Skip to main content

जीवनमान

अखेर

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 20/06/2014 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी तिला पाहते तेव्हा सकाळचे नऊ वाजले आहेत. अर्थात लाकडाची मोळी डोक्यावर वाहताना तिचा चेहरा खाली झुकला आहे त्यामुळे मला तो दिसत नाही. stree तिची आणि माझी ओळख नाही आणि मी तिच्याशी बोलत नाही, त्यामुळे ती ओळख होतही नाही. स्वत:च्या कामात मग्न असणा-या त्या अनोळखी स्त्रीचा फोटो काढणं खरं तर योग्य नाही, ते एका अर्थी तिच्या खासगीपणावर आक्रमण आहे याची मला जाणीव आहे. पण तरीही मी हा फोटो काढते.

अंतरीच्या गुढगर्भी जे मला जे भावले ========स्वच्छन्द मकरंद !!

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी शुक्रवार, 20/06/2014 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरीच्या गुढगर्भी जे मला जे भासले !!!!घेई च्छन्द मकरंद . स्वच्छंद मकरंद, डॉ. दत्ता फाटक .

मनात पूजीन रायगडा !!!

लेखक धन्या यांनी बुधवार, 18/06/2014 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
पायाखालची रायगड जिल्ह्याची माती सुटून आता दहा वर्ष झाली मात्र त्या मातीचा सुगंध आजही मनात दरवळतोय. असं वाटतं की शाळेत आपल्याला पुर्ण नांव सांगायला सांगितलं आहे आणि आपण नांव सांगून झाल्यानंतर एका दमात "मुक्काम वडगांव कोंड पोष्ट गोरेगांव तालुका माणगांव जिल्हा रायगड" असा पत्ता सांगत आहोत. गावातून बाहेर पडून पूर्वेला तोंड करुन उभे राहीले की दूरवर समोर दिसणारा कावळे घाट आणि त्याच्या पाठीमागे दिमाखाने उभा असलेला छत्रपतींचा रायगड आजही नजरेसमोर तरळतो. लहानपणी आजीने सांगितलेली आख्यायिकाही आठवते. आमचे पोष्ट असलेल्या गोरेगांवाचे नांव म्हणे पूर्वी घोडेगांव होते.

यमराजाचे मनोगत....!

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 13/06/2014 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: १) (रेडा म्हणे वडाला) २) सेकंड होम... ३) नरेंद्र मोदिंचे विकास मंत्र गेला रेडा एकदाचा, मोठा भार होता, चारा खाउन माजलेला तो लालु प्रसाद होता. घोटाळ्यात अडकला कोळसा,महाग झाला गॅस. झटपट काम करण्यासाठी विन्टेज कारची आस!
काव्यरस

भय, निरुत्साह, साशंकता, ढळलेला आत्मविश्वास....

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 12/06/2014 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका मानसिक ताणतणावासंबधित लेखाला मी दिलेला प्रतिसाद (किंचित फेरफार करून) येथे लेख म्हणून टाकत आहे. बर्‍याच लोकांना असे छोटे-छोटे मनःस्वास्थ-विषयक त्रास होत असतात. कदाचित उपयोग होऊ शकेल हा लेख टाकण्याचा हेतू. शिवाय यातून चर्चा होऊन काही उपाय, अनुभव, निरीक्षणे शेअर करता आली तर सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. -------------------------------------------------------------------------------- अनामिक भय हे थोड्या-फार फरकाने सगळ्यांनाच असते. ते एखाद्या झाडाच्या कुजलेल्या अजस्त्र फांदीप्रमाणे कधी कधी खळखळ वाहणार्‍या निरुंद भागात अडकते आणि आपल्या मनाच्या प्रवाहीपणाला अडथळा ठरते.

मेट्रो ट्रेनचा अनुभव

लेखक साधा मुलगा यांनी गुरुवार, 12/06/2014 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवस प्रतीक्षेत असलेली मुंबई ची मेट्रो रेल्वे रविवार दिनांक ८ जून २०१४ ला सुरु झाली. त्याचे श्रेय कोणाला याचा वाद सुरु राहील परंतु माझासारख्या असंख्य मुंबईकरांना हि अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक घटना आहे. ज्यांना सेन्ट्रल ते वेस्टर्न प्रवास करायचा आहे, जास्तकरून जे रोज ठाणे, डोंबिवली , कल्याण आणि खाली ते अंधेरी, बोरीवली असा प्रवास करतात त्यांच्यासाठी नक्कीच वेळेची बचत करणारी आहे. मेट्रो रेल्वे चालू झाल्याच्या दोन तीन दिवस मी जो प्रवासाचा अनुभव घेतला आहे तो आपल्यासमोर मांडत आहे. सध्या मला इंटर्नशिप साठी चांदिवलीला जावे लागते.

