Skip to main content

इतिहास

आज काय घडले... पौष व. ११ न्या. रानडे यांचे निधन

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 14/02/2021 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... पौष व. ११ न्या. रानडे यांचे निधन शके १८२२ च्या पौष व. ११ रोजी हिंदुस्थानांतील सुप्रसिद्ध समाजसुधारक, विख्यात राजकारणी, दूरदृष्टीचे विवेचक व स्वतंत्र भारताचे द्रष्टे न्यायमूर्ति माधव गोविंद रानडे यांचे निधन झाले. राजकीय, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक, आर्थिक इत्यादि अनेक क्षेत्रांत माधवरावांनी मार्गदर्शन केले. हिंदी अर्थशास्त्राचे ते तर जनकच होते. आयुष्यातील शेवटच्या दिवसांतहि यांचे लक्ष सार्वजनिक कार्यात गुंतून.राहिले होते. लाहोरच्या सामाजिक परिषदेस जातां आले नाही म्हणून यांना मनस्वी वाईट वाटले.

पौष व. १० श्रीशिवरायांचा वाढता प्रताप! शके १५८१ च्या पौष व. १० रोजी श्रीशिवराय यांनी चालून आलेले आदिलशाहीचे सरदार रस्तुमजमान व फाजलखान यांचा पराभव केला.

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 07/02/2021 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
पौष व. १० श्रीशिवरायांचा वाढता प्रताप! शके १५८१ च्या पौष व. १० रोजी श्रीशिवराय यांनी चालून आलेले आदिलशाहीचे सरदार रस्तुमजमान व फाजलखान यांचा पराभव केला. अफझलखानाच्या वधानंतर श्रीशिवरायांचे महत्त्व फारच बाढून बादशहाचा एक मोठाच डाव फसल्यासारखा झाला होता. आतां विजापूरकरांच्या ताब्यातील प्रांत व किल्ले सोडविणे हेच एक ध्येय शिवाजी महाराजांच्या समोर होते. २८-११-१६५९ रोजी मोठ्या युक्तीने पन्हाळा किल्ला शिवाजी राजांच्या हातांत आला. या समयी कोल्हापूर प्रांतांत विजापूरच्या एका सुभ्याचे काम रस्तुमजमान नांवाचा सरदार पहात असे. त्याच्या प्रांतांतील पन्हाळा किल्ला फारच मजबूत होता.

आज काय घडले... पौष व.८ "बचेंगे तो और भी लढेंगे!"...

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 07/02/2021 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... पौष व.८ "बचेंगे तो और भी लढेंगे!"... शके १६८१ च्या पौष व.८ रोजी राणोजी शिंद्यांचे पराक्रमी चिरंजीव व पानपतच्या संग्रामांतील आघाडीचे वीर दत्ताजी शिंदे यांचे निधन झाले. सन १७६० च्या ३ जानेवारीस दत्ताजी दिल्लोस आले. स्वतःचे शौर्य व फौजेचा दम यांजवर विश्वास ठेवून अब्दालीस जेर करू असा विश्वास त्यांना होता. यांची बायको भागीरथीबाई हिने नारोपंत, बुंदेले, जनकोजी यांच्यामार्फत यांना युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. पौष व.८ रोजी दत्ताजी फौजेनिशीं गिलच्यावर चालून गेले.

आज काय घडले... पौष व. ७ स्वामी विवेकानंद यांचा जन्म!

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 07/02/2021 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... पौष व. ७ स्वामी विवेकानंद यांचा जन्म! शके १७८४ च्या पौष व. ७ रोजी भारतीय तत्त्वज्ञानाचा सर्व जगभर प्रसार करणारे थोर पुरुष स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. विवेकानंदांची पूर्वपरंपरा अध्यात्मिक वैभवाने नटलेली आहे. 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' या उक्तीप्रमाणे विवेकानंद या श्रेष्ठ व्यक्तीच्या कुलाचा इतिहासहि उज्ज्वल असाच आहे. विवेकानंदांचे आजे बाबू दुर्गाचरण दत्त यांनी ऐन वयांतच संन्यास घेऊन परामार्थवृत्ति स्वीकारली होती. दुर्गाचरणांचे चिरंजीव विश्वनाथ बाबू मोठे विद्वान् होते. त्यांची ज्ञानलालसा अतुलनीय अशीच होती. त्यांची पत्नी भुवनेश्वरी ही देखील आदर्श आर्य स्त्री होती.

आज काय घडले... पौष व.६ भरतपूरचा अजिंक्य किल्ला !

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 07/02/2021 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
bharatpur killa शके १७२६ च्या पौष व. ६ रोजी होळकर आणि जाट यांनी भरतपूर येथे इंग्रजांचा प्रचंड पराभव केला. बाजीराव, शिंदे, होळकर यांची सत्ता संपुष्टांत आणण्याचे अनेक प्रयत्न इंग्रजांनी या वेळी चालू केले होते. दीगच्या लढाईनंतर यशवंतराव होळकर भरतपूरच्या आश्रयास ससैन्य येऊन राहिले होते.

मनोज दाणींच्या पुस्तकातील मागच्या कव्हरवरील चित्रातील तपशील

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 31/01/2021 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
aa श्री.मनोज दाणी यांनी सादर केलेल्या पानिपत पुस्तकातील चित्रांचा परिचय करून घेऊन मला त्यातील काही चित्रे तपशीलात जाऊन भावली. असेच हे चित्र मागील कव्हर स्टोरीचे आहे. पान ३४ - ३५वर या चित्रातील तपशिलाचे वर्णन आहे. त्याशिवाय काही नोंदी सादर. बेगम सामरू (Joanna Nobilis Sombre (ca 1753– 27 January 1836) किंवा सुमरु या साडे चार फुटी टिल्लू बाईंचे बडे प्रस्थ असले पाहिजे.

पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 28/01/2021 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
बनशंकरी मागे पुराणकाळी पृथ्वीवर अवर्षण पडले ते १०० वर्षे चालले. अन् त्यामुळे समस्त मानव प्रजाती अन्नावाचून नष्ट होण्याची भिती निर्माण झाली. मानवाची अन्नासाठी वणवण सूरू झाली.

पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा जिजामाता जयंती

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 28/01/2021 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा जिजामाता जयंती मागे पुराणकाळी पृथ्वीवर अवर्षण पडले अन् समस्त मानव प्रजाती अन्नावाचून नष्ट होण्याची भिती निर्माण झाली. मानवाची अन्नायाठी वणवण सूरू झाली. केवळ मानवच नाही तर सकल प्राणीमात्र अन्नावाचून तडफडू लागला अन् नष्टत्वाच्या फेऱ्यात सापडला. अशा भयाण काळी साक्षात आदिशक्ती जगद्जननी भगवतीचे मातृहृदय तळमळून जागे झाले. आपल्या लेकरांचे दु:ख तिला पाहवेना, सोसवेना. त्याच्या दु:खावर फुंकर घालून ते शांत करण्यासाठी आवश्यकता होती अन्नाची त्यासाठी भगवतीनेच अवतार धारण केला.