मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

३५२ वर्षांची तळमळ.....

उदय सप्रे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मि.पा.कर ! आज १४ मे , एका थोर सेनानींची जयंती ! कुणाची हे आपण ओळखले असेलच असे गृहित धरुन लिहित नाही , पण पुढील लेखावरून त्याची सहज कल्पना येईल ! या अद्वितीय योध्द्यास कोटी कोटी प्रणाम ! उदय गंगाधर सप्रे-ठाणे. ३५२ वर्षांची तळमळ..... नमस्कार माझ्या देशबांधवांनो आणि भगिनींनो ! आमचा जन्म आजपासून बरोबर ३५२ वर्षांपूर्वी झाला , आणि आमच्या ध्येयाविषयी किंवा आमच्या कुवतीविषयी काही व्यक्तींना असणार्‍या शंकांमुळे आम्हाविषयी या व्यक्तींनी फक्त गरळच ओकली आहे किंबहुना आमचा एकमेव दोष फार मोठा करून इतिहासाला दाखवला आहे !

सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

पाषाणभेद ·
मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या थोडे आधी सरसगडावर जाण्याचे झाले. मी आणि माझा पालीतला भाचा -शुभम- असे दोघे जण सकाळी ११ वाजता बल्लाळेश्वराचे नाव घेवून घरातून निघालो. छाया. १. निघतांना आम्ही एका बॅगेत खाण्याचे पदार्थ, पाणी आदी. घेतले. छाया. २. गडाखालच्या विस्तीर्ण पठारावर आस्मादिक व शुभम छाया. ३.

बाळासाहेबांनापण कबूल..!

विकास ·
लेखनप्रकार
कसाबचे नवीन वकील अब्बास काझमी, यांनी या अतिरेक्याचे वकीलपत्र घेतले म्हणून त्यांना मुंबईच्या प्रतिष्ठीत इस्लाम जिमखान्याच्या विश्वस्तपदावरुन काढून टाकण्यात आले. या संदर्भात आज बाळासाहेबांनी सामनामधे "हा इस्लाम आम्हालाही कबूल आहे" म्हणून अग्रलेख लिहीला आहे. त्यातील मुद्दे:
  1. अंजली वाघमारे वकीलपत्र घेऊन स्वतःच आधी कोर्टात खोटे बोलल्या होत्या.
  2. महेश भट, शबाना आझमी, मेधा पाटकर, टिस्टा सेटलवाड हे नेहमीचे यशस्वी कलाकार चिडीचूप आहे.

जंजिरा - इतिहास

सुमीत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जंजीरा चा अर्थच मुळी समुद्राने वेढलेला किल्ला, तसा जंजीरा आपल्या स्वराज्या साठी अजेय राहिला. मुरूडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. जंजिरा किल्ला राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटा वर बांधलेला आहे. भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता. या तोफां मध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. जंजिरा स्वतंत्र कोळी राजाच्या सत्तेखाली होता, कदाचित हा शासक जंजिऱ्याचा जनक असला पाहिजे.

