मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

आज काय घडले... फाल्गुन व. ३ " श्रीशिवाजी राजे शिवनेरीस उपजले!"

Ashutosh badave ·
लेखनविषय:
shivjanmआज काय घडले... फाल्गुन व. ३ " श्रीशिवाजी राजे शिवनेरीस उपजले!" शके १५५१ च्या फाल्गुन व. ३ रोजी शिवनेरी येथे स्वराज्यसंस्थापक श्रीशिवाजीमहाराज यांचा जन्म झाला. निजामशाहीत मराठ्यांची दोन घराणी प्रसिद्धीस आली : एक भोसल्यांचे व दुसरें जाधवांचें. पैकी शहाजी भोसले आपल्या पराक्रमाने सर्वत्र तळपत राहिले.

आज काय घडले... फाल्गुन व|| २ "आतां मज जाणे प्राणेश्वरासवें !" शके १५७१ च्या फाल्गुन व. २ रोजी महाराष्ट्रांतील विख्यात सत्पुरुष तुकाराम महाराज यांचे निर्याण झाले.

Ashutosh badave ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज काय घडले... फाल्गुन व|| २ "आतां मज जाणे प्राणेश्वरासवें !" शके १५७१ च्या फाल्गुन व. २ रोजी महाराष्ट्रांतील विख्यात सत्पुरुष तुकाराम महाराज यांचे निर्याण झाले. संसारांत संकटपरंपरा निर्माण झाल्यावर मूळचेच परमार्थप्रवण असलेले तुकाराम महाराज परमेश्वराकडे संपूर्ण वळले. कीर्तनकारांच्या पाठीमागे ध्रुपद धरून तुकोबांरायांनी " कांही पाठ केली संतांची उत्तरें.” भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन ज्ञानदेव-एकनाथांच्या वाङ्मयाचे वाचन सुरू केल्यावर त्यांचे चित्त निर्मळ झाले. थोड्याच दिवसांत गुरुकृपा होऊन त्यांना कवित्वाची स्फूर्ति झाली.

आज काय घडले... फाल्गुन व. १ बुक्कराय यांचे निधन !

Ashutosh badave ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज काय घडले... फाल्गुन व. १ बुक्कराय यांचे निधन ! शके १२९९ च्या फाल्गुन व. १ रोजी सर्व हिंदुस्थानांत मुसलमानांचा धुमाकूळ सुरू असतांना दक्षिणेस तुंगभद्रेच्या तीरावर माधवाचार्यांच्या साह्याने विजयनगरच्या वैभवशाली हिंदुसाम्राज्याची स्थापना करणाऱ्या हरिहर आणि बुक्क या बंधूंपैकी बुक्कराय यांचे निधन झाले. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस इस्लामी संस्कृतीच्या टोळधाडी दक्षिणेत धुमाकूळ घालू लागल्या होत्या. शके १२४० मध्ये देवगिरीच्या यादवांचे राज्य बुडाल्यावर थोड्याच दिवसांत तेलंगणांतील वरंगळचे राज्यहि कायमचें नष्ट झाले सर्व दक्षिण भारतांत हिंदूचा पाडाव होऊन मोठी बिकट परिस्थिति निर्माण झाली.

आज काय घडले... फाल्गुन व. १ बुक्कराय यांचे निधन !

Ashutosh badave ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज काय घडले... फाल्गुन व. १ बुक्कराय यांचे निधन ! शके १२९९ च्या फाल्गुन व. १ रोजी सर्व हिंदुस्थानांत मुसलमानांचा धुमाकूळ सुरू असतांना दक्षिणेस तुंगभद्रेच्या तीरावर माधवाचार्यांच्या साह्याने विजयनगरच्या वैभवशाली हिंदुसाम्राज्याची स्थापना करणाऱ्या हरिहर आणि बुक्क या बंधूंपैकी बुक्कराय यांचे निधन झाले. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस इस्लामी संस्कृतीच्या टोळधाडी दक्षिणेत धुमाकूळ घालू लागल्या होत्या. शके १२४० मध्ये देवगिरीच्या यादवांचे राज्य बुडाल्यावर थोड्याच दिवसांत तेलंगणांतील वरंगळचे राज्यहि कायमचें नष्ट झाले सर्व दक्षिण भारतांत हिंदूचा पाडाव होऊन मोठी बिकट परिस्थिति निर्माण झाली.

आज काय घडले... फाल्गुन शु. १५ होळी पौर्णिमेचे रहस्य ! फाल्गुनी पौर्णिमेचा दिवस होळी पौर्णिमा म्हणून भारतात प्रसिद्ध असला तरी स्थानपरत्वें त्याला शिमगा, होलिका, हुताशनीमहोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशी नावे आहेत. या सणाच्या उत्पत्तीसंबंधी एकवाक्यता नाही.

