Skip to main content

जीवनमान

विष्णूजी की रसोई...अनाहिता कट्टा वृत्तांत

लेखक भावना कल्लोळ यांनी सोमवार, 07/04/2014 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : मधुमेह किंवा गोडाची एलर्जी असलेल्यांनी या शिकरण टाइप धाग्यापासून लांबच रहावे. कॉल्लिंग अनाहीतास ……… असे करून आमच्या इरोपस्थित मृणालिनी बाईनि त्या भारतवारीला येत आहेत तरी आपण सर्वंजणीनी भेटुन कट्टा करायचा आहे हो अशी दवंडी दिली अनाहिता मध्ये. मग काय… पोरगी माघारपणाला येत आहे (जरी नेरूळ सासर असले तरी) आमच्यासाठी तर माघारपणाला येत आहे म्हंटल्यावर आम्ही साऱ्या मुंबैकारणी स्वागताला हजरच. :dance: तर स्वागत हि शेवटी थोडे राजेशाही वाटायला हवे म्हणून " विष्णुजी कि रसोई, ओवळे नाका, ठाणे ठिक सकाळी ११ वाजता" येथे करण्याचे आयोजिले.

सुख म्हणजे नक्की काय?

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 07/04/2014 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल हा प्रश्न मला सारखा पडतोय. सुख म्हणजे नक्की काय? प्रत्येकाची सुखाची व्याख्या निराळी असते हे अगदी खरं. पण कधी कधी मनाला होणारा मनमुराद आनंद म्हणजेच सुख का? परवा मी दुपारी जेवायला बसलो. झणझणीत वांग्याची भाजी (खान्देशी इष्टाईल), ज्वारीची भाकरी, साधं वरण, कांदा-टोमॅटोची भाजलेले शेंगदाणे घालून केलेली गार-गार कोशिंबीर...अहाहा. दोन भाकरी कुस्करल्या, त्यात साधे वरण घातले आणि त्यात झणझणीत भाजी घातली. थोडे लाल लाल तेल घेतले. आणि गारेगार कोशिंबीरीसोबत हाणायला सुरुवात केली. माझ्या उदरात नेमक्या किती भाकरी गडप झाल्या हा हिशेब न सांगणेच इष्ट ठरेल. जेवण झाल्यानंतर माझे मन अगदी प्रसन्न झाले.

भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र”

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 07/04/2014 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र” सादर केले आहे, ज्यात जमेल तिथे विदेशी अर्थपुरवठा वापरून पण त्याच्या कुबड्या न बनवता भारतीय अर्थपुरवठा व भारतीय साधनसामुग्री वापरून श्रेष्ठ भारत, सशक्त भारत आणि दृढ भारत बनवण्यासाठी पक्षाने धोरण सुनिश्चित केले आहे.

प्रवास

लेखक पैसा यांनी शुक्रवार, 28/03/2014 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांनी नवर्‍याबरोबर रेल्वेने एका छोट्या प्रवासाला निघाले होते. आदल्या दिवशीच पुण्याहून बसने परत आले होते आणि तत्कालमधे रिझर्व्हेशन करायलाही जमलं नव्हतं. तीन साडेतीन तासांचा प्रवास आहे, जाऊ जनरलमधे बसून म्हटलं आणि निघालो. स्टेशनवर पोचलो तर गाडी अर्धा तास लेट असल्याचं शुभवर्तमान कळलं. मग तिकीट काढून जनरलचा डबा समोर येईल अशा बेताने प्लॆटफॉर्मवरच पेपर टाकून मस्त बैठक मारली. रूळ क्रॉस करणार्‍या बर्‍याच मंडळीचं निरीक्षण करून झालं. एक पाणचट चहा पिऊन झाला. शेवट अर्धा तास उशीरा येणारी गाडी एक तास उशीरा येऊन प्लॆटफॉर्मला लागली.

शिद्दत

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 24/03/2014 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात सावरकर जयंती होऊन गेली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपलं आयुष्य समर्पित केलेल्या असंख्य सेनांनीपैकी हा एक सेनानी, विनायक दामोदर सावरकर. एक युगपुरुषच म्हणावा लागेल; एक देवाचा अवतार. असीम देशभक्ती आणि ध्येयाचा पुतळा. अंदमान मधील तुरुंगात असताना त्यांनी जे हाल सोसले, ते वाचतानाही अंगावर काटा येतो. त्यांनी ते प्रत्यक्ष कसे सोसले असतील त्यांनाच ठाऊक. असेच आतोनात हाल भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येक क्रांतिकारकाने कमी अधिक प्रमाणात सोसले होते.