कर्नाळा - इतिहास

सुमीत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिसळपाव वर दिड वर्षात पहिल्यांदा लेख प्रकाशीत करत आहे, गड किल्ल्यांचा रंजक इतिहास थोडक्यात वर्णन करावा ह्या हेतूने मी कर्नाळा आणि जंजीरा वर हे लेख लिहून इतर संकेत स्थळां वर प्रकाशित केले आहेत. गेल्या दीड वर्षात वैयक्तीक कारनां मुळे ना मुशाफिर करता आली ना लेखन. आज सहज गप्पा मारताना कैवल्य (धमाल मुलगा) ने हे जुने लेखन पुनःप्रकाशन करण्यास आग्रह केला. पण आता मी पण वेळ मिळेल तसे इतर किल्ल्यांचा इतिहासा बद्दल थोडक्यात लेखन करत राहीन. ===================================================== कर्नाळा किल्ल्या बद्दल बऱ्याच लोकांना ठोस माहिती नाही व इतर बऱ्याच ऐतिहासिक वाड:मयात देखील कर्नाळा बद्दल पूर्ण उल्लेख नाही. लोकांना कर्नाळाची तोंडओळख आहे ती पक्षी अभयारण्य म्हणून पण ह्या किल्ल्याने देखील ईतिहासात बऱ्याच लढाया पाहिलेल्या आहेत. कर्नाळाचा ईतिहास मी तिथे नमूद केलेल्या फलका वरील मजकुरावरून माझ्या भाषेत लिहितं आहे. प्राचीन काळी पनवेल व बोर घाटातून (त्यावेळच्या) मुंबई व चौल बंदराकडे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचा उपयोग होत असे. चौल हे ठिकाण अलिबागच्या पुढे रेवदंडा जवळ मुरूडच्या वाटेवर आहे. तिथून येणारा माल कर्नाळा वरून त्या काळच्या पुणे, ठाणे येथील बाजारपेठेत पोहचवला जायचा. कर्नाळावर देवगिरी यादवांचे १२४८ ते १३१८ पर्यंत राज्य होते, किल्ल्याचे बांधकाम कोणी केले याचा पुरावा दिला नसला तरी देवगिरी यादवांनीच कर्नाळा बांधला असावा. बहुतेक करून महाराष्ट्रातील प्राचीन किल्ल्यां पैकी एक असा बहुमान कर्नाळ्याला आपण देऊ शकतो (चुकीची दुरुस्ती करण्यात यावी.). पुढे सन १३१८ ते १३४७ पर्यंत दौलताबादाच्या मुस्लिम शासकाकडे कर्नाळ्याचा ताबा होता. तेव्हा कर्नाळा उत्तर कोंकण म्हणजेच ठाणे व रायगड ह्यांचे मुख्यालय होते.दौलताबाद कडून कर्नाळाचा ताबा गुजरातच्या फौजे कडे गेला. हा गुजराती शासक कोण होता ह्याचा उल्लेख कुठेच नाही आहे, तसा मला पण ह्या बद्दल कोडे आहे कारण गुजराती शासकाने कर्नाळा पर्यंत मारलेली मजल ह्या बद्दल कुठेच अजून पर्यंत वाचनात आलेले नाही. १५४० मध्ये अहमदनगरच्या निजामाने हा किल्ला जिंकला, पण गुजराती शासकाने पोर्तुगीजांच्या साहाय्याने कर्नाळा परत मिळवला. परत एकदा निजाम चालून आला असता गुजराती शासकाने कर्नाळा पोर्तुगीजांना बहाल केला, वसईच्या कॅप्टनने निजामाच्या सैन्याचा वेढा मोडून काढून स्वतःचा अंमल स्थापन केला आणि किल्ल्याच्या संरक्षणार्थ ३०० युरोपियन सैनिक तैनात केले. पुढे पोर्तुगीज व निजाम यांच्या मध्ये झालेल्या मैत्रीच्या तहात वार्षिक १७५० पौंड ह्या ठराविक खंडणीच्या रकमेवर पोर्तुगीजांनी हा किल्ला निजामशहाकाडे सोपविला. एवढा उहापोह पाहिल्या नंतर त्या काळात कर्नाळाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते. निजामशहा कडून मग हा किल्ला मुघलांकडे होता, ह्या बद्दल सविस्तर माहिती मिळाली नाही. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी कर्नाळा मुघलांकडून जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला. मिर्झाराजा जयसिंग बरोबर झालेल्या पुरंदरा च्या तहात कर्नाळ्याचा देखील बळी गेला होता पण लवकरच इतर किल्ल्यां बरोबर कर्नाळ्याचे स्वराज्यात पुनरागमन झाले. महाराजांच्या मृत्यू नंतर औरंगजेबाने कर्नाळा परत जिंकला आणि कर्नाळा पारतंत्र्याच्या साखळदंडा मध्ये जेरबंद झाला. सन १७४० मध्ये पेशव्यांनी कर्नाळ्याला परत स्वराज्यात आणले. १८०३ मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाच्या वतीने गडाचा ताबा घेतला व १८१८ मध्ये स्वतःचा अंमल जाहीर केला. सन १८१८ पर्यंत क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके ह्यांचे आजोबा कर्नाळ्याचे किल्लेदार होते. ह्याच कर्नाळाच्या बेलाग सुळक्याने तरूण वासुदेव ह्यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली आणि ह्या आद्य क्रांतीकाराला एडनच्या तुरंगाची भिंत पण थोपवू नाही शकली.

ऐतीहासीक अजरामर वाक्ये...