पर्यावरणाची ऐशी तैशी!

लेखक मीराताई यांनी सोमवार, 09/06/2014 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर त्यांचं स्वप्न त्यांच्या मुठीत आलं होतं. घरातल्या जागेची अडचण, त्या पाठोपाठ येणाऱ्या अडचणी आणि बाहेरची गर्दी-गोंगाट यांच्यापासून सुटकेचा मार्ग त्यांना सापडला होता. नवीन वसणाऱ्या उपनगरातल्या एका मोठया गृहप्रकल्पात त्यांनी नाव नोंदवलं होतं. प्रख्यात अशा 'स्वप्नसिटी बिल्डर्स'नी या भागातल्या मध्यवर्ती अशा विस्तीर्ण भूखंडावरच्या स्वप्नराशि, स्वप्नमाला, स्वप्नकुटिर, स्वप्ननगरी, स्वप्नाली, स्वप्नील घरकुलांची मोठीच जाहिरात केली होती. प्रशस्त घरांच्या उंच उंच इमारती उभ्या राहूनही गाडयांसाठी, बाग-बगीचा, खेळण्यासाठी जागा आणि क्लब हाऊससाठीसुध्दा जागा उपलब्ध होईल येवढी ऐसपैस जागा होती ती.

कै. व्यंकटेश माडगुळकारांना साहित्यिक आदरांजली. भाग २

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 06/06/2014 13:40 या दिवशी प्रकाशित केले.

लोणी गावातील सांप्रत (ऑगस्ट २००९ मधील) परिस्थितीचा वृतांत (पुनर्संपादित 27 मे 2014)भाग २

संकलक - विंग कमांडर शशिकांत ओक

‘... खेडी बदलू लागली, देश स्वतंत्र झाला आणि काळाने विलक्षण वेग घेतला. खेड्याचा कायापालट झाला असे आपण म्हणतो. हा कायापालट कसा झाला आहे, काय झाला आहे. ह्याचा नीट तपास घ्यायचा तर कोट्साहेबाने जसे कुठलेतरी एक लोणी गाव घेऊन त्यांचा सांप्रत वृतांत लिहिला, तशी महाराष्ट्रातील दहा-पाच खेडी घेऊन त्यांचा लिहिला पाहिजे.

कै. व्यंकटेश माडगुळकारांना साहित्यिक आदरांजली. भाग 1

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 04/06/2014 17:48 या दिवशी प्रकाशित केले.

28 ऑगस्ट या कै. व्यंकटेश माडगुळकारांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना साहित्यिक आदरांजली.

लोणी गावातील सांप्रत (ऑगस्ट २००९ मधील) परिस्थितीचा वृतांत (पुनर्संपादित 27 मे 2014)भाग 1

संकलक - विंग कमांडर शशिकांत ओक

काही काळापुर्वी माझ्या हाती 'चित्रे आणि चरित्रे' या नावाचे कै. व्यंकटेश माडगुळकरांचे पुस्तक हाती आले. (उत्कर्ष प्रकाशन पुणे.

महाभारत

लेखक निलरंजन यांनी शनिवार, 31/05/2014 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !! इथे परकीयांपेक्षा स्वकीयांची भीती जास्त वाटते, जगण्यासाठी क्षणाक्षणाला संघर्ष करावा लागते, छोट्या छोट्या गोष्टींसाठी वारंवार झगडावे लागते, हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !! इथे नीतीमत्तेची रोजच होळी केली जातेय, जातीच्या धर्माच्या आधारावर उचनीच ठरवले जातेय, तरी जो तत्वांना जागतो त्याला षंढ ठरवले जातेय, हे जीवन एक महाभारत झालेय हे भाऊ !! इथे स्वार्थासाठी जो तो हपापलाय, माझे माझे करताना परिवार माञ विसरलाय, दूरदूरवर पसरलाय अन्याय, न्याय माञ कुठेतरी हरवलाय, हे जीवन एक महाभारतच हे भाऊ !! मानसन्मान हेवेदावे हे रोजचेच पाहुणे झालेत, शकुनी तर माणसा माणसात ढीगाने सापडायला ला