Skip to main content

जीवनमान

ईशावास्य उपनिषदातला शांतीमंत्र

लेखक विवेक ठाकूर यांनी रविवार, 24/04/2016 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
वैकुंठ विद्युत दाहिनीच्या प्रवेशव्दाराशी लावलेल्या ईशावास्य उपनिषदातल्या या शांतीमंत्राचा अर्थ... ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः॥ तिथे लिहीला जावा अशी विनंती तिथल्या मुख्य स्टाफपैकी एकानं केली. जेणे करुन या गहन पण अत्यंतिक अर्थपूर्ण मंत्राचा उलगडा, तिथे येणार्‍यांना होईल. थोडक्यात, स्मशानातल्या विदारक मनस्थितीत, लोकांना मृत्यूच्या भयापासून राहत मिळावी असा हेतू आहे. वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे.

बचपन के दिल भुला न देना . २

लेखक शान्तिप्रिय यांनी गुरुवार, 21/04/2016 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
बचपन के दिन भुला न देना ......१ मागील भागात प्राथमिक शाळेतील बालपणीच्या आठवणी झाल्या. आता त्यानंतरचा भाग खेळत बागडत प्राथमिक शाळेची ४ वर्षे कशी गेली ते समजलेच नाही. आणि मग एक दुसरे पर्व म्हणजेच ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात माध्यमिक शाळेचे दिवस सुरु झाले. वस्तुत: आमच्या आधीच्या शाळेत ही ५ वी ते ७वी ची सोय होती पण मोठ्या शाळेचे आकर्षण म्हणुन मी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी आधीची शाळा सोडू नका म्हणुन तेथील शिक्षकांनी खूप विनवण्या केल्या.

स्फुटः संन्यास...

लेखक राघव यांनी मंगळवार, 19/04/2016 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
गृहितक: या विषयावर विचार करतांना भगवंत आहे, सर्व चराचरांत व्याप्त आहे, आणि मनापासून ईच्छा असल्यास साधनमार्गावर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येऊ शकतो.. हे मी गृहित धरलेलं आहे. बर्‍याच दिवसांपासून यावर विचार करतोय, संन्यास म्हणजे काय? तो कशाकरिता घेतात? ज्या ध्येयासाठी घेतात ते संन्यास घेतल्याविना साध्य होणार नाही काय? पण उत्तरांनी समाधान काही होत नाही. प्रत्यक्ष तेवढा प्रखर अनुभव घेतल्याशिवाय समजणारही नाही बहुदा. तरीही मला जे वाटतं ते मांडतो. संन्यस्त होणं म्हणजे सरळ अर्थ काढला तर निवृत्त होणं. कशापासून निवृत्त व्हायचं? जगापासून. का निवृत्त व्हायचं?

..आणि 'ती'ला चर्चच्या गाभार्‍यात प्रवेश हवा आहे !

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/04/2016 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
'मिनु इत्त्यीप्पे' नावाच्या स्त्रीचा स्क्रोल.इन नावाच्या संस्थळावर लेख आला आहे. 'मिनु इत्त्यीप्पे' तिच्या लेखाच्या शीर्षकापासूनच "Why only temples? Even some churches don't allow women into the inner sanctum; Religions continue to discriminate against women in the name of tradition." चर्चमधील स्त्रीयांशी केल्या जाणार्‍या भेदभावा बद्दल तक्रार करते. लेखात तीने दिलेल्या माहितीनुसार ती 'मलंकारा मरथोमा सिरीयन' नावाच्या चर्चशी संलग्न आहे.

देव गाभाऱ्याबाहेर निघाला!

लेखक DEADPOOL यांनी मंगळवार, 19/04/2016 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
शून्य मनाने बसलो होतो गाभाऱ्यात आली ती पलीकडुन! सांगितले कानात येताहेत भेटायला तुला! किती आनंदलो मी! बहुता दिसा भेट होणार का जन्मासी आलो मी! जगण्याला अर्थ येणार आली ती देवळात निघाली माझ्याकडे येण्यासाठी! आता रिते झाले मन नवे वर्म भरून घेण्यासाठी! थांब कुलटा घणाघात झाला! परंपरा तोडशिल? मुलाला भेटायला! परंपरा आड आली भरल्या डोळ्याने परत निघाली! मुलाला भेटावयाची इच्छा इच्छा अधुरीच राहिली! माता गेली माघारी मुलाचा कोप झाला! आणि परंपरा तोडून देव गाभाऱ्याबाहेर निघाला!

कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क !

लेखक विवेक ठाकूर यांनी शनिवार, 16/04/2016 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
पैसा , वेळ आणि काम ही दैनंदिन टेंशनची तीन प्रमुख कारणं आहेत . काहीही आणि कितीही साधना केली तरी हे तीन प्रश्न सोडवल्याशिवाय जीवनात स्वास्थ येणं असंभव . आपल्या प्रत्येक दिवसाचा सगळा प्राईम टाईम याच तीन गोष्टींवर व्यतीत होत असतो . तस्मात , या तीन आयामात मजा आली तर जगण्यात आपसूक मजा येते . या तीन डायमेंन्शसपैकी काम सेंट्रल आहे कारण वेळ आणि पैसा त्याच्याशी निगडित आहेत . थोडक्यात काम नसेल ( उदा . रविवार ) तर वेळ आणि पैसा दुय्यम ठरतात .

तू फूल कुणाचे देखणे?

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 15/04/2016 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा! रुजताना होईल अंत नसेल कोणास खंत तू जीव कुणा मायेचा? जा निघून हलक्या पायाने.... तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू..... -शिवकन्या

सांधीकोपरं

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 14/04/2016 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
बाई मरुन गेली. अन घराचं सांधीकोपरं काळवंडलं. मधल्या वाश्याच्या खोबणीत एका भुंग्यानं साम्राज्य थाटलं. लाकडाची भुकटी करुन मग आत खोलवर पसरवलं. खालच्या आड्याला काळ्या कातळाचं गठळं साचलं. सुर्य सकाळी उगवायचा अन पारुश्या घरात येऊन तापायचा. त्याच्या रोगट उन्हाचा सडा छपरा-भिंतीवर पडायचा. म्हातारी आपलं भुंडं केस विचरत ओट्यावर बसून राहायची. खुडूक कोंबडी सारखी. उघड्या दरवाज्यातनं गांधीलमाशी आत यायची अन वळचणीला जाऊन भिरभिरायची. दिवळीच्या आत तिनं पण भोकं भोकं करुन ठेवलेली. त्यात जाऊन लपायची. एकदा कोळ्याच्या जाळ्यात सापडली अन मरुन गेली. मागे भोकाभोकातली अंडीपिल्ली ठेवून तशीच गेली.

शब्दांच्या, रानातल्या गप्पा!

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 13/04/2016 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
"दादा, तुमची ही कविता जरा समजून सांगाल का. म्हणजे, हे निसर्गचित्रण आहे का यात काही रूपकात्मक शृंगार दडला आहे जो मला नेमका दिसत नाहीये." आणि मग त्यांनी पुढे जे काही त्या कवितेतल्या चित्रणाबद्दल सांगीतले ते ऐकून/समजून माझ्या लक्षात आले की, आपण अजून कविता बुद्रूकलाही जाऊन पोचलो नाहिये, कविता खुर्द हे गाव तर लांबच! कविता होती, "जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ...." आणि कवि अर्थातच, महाराष्ट्राचे 'शेतकवी', कवि ना. धो. महानोर! रविवार दि. १०/४/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजिंठ्याच्या जवळ पळसखेड्याला त्यांना भेटायचा सुवर्णयोग आला होता. भेटतील का नाही? भेटतील तर कुठे? कसे?

शतशब्दकथा : दहशत!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 13/04/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्रीची वेळ .मित्राबरोबर दुकानाच्या पायरीवर गप्पा मारत बसलेलो. दुरूनच एक पांढरी स्कॉर्पिओ येताना दिसली."जरा जास्तच वेडीवाकडी चाललीये " मित्राला बोललो तोवर खाड ..माझ्या गाडीचा बंपर उखडून स्कॉर्पिओ पुढे गेलीसुद्धा.ताडकन उठून मित्राच्या बाईकला किक मारली आणि एकदोन चौक टाकून स्कॉर्पिओ गाठलीच. बाईक आडवी लावली आणि ड्रायव्हरला एकदोन शिव्या हासडल्या.तेव्हढ्यात मागची काच खाली झाली आतमध्ये एक दाढीवाला ,सफेद कपडे ,हातात,गळ्यात जाड चेन घालून ,तो पण फुल टाईट. "कोण रे? काय पायजे? " जरा फाटलीच .