मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सावरकर आजोबा गेले.

चतुरंग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आताच समजलेल्या बातमीनुसार गुरुवार दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री झोपेतच त्यांचे निधन झाले. एक अविश्रांत धडपडणारा, कर्तबगार, करारी जीव मृत्यूला शांतपणे सामोरा गेला. त्यांना शेवटपर्यंत काहीही मोठे आजारपण नव्हते. सगळे काही अचानक घडल्याने त्यांचा मुलगा अभिजित इकडून लगेच जाऊ शकलेला नाही. मागल्या वर्षी आजोबांची भेट इथे झाली आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित लेखमाला मला लिहिण्याचे भाग्य प्राप्त झाले हा माझ्या आयुष्यातला एक मोठा आनंदाचा आणि आगळ्या समाधानाचा काळ होता. त्यांचे थोडे तरी अनुभव शब्दबद्ध होऊ शकले हा मोठा योगच. मे महिन्यात माझ्या मुलाच्या मुंजीत त्यांच्या आवर्जून फोन आला होता आणि त्यांनी आशीर्वादही दिले होते. त्यांच्याशी झालेले ते बोलणे शेवटचे ठरावे हा दैवयोग! ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना ह्या दु:खातून लवकर बाहेर पडण्याचे बळ देवो ही प्रार्थना! (साश्रू)चतुरंग -------------------- सावरकर आजोबा ह्या लेखमालेचा दुवा - http://www.misalpav.com/node/9354

वाचने 4852 वाचनखूण प्रतिक्रिया 21

In reply to by सुनील

सहज 13/08/2010 - 21:01
असेच म्हणतो. भावपूर्ण श्रद्धांजली.

बहुगुणी 13/08/2010 - 22:21
या कर्मयोग्याची भेट झाली म्हणून तुम्ही नशिबवान, आणि आमची ओळख लेखातून झाली हे आमचं भाग्य. एका कृतार्थ आयुष्याची अखेर झाली असली तरी त्यांचा सल्ला पुन्हा उद्धृत करावासा वाटतो: "आपण मेहेनतीने, कष्टाने आपला अधिकार सिद्ध केला पाहिजे आणि तो टिकवून ठेवला पाहिजे. काही माहीत नसताना उगाच वायफळ चर्चा करु नका. शब्दांचे बुडबुडे काढू नका. विषयाची खोली समजून घ्या आणि मग पुढे चला. आनंदी रहा. काम करत रहा. आशा ठेवू नका. पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे ही गोष्ट कधीही नजरेआड करु नका. हव्या त्या गोष्टी आपोआप मिळत जातात!"

ऋषिकेश 13/08/2010 - 22:35
अरेरे! धमु म्हणतो तसे कोण कुठली लोकं.. कधीही न बघितलेली.. केवळ त्या लेखमालेतून भेटलेले आणि ही बातमी कळल्यावर जीव गलबलला! सावरकर आजोबांना आदरांजली!

स्पंदना 13/08/2010 - 22:37
तुमच्या दुखा:त एक सह प्रवासि म्हणुन आम्हीही सामिल आहोत. थोडच वाचल आत्ता पण तुमच्या लिहिण्यावरुन तुम्हाला त्यांच्या बद्दल असणारा आदर व आपुलकी जाणवली. धीर राखा!

नंदन 13/08/2010 - 22:42
सावरकर आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली. चतुरंग यांनी शब्दबद्ध केलेल्या त्यांच्या मनोगतात दहिसरमधले अनेक ओळखीचे उल्लेख आले होते.