अडाणि ·
लेखनप्रकार
काही वाक्ये अशी आहेत कि त्याला फार मोठा इतीहास आहे आणि ती अजरामर झालेली आहेत. मला माहित असलेली काही टंकत आहे, तुम्हिही भर घाला. वाक्यांबरोबर त्यांचा संदर्भ, काल अशी पुरक माहिती पण द्यावी. १. "माझ्या बंधु आणि भगिनींनो" - स्वामी विवेकानंदांचे हे (अर्ध) वाक्य अतिशय प्रसिद्ध् तर आहेच, पण आपल्या भारतिय संस्कॄतीची सर्व जगाला ओळख करून देणारे आहे. स्थळ - शिकागो. २. "I have a Dream" - मार्टीन ल्युथर किंग ह्यांचे हे वाक्य (आणि त्या नंतरचे भाषण) वर्णद्वेषाविरूद्द् चळवळीचा एक मोठा भाग मानला जातो. - स्थळ - वॉशिंटन ३.

नाशिकच्या नररत्नांचे हौतात्म्यशताब्दी वर्ष!

सर्वसाक्षी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिपर्वाचा विसाव्या शतकातील पाया म्हणजे अभिनव भारत. नाशिकच्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे देशकार्य, समर्पित जीवन आणि तेजस्वी बलिदान स्वातंत्र्यसंग्रामात फार मोलाचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडहुन ब्राउनिंगची पिस्तुले पाठविली, पैकी काही नाशिकात पोहोचली. आणि त्या पिस्तुलांचा वापर करायला अनेक कणखर हात सरसावले. लोकशाही व स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या इंग्रजांनी हिंदुस्थानात साम्राज्यशाही, अत्याचार आणि दडपशाही चालविली होती. कुणालाही तुरुंगात धाडायला पुरावे, पंच वगैरेची गरजच नव्हती.

गौडगावचा जाग्रुत मारुती

सनविवि ·
लेखनप्रकार
माझे आई-बाबा दर शनिवारी मारुतीला जातात. मी Agnostic Theist या categoryत मोडत असल्यामुळे मला कधी आग्रह करत नाहीत ते! पण आज म्हटलं, जाऊया आपणपण, तेवढंच सकाळी लवकर उठणं होईल! हे मंदिर अक्कलकोट तालुक्यातल्या गौडगाव (बु.) या गावात आहे. सोलापूरपासून बसने पाऊण तासावर. दर शनिवारी-रविवारी सकाळी ६:२० पासून दर अर्ध्या तासाने बसेस असतात. बरोबर ७ ला पोचलो आम्ही गावात. ४:३० लाच उठावे लागले होते! माझ्या मानाने फ़ार म्हणजे फारच लवकर! पण सकाळच्या ताज्या हवेत बाहेर पडल्यावर सगळा कंटाळा पळून गेला.

शनिवारवाड्याचे रहस्य (कथा)

सागर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मित्रांनो, पुढील कथा मी कॉलेजमधे शिकत असताना लिहिली होती. त्या कथेत माफक बदल करुन मी ही कथा सर्व वाचकांच्या सेवेस सादर करत आहे, वाचकांना विनंती की आपले अभिप्राय जरुर द्यावेत. - सागर ------------------------------------------------------------ शनिवारवाड्याचे रहस्य -१- रात्री मी "पोल्टरगिस्ट" चा शेवटचा शो पाहून निघालो होतो. एखादा हॉरर् चित्रपट पाहून रात्री बारा वाजता रस्त्यावरुन जाणे म्हणजे काय असते? हे सांगून कळणार नाही. मी चित्रपट पाहून जाम घाबरलो होतो...असली भुते-खेते बघायची वेळ आपल्यावर येऊ नये अशी मनोमन प्रार्थना करीत आणि मारुतीचे नाव घेत मी घरी निघालो होतो.

भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग २

सातारकर ·
लेखनप्रकार
भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग १ उत्तर आणि दक्षिणेत फार फरक आहे. उत्तर ही conservative आहे तर दक्षिण पुरोगामी. उत्तर अंधश्रद्ध (superstitious) आहे तर दक्षिण वास्तववादी (rational). दक्षिण शैक्षणिकद्रूष्ट्या पुढारलेली आहे तर उत्तर मागासलेली. दक्षिणेची संस्क्रूती आधुनिक आहे तर उत्तरेची प्राचिन. अशा स्थितीत उत्तरेच वर्चस्व दक्षिण सहन करेल काय. आधीच दक्षिण उत्तरेपासून विभक्त व्हायच्या प्रयत्नात असल्याची लक्षण आहेत. २७ नोव्हेंबर १९५५ च्या टाइम्स ऑफ इंडीया मधे आलेला श्री.