Skip to main content

इतिहास

भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग १

लेखक सातारकर यांनी बुधवार, 15/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी - अमराठी वाद आज अगदी ऐरणीवर आला आहे अस मला वाटत होत. प्रत्यक्षात स्वतंत्र भारताच्या जन्माआधीपासूनच हे भांडण चालू आहे अस एकंदरीत उल्लेखांवरून दिसून येत. कदाचित मिपाकरांना ह्यातल्या बय्राचश्या गोष्टींची माहीती असेल देखील पण मला बहुतेक सगळच नविन होत म्हणून माझ्यासारख्यांसाठी हा लेखन प्रपंच. राज ठाकरेंच्या भाषणात त्यांनी बाबासाहेबांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला होता. त्यांच Thoughts On Linguistic States (१९५५) हे पुस्तक नुकतच वाचल. त्यात त्यांनी ह्या समस्येच्या वेगवेगळ्या बाजूंचा सविस्तर उहापोह केला आहे.

पुस्तक परिचयः कालगणना

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 11/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचयः कालगणना, लेखकः मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, आवृत्ती पहिलीः जुलै २००८, किंमतः रू.२००/- फक्त.
पंचांग आणि खगोलशास्त्र यांचा अतिशय घनिष्ट संबंध आहे. सूर्यनिर्मित ऋतुचक्र किंवा चंद्राचे कलाचक्र यांच्या संयोगानेच पंचांगांची रचना केली जाते. भारतीय पंचांगाचे नाते, आकाशाशी निरंतर जडलेले आहे. म्हणूनच त्यासारखे माहितीदायक पंचांग दुसरे नाही.

शाण्णवशुन्य अंकसंख्या परिमाण (मुळ पानाचे छायाचित्र टाकले आहे)

लेखक मिलिंद यांनी शुक्रवार, 10/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
खालील संख्या तुम्हाला मोजता येईल? आणी हो १००० कोटी (एक हजार कोटी) असं वापरायचं नाही तर एकच परिमाण वापरुन मोजा. १०,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००० मी सांगू का? वरील संख्या आहे - दशअनंत. तुम्ही म्हणाल मला कशी कळली? मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा की कोटी पर्यंत मोजल्यानंतर पुढे किती पर्यंत मोजता येईल? याचे उत्तर कित्येकजण खर्व, निखर्व, अमाप अशी नांवे सांगायचे. पण यांची स्थिती (म्हणजे एकं, दहं प्रमाणे) विचारल्यास मात्र ती कोणालाही सांगता यायची नाही.

३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 02/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
३ एप्रिल हा छत्रपतींचा निर्वाण दिन ! त्या पुण्यश्लोक छत्रपतींचे हे पुण्यस्मरण ! काय वाटत असेल आज त्यांना ? ही कल्पना मांडणारा हा लेख ..... उदय गंगाधर सप्रेअर्पण..... आज ३ एप्रिल २००९ ! या इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे / तारखेप्रमाणे आजपासून ३२९ वर्षांपूर्वी..... शिवरायांचे स्वगत : आज हनुमान जयंती - चैत्र शुध्द पौर्णिमा !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या स्क्रीनसेव्हरचे प्रकाशन

लेखक सागर यांनी शुक्रवार, 27/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा.... चैत्र शुद्ध प्रतिपदा , शके १९३१ (२७ मार्च २००९) छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्दैवत आराध्य दैवत. तर अशा या आराध्याच्या चरणी पुण्यातील संगणक सॉफ्टवेअर कंपनी संकेतस्थळ.कॉम च्या सौजन्याने छत्रपतींच्या जीवनावर आधारीत अशा अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याकरिता शिवमुद्रा.कॉम (http://www.shivamudra.com/) हे संकेतस्थळ आकारास आले आहे. हे संकेतस्थळ छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुरु करण्याची योजना आहे. या संकेतस्थळाने सुरु होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांवर मराठीतील पहिलाच स्क्रीन-सेव्हर प्रकाशित केला आहे.