Ashutosh badave ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
holi फाल्गुनी पौर्णिमेचा दिवस होळी पौर्णिमा म्हणून भारतात प्रसिद्ध असला तरी स्थानपरत्वें त्याला शिमगा, होलिका, हुताशनीमहोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशी नावे आहेत. या सणाच्या उत्पत्तीसंबंधी एकवाक्यता नाही. वसंतऋतूच्या आगमनासाठी हा वसंतोत्सव चालू असतो असाही एक समज आहे. उत्तरेतील.लोक हा उत्सव कृष्णाप्तंबंधी मानतात.

फाल्गुन शु. १३ शिवरायांची वाढती सत्ता ! शके १५१६ च्या फाल्गुन शु. १३ रोजी मराठ्यांच्या सैन्याने दंडाराजपुरीस वेढा घातला.

Ashutosh badave ·
लेखनविषय:
आज काय घडले... फाल्गुन शु. १३ शिवरायांची वाढती सत्ता ! शके १५१६ च्या फाल्गुन शु. १३ रोजी मराठ्यांच्या सैन्याने दंडाराजपुरीस वेढा घातला. शिवरायांनी स्वराज्याचा उपक्रम केला, त्याचा जाच बऱ्याच लोकांना झाला. औरंगजेब तर जळफळून गेला. पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीझ लोक व्यापार करीत, त्यांनाहि शिवाजी राजांच्या वाढत्या प्रतापापासून त्रासच होऊ लागला. पाश्चात्य.लोक ज्या शस्त्रविद्येत निपुण होते ती विद्या हस्तगत करण्याची योजना शिवाजी राजांची होती. पोर्तुगीझ, इंग्रज, वगैरे व्यापारी शिवाजी राजांच्या शत्रूला दारूगोळा, हत्यारे,.वगैरे साहित्य पुरवून मदत देत असत.

आज काय घडले ... फाल्गुन शु. १२ दांडी-यात्रेचा प्रारंभ! शके १८५१ च्या फाल्गुन शु. १२ रोजी महात्मा गांधींच्या प्रसिद्ध दांडीयात्रेला प्रारंभ झाला.

Ashutosh badave ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
gandhi भारताच्या विस्तृत किनाऱ्यावर अपरंपार मीठ तयार होत असूनहि या रोज लागणाऱ्या वस्तूवर सरकारला कर द्यावा लागत असे. त्याविरुद्ध गाधींजींनी लढा पुकारला. सरकार दाद देत नाहीसे पाहून सत्याग्रह करण्याचे त्यांनी ठरविले. गुजराथमधील दांडी हे क्षेत्र निवडण्यात आले. फाल्गुन शु.

आज काय घडले... फाल्गुन शु. ११ इंग्रज-मराठे यांच्यांतील पुरंदरचा तह !

Ashutosh badave ·
लेखनविषय:
marathe -ingraj शके १६१७ च्या फाल्गुन शु. ११ रोजी इंग्रज आणि मराठे यांच्यामधील प्रसिद्ध असा पुरंदरचा तह झाला. सुवर्णमय असणाऱ्या भारतांत गोवें आणि उत्तर कोंकण येथे पोर्तुगीझांनी आपले बस्तान स्थिर केले आणि मद्रास व बंगाल इकडे इंग्रजांचा उत्कर्ष होत राहिला.

आज काय घडले... फाल्गुन शु. १० सर ग्रियर्सन यांचे निधन !

Ashutosh badave ·
लेखनविषय:
giyarson शके १८६२ च्या फाल्गुन शु. १० रोजी भारतांतील भाषाशास्त्राच्या अभ्यासाचे जनक, पुरातत्त्ववेत्ते सर जॉर्ज आब्राहम ग्रियर्सन यांचे निधन झाले. वयाच्या तेविसाव्या वर्षी सिव्हिल सर्व्हट म्हणून हे नोकरीत रुजू झाले. तेव्हांपासून ग्रियर्सन आपला वेळ भारतातील भाषा आणि लिप्या यांच्या संशोधनांत घालवू लागले.

आज काय घडले फाल्गुन शु. ९ शिवरायांचे आग्न्यास प्रयाण !

Ashutosh badave ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
shivaji maharaj शके १५८७ च्या फाल्गुन शु. ९ ला श्रीछत्रपति शिवाजीमहाराजांनी रायगडावरील सर्व निवडक मंडळींचा निरोप घेऊन पुत्र संभाजी राजे, कांहीं सोबती व.चार हजार स्वार यांच्यासह औरंगजेबाच्या भेटीसाठी उत्तरेस आग्याकडे प्रयाण केले. जयसिंहाच्या मध्यस्थीने शिवाजी राजे -औरंगजेब यांच्या भेटीचा योग घडून येणार होता.