एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब. सगळ अगदीच सामान्य. अशाच घरात माझा जन्म झाला..
लहानपणाचं आयुष्य आजुबाजुचं जग बघत बघत मोठं झालं, कधी गरीबी कधी श्रीमंती, म्हणजे कधी साधी भाजी पोळी तर कधी पुरणपोळी अशा अर्थाने. भारतात जन्म घेतलास म्हणजे मार्बल्स्,विटी-दांडू, क्रिकेट आवडायलाच हवे असा मनावर एक कोरला गेलेला ईतिहास, मला बास्केटबॉल आवडायचं.
आयुष्य म्हणजे जे आपले आई-बाबा, शेजारी जगताहेत तेच असतं असा परिस्थितीचा आग्रह. पण मला हे कधीच पटत नव्हतं, हे असं नको- असं असायला हवं अशी माझी जिज्ञासा आणि अपेक्षा. त्यामुळे घरात आणि घरा बाहेर मी नेहमीच एक रेबल (ईंग्रजी). शाळेत कायम पहिला कारण दबाव, पण अभ्यासात मन रमत नाही. अभ्यास सोपा आहे, मला काहीतरी वेगळं करायचंय, बघायचय... ही मनोमन ईच्छा.
चांगला अभ्यास कर, मग तुला आयुष्यात पाहिजे ते मिळेल असं कुणीतरी सांगुन गेलं. खुप अभ्यास केला, फक्त मार्कस मिळाले, बाकी काहीच नाही, पुढे काय? मी विचारलं तेव्हा अजुन अभ्यास कर असं उत्तर मिळालं आणि अभ्यास एक फॉर्मॅलिटी म्हणुन करत गेलो. कायम बॅकबेंचर म्हणुन ख्याती. पण मार्क्स नेहमीच चांगले मिळाले, कॉलेजातुन मला माझ्या प्रोजेक्टसाठी बक्षिसं मिळाली.
मध्यंतरी वडीलांना बिझीनेस मधे खुपच लॉस झाला. कॉलेजची फी भरण्यासाठी रात्रपाळीची, कधी कॉलेज न करता दिवसाची नोकरी करायचो, १५-२० किमी उन्हात पायी फिरायचो, तुटलेला बुट आणि त्यामुळे तळव्यात साकळलेलं रक्त, आजही ओठांवर एक हसु आणतयं. शेवटच्या वर्षाची फी भरण्यासाठी महिनो अन महिने एक वेळ जेवण आणि चार तासाची झोप घेतलेली आठवतेय. तोपर्यंत दु:ख म्हणून काहीच नव्हतं. उलट आनंद होता.
हळू हळू दिवस पालटले, स्वत:च्या ईच्छेविरुद्ध आणि आई-वडीलांच्या ईच्छेसाठी आयटीत नोकरी मिळवली. बघ्याच्या दृष्टीने - "काय मजा आहे ब्वॉ, सगळं कसं मजेत चाल्लयं" :)
खरच सगळी एक मजा आहे. अनेक पैलु आहेत नशीब कुठे कसे व का घेऊन जाईल कुणालाच माहित नसते. पण आपले कर्म आणि कर्तव्य करत रहाणे हेच योग्य. अशांपैकीच एक म्हणुन आई वडीलच काय, तर मावशी, आजी-आजोबांना विमानाने फिरवलं. लहान भावाला पुढे शिकवलं. घर बदललं, सगळ्या सुखसुविधा परत आणल्या. आईच्या चेहर्यावरचा आनंद आणि अभिमान मला आजही प्रोत्साहित करतो.
आज देशाबाहेर आलो, इथे हेड ऑफिसला कायमची ट्रान्स्फर झाली, आता आई-वडीलांना फिरायला घेऊन येईन.
पण आजही माझे काही चांगले मित्र, नातेवाईक जेलसीमुळे वाईट गुण गातात. मी त्यांना आजही मदत करायच्या प्रयत्नात आहे आणि हे लोकं जळतायत? का?
हो, आता तो बाहेर गेला, बिघड्णारचं, बिघडला असेलच. उगाचच पैसे मिळतात ह्या आयटीवाल्यांना. संस्कृती बिघडवतात. आई-वडीलांना अक्कल नको... पोराला सोडलं उनाड बाहेर वळुसारखा..... वगैरे वगैरे.. कै च्या कैच.
आणि ज्यांना गरज आहे (ज्यांची मुले शिकत आहेत) ते मात्र काहीच बोलत नाहीत. कारण एकच, आम्हाला गरज पडेल........
अर्थात मला ह्या सर्व प्रकारांशी कर्तव्य नाही. पण मग मी कुठे चुकलो? माझं काय चुकलं? हा समाज/आपलेच लोक असे का वागतात? असा प्रश्न कधी कधी भिरभिरतो..
आपलाच,
(प्रामाणिक) मराठमोळा.
(मी आयटीत आहे आणि देशाबाहेर आहे हे सांगण्याचा अजिबात उद्देश नाही ;) )
वाचन संख्या
4163
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिम्या च्यायला ह्या असल्या
कोपर्यात गुढघ्यात मान खाली
In reply to मिम्या च्यायला ह्या असल्या by परिकथेतील राजकुमार
आपण जे काय करतो ते बरोबर आहे
मार्बल
फाटा
तुम्हीच उत्तर दिलेय..
Animation हे आय टी मध्ये येत
आहो
बाकी सगळं सोडा
सोड बे.... पराचं ऐक.
ह्येच म्हणतो..
In reply to सोड बे.... पराचं ऐक. by बिपिन कार्यकर्ते
care a damn man!
साधी गोष्ट आहे...तुमच्यावर
परत एकदा कट्टा करू रे ;)
आपण आराम खुर्चीत बसला आहात.
ये जीवन है, इस जीवन का यही है
दील पे मत ले यार! एका कानाने
शिल्पा ब, परा यांच्या
काही मनाला लावून घेवू नका हो.
माझं काय चुकलं??
राक्या !! तु पुण्यात कधी
छान
राक्या ***
ममो, इतका विचार करु नका.
लोक तुमचा हेवा करतात हो
:-)