जगन्नाथाची रथजात्रा

लेखक आळश्यांचा राजा यांनी शुक्रवार, 27/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
जगन्नाथस्वामी नयनपथगामी भवतु मे ।
- जयदेव, गीतगोविंद
उद्यम कमी असला तरी उत्सव साजरे करण्याच्या बाबतीत ओडिया लोकांइतके उत्साही देशात (पर्यायाने जगात) सापडणार नाहीत. ‘बारो मास तेरो पोर्ब’ अशी म्हणच आहे. पोर्ब म्हणजे पर्व – सण/ उत्सवांना इथे पर्व – पर्वणी म्हणतात. वर्षभरात इथे किती सण होतात त्याची यादीच करतोय. प्रत्येक महिन्यात सरासरी तीन-चार तरी असतातच. रथजात्रा हा इथल्या उत्सवांचा राजा. मागे सांगितल्याप्रमाणे इथे ‘य’ म्हणता येत असले तरी बऱ्याच ठिकाणी ‘ज’ वापरला जातो.

जननि कर्मभूमिश्च....

लेखक सुनील यांनी मंगळवार, 17/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आई आणि मातृभुमी ह्या स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत, अशा अर्थाचे सुवचन आपल्याला ठाऊक आहेच. पण मनात एक विचार येतो, जगात असेही काही लोक नक्कीच होऊन गेले असतील की ज्यांनी आपले तन आणि मन स्वतःच्या जन्मभुमीपेक्षाही वेगळ्या अशा कर्मभुमीसाठी वेचले असेल. हरगोविंद खुरानांपासून ते स्वाती दांडेकरांपर्यंत आणि मनमोहन सिंग-अडवाणींपासून ते मुशर्रफ यांच्यापर्यंत अनेक नावे डोळ्यापुढे तरळून गेली. अशी भारंभार नावे जमा होऊ लागली तेव्हा काही चाळण्या लावून नावे गाळून घ्यायची, असे ठरवले. एकूण तीन निकष लावले - १) सदर व्यक्तीने आपल्या कर्मभुमीसाठी काही तरी भरीव, ठाशीव असे योगदान दिलेले असावे.

!!! जाणत्या राजाला मानाचा मुजरा !!!

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 13/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।। नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।। यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।। आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।। धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।। देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।। हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा का

राम आणी वाली

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 09/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर बागडत असताना एका ठिकाणी प्रभु रामचंद्रानी वालीची हत्या करुन कसे अधर्म चरण वगैरे केले आहे ह्याची मनोरंजक कहाणी वाचायला मिळाली. त्यात सितेकडे केलेली अग्नीपरिक्षेची मागणी कशी अन्यायकारक वगैरे होती हे ही वाचायला मिळाले. रामचंद्र हे आधी राजा असल्याने त्यांनी स्वत:चा आदर्श जनतेपुढे घालुन देण्यासाठी त्यांनी सितेकडे अशी अपेक्षा व्यक्त केली असावी काय ? वाली वधाविषयी मात्र खुप बोलायची इच्छा आहे. खरेतर मागे मिपावर हा प्रश्न उपस्थीत झाल्याचे पुसटसे आठवते पण तेंव्हा भवतेक कंटाळ्यामुळे हे येव्हडे सगळे टंकले नाही. आज वेळ मिळाला आहे तर हा राम आणी वाली संवाद तुमच्या पुढे सादर करत आहेत.

तिच्या नजरेतून...

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 08/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
(तीन महिन्यांनी हा संवाद पुढे आणतो आहे. मधल्या काळात तो (माझ्याचलेखी) अनेक रास्त आणि वाजवी कारणांसाठी मांडलेला नव्हता.)
---
थेट काश्मिरातून प्रा. अस्मा जहांगीर (अर्थातच, वास्तव नाव वेगळे) पुण्यात आल्या होत्या, एका अभ्यासासाठी. स्त्रीविषयक मुद्दे हा विषय अभ्यासाचा. स्त्री (आणि पुरूष) ही केवळ जीवशास्त्रीय घटना आहे की, सामाजिक संकल्पना (सोशल कन्स्ट्रक्ट) आहे असा पहिलाच प्रश्न विचारून ही तरुणी अनेकांची दांडी उडवत असावी.