देव पाहिलेला माणूस

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 23/03/2014 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला माझ्या सारख्या बर्‍याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला काय देवा आज इकडे कुठे?

मदतीचा हात हवाय…….

लेखक अनिकेत प्रकाश आमटे यांनी शनिवार, 22/03/2014 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! हे पत्र आपल्याला पाठवण्याचे कारण, आजवर या न त्या कारणाने आपला डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा, ता. भामरागड, जि. गडचिरोलीशी’ आपला संबंध आला असावा. आपण कदाचित प्रकल्पाला भेट अथवा देणगी दिली असेल, सौ. साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे किंवा श्री. विलास मनोहर यांचे एखादे पुस्तक निश्चितच आपल्या वाचनात आले असेल. तसे नसतानाही आपल्याला अनवधानाने हे पत्र मिळाल्यास दिलगिरी व्यक्त करून या पत्रामागचे प्रयोजन स्पष्ट करते. ज्येष्ठ समाजसेवक श्री. बाबा आमटे प्रस्थापित आणि डॉ. प्रकाश आमटे संचलित हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेला आज 40 वर्षे पूर्ण झाली आहेत.

कॅलिडोस्कोप ३

लेखक kurlekaar यांनी शनिवार, 22/03/2014 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
बेगम अख्तर “हमरी अटरियापे आओ सांवरिया, देखा देखी बलम हो जाये आओ साजन तुम हमरे द्वारे, सारा झगडा खतम हो जाये” ठुमरी “ये मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया” गझल पंकज मलिक. सी एच आत्मा व सेहगल ही मंडळी आमच्या आधीच्या पिढीतली. बेगम अख्तर देखिल त्याच पिढीतली. या पुरुष मंडळींच्या आवाजातला दर्दीला भारदस्तपणा अजून ऐकायला बरं वाटत असलं तरी एका दृष्टीने पाह्यला गेलं तर ही पुरुष गायक मंडळी किंचितशी कालबाह्य झालीयत, कारण नंतर तलत मेहमूद, गुलाम अली, भूपिंदर, जगजीत सिंग यांची inning सुरु झाली. तसं बेगम अख्तरचं नाहीं.

तिकीट

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 21/03/2014 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी रेल्वेची तिकिटे सुद्धा प्रथम श्रेणी हिरवी , द्वितीय श्रेणी पिवळी/केशरी , platform पांढरी अशी वेगवेगळ्या रंगांची असायची.. आता मात्र सरसकट एकाच पद्धतीच्या कागदावर छपाई ... किती रटाळ वाटते.. आणि विमानाची तिकिटे तर सुरेख चेकबुक सारखी असायची .. प्रत्येक विमानकंपनीचे स्वतंत्र रंगसंगतने नटलेले कव्हर, सुरेखश्या पाकिटात घालून आपल्याकडे यायची. राजधानीचे तिकीट सुद्धा तसेच चेकबुक सारखे असायचे.. त्या तिकिटांना एक सौंदर्य, भारदस्तपणा असायचा, एक ऐट असायची.. हल्ली ई-तिकीट ह्या प्रकाराने हा सगळा प्रकार अतिशय रुक्ष झालेला आहे..

भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी

लेखक आयुर्हित यांनी गुरुवार, 20/03/2014 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
आलो रे धावून खास तुझ्यासाठी भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी करेल इच्छा पुरी चंद्रभागा काठी कर कटेवर ठेवुनी उभा हा जगजेठी ॥१॥ देईल सारे तुला जे सर्वांनाच हवे रोज रोज खाशील नवनविन मेवे सर्वांच्या आनंदाला उधाण यावे दही दुध तूप लोणी सर्वांनी खावे ॥ २॥ घेत असतो मी अधेमध्ये परीक्षा नापास झाल्यास देतो मोठी शिक्षा वेळ आली तर मागावी लागते भिक्षा अडल्याला करावी मदत ही खरी दीक्षा ॥ ३॥