी गटारे तेथ मिळे हत्याकांड अमर्

वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 08/09/2009 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९ * हि तारीख ०९ सप्टेंबर २००९ ला, उद्या येते आहे. हा वर्षाचा २५२ वा दिवस आहे. २५२ च्या आकड्यांतली बेरीज ९ येते आणि ०९/०९/०९ ची बेरीज = ९+९+९=२७=९ ! * ०९/०९/०९ ही तारीख १००१ वर्षातली तसेच शेवटची एकेरी तारीख आहे. * हि तारीख सप्टेंबर च्या बुधवारी येते. ईंग्रजीत सप्टेंबर व बुधवार या स्पेलींगमध्ये (September व Wednesday) ९च अक्षरे आहेत. आधार : अर्थातच, आंतरजाळ

पुनरपी सेवेसी....

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 07/09/2009 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो, नमस्कार. स्वाईन फ्ल्यूच्या प्रादुर्भावाने बंद ठेवावे लागलेले आपले यज्ञकर्म उपहारगृह आज दिनांक ६ सप्टेंबर २००९ रोजी पुन्हा पुर्ववत सुरू करण्यात आले आहे. आपणा सर्वांस नम्र विनंती आहे की आपल्या सोयी नुसार लवकरात लवकर यज्ञकर्मास भेट देऊन चमचमीत पदार्थांची लयलूट करावी. धन्यवाद.

पोवाडा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा - राज ठाकरेंचा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 03/09/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
पोवाडा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा - राज ठाकरेंचा सदर पोवाडा हा चालीत म्हणण्यासाठी काही ठिकाणी काही शब्दांची द्विरुक्ती होवू शकते. (पोवाडा वाचतांना मागे डफ वाजतो आहे अशी कल्पना करा.) स्टाँग डिस्क्लेमर: माननिय बाळासाहेबांचा व राज ठाकरेंचा मी आदर करतो व यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. तत्राप कोणाला कोणतेही आक्षेप असतील तर हा पोवाडा माझा वैयक्तिक समजावा.
काव्यरस

राजजींच्या 'रोखठोकनाम्या'ची 'ब्ल्यू प्रिंट'

लेखक भोचक यांनी गुरुवार, 03/09/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुराणकाली राक्षस ही संज्ञा वापरली जायची, तद्वतच हल्ली महाराष्ट्र देशी 'भय्या' ही संज्ञा जवळपास त्याच अर्थी वापरली जात आहे. तर सांगायचे असे की या भय्या मंडळींचे महाराष्ट्र देशीची राजधानी मुंबई व इतर नगरांत वर्चस्व वाढू लागल्याचे राज यांच्या चाणाक्ष चष्म्याने टिपले आणि नवनिर्माण बाजूला ठेवोन त्यांनी 'झाडाझडती' हाती घेतली.