Skip to main content

धर्म

शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश आणि त्याला तात्याचे समर्थन! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 18/10/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजकी ताजा खबर, आजकी ताजा खबर! शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश! :) आणि त्याला हे आमचं समर्थन -
"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही.
अगदी खरं आहे.. आपल्याला तर साला पयल्यापासनंच या शंकराचार्यांचं म्हणणं पटत नाय! हां, आता आपण सर्वमान्य नाय परंतु एक सागतो.

दीपावली शुभेच्छा

लेखक संजीव नाईक यांनी गुरुवार, 15/10/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरिल सर्व सभासदाना हितचिंतकांना, मित्रमंडळींना, वाचकांना ही दीपावली आत्यंतिक सुखसमाधानाची ठरो आणि त्यांच्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य ही दीपावली निर्माण करो, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना... संजीव नाईक http://vastuclass.blogspot.com

राम-कृष्ण तौलनिक मुक्तचिंतन आणि रामाचं अवतारकार्य

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी बुधवार, 07/10/2009 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीविष्णूंच्या दशावतारांपैकी राम आणि कृष्ण हे दोन अवतार सर्वाधिक लोकप्रिय आहेत. महाभारतात अर्जुनाला गीतेचा उपदेश करताना "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति" असं श्रीकृष्णाने म्हटलं आहे. अर्थात धर्मसंस्थापना आणि दुष्कृतींचा नाश ही या अवतारांमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. रामाआधी विष्णूचा "परशुराम" हा अवतार होता. परशुराम चिरंजीव आहे असं मानलंय. मग विष्णूला रामाचा अवतार घेण्याची गरज का पडली असावी? असा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो. या अवतारांमागील ढोबळ उद्दिष्ट जरी एक असलं, तरी त्यात परिस्थितीजन्य फरक होते.

बदल

लेखक प्रभो यांनी रविवार, 27/09/2009 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
कालच घरी आलो दसर्‍यासाठी.

एक पुस्तक वाचताना...

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 20/09/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आंतरजालावरच एका नव्या संवादाला सुरवात झाली होती. मैत्रीच्या वाटेवरची ती पहिली पावलं. अडखळती. स्वाभाविकच चर्चेचा विषय वाचन, श्रवण, दर्शन या गोष्टींचाच. एका प्रश्नाच्या उत्तरात या मित्रानं त्याच्या वाचनाची यादी सहज समोर ठेवली. मोठी. माझं वाचन खूपच कमी. मग आवडलेल्या पुस्तकांचा विषय निघाला. त्या चर्चेतच उल्लेख झाला 'व्यासपर्व'चा. दुर्गाबाईंचं हे पुस्तक आपल्याकडं होतं हे आठवून गेलं. आपल्या संग्रहातील काही, बर्‍याच किंवा अनेक पुस्तकांचं जे होतं तेच या पुस्तकाचंही झालं होतं. ते कपाटातून गायब होतं. ते गायब झाल्याचं आधीही ठाऊक होतंच.

बतावणी!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 11/09/2009 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
स्थ्ळ - वैकुंठ शीन - हातात 'मादक आणी जहाल'चा मग सहजच घेऊन महालात श्री विष्णू पहुडले आहेत ६० इंची एल्सीडीवर प्रोग्रॅम सुरु आहे जोरजोरात हसण्याचे आवाज येताहेत! (महालात प्रवेश करत) नारद : "नारायण, नारायण!" विष्णूंचं लक्ष नाही असं पाहून पुन्हा एकदा मोठ्याने "नाऽऽरायण! नाऽऽरायण!!" टीवीवरची नजर ढळू न देता विष्णू एका हातानेच थांबायची खूण करतात! एवढ्यात कार्यक्रमाचे प्रायोजक 'मिपाकर स्वयंभोचक संघाची' अ‍ॅड सुरु होते आणी विष्णू टीवी म्यूट करतात. "हा हा हा! मेलो मेलो!! कॉकटेल उडाली ..ठ्यॉ!! बसा बसा मुनिवर!!" "काय हे देवा?

कुरुंदवाडचा अनोखा गणेशोत्सव..!

लेखक सुहास यांनी बुधवार, 09/09/2009 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दंगलींच्या आगीत सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी ही शहरे होरपळत असताना कुरुंदवाडच्या गणेशोत्सवाबद्द्लची दूरदर्शनवरची बातमी आठवली. मिरजेपासून २०-२५ किमी अंतरावर असलेल्या या गावात गेली ६० वर्षे पाच मशिदींमध्ये गणपती बसवला जातो. इतकेच नव्हे तर मुस्लिमांचे जे सण (मोहरम, रमजान ईद) या काळात येतात ते या मंडळांतर्फे साजरे केले जातात. इथल्या दर्ग्यात मुस्लिमांपेक्षा हिंदूच जास्त जात असतील..! आंतरजालावर चित्रफित शोधली, पण मिळाली नाही..

गौराई आली माझ्या घरा...

लेखक नाटक्या यांनी मंगळवार, 08/09/2009 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
गौराई कोणाच्या पावलाने आली? 'गौराई सोन्याच्या पावलांनी आली..". गौराई कोणाच्या पावलांनी आली? "गौराई मोतियाच्या पावलांनी आली.." अशा गजरात, चांदीच्या ताटात गौराईचे आमच्या घरात आगमन झाले. गौराई घरी येणार म्हणून आम्ही आरास केली होती. घरात करंज्या/पापड्या करून ठेवले होते. दारात सुबक रांगोळी काढली होती, दाराला तोरण लावलं होतं. दारात लक्ष्मीची पावलं हळदी-कुंकवाने काढली होती. अमेरिकेत घरात सगळीकडे कार्पेट असल्यामुळे घरात मात्र पावलं काढता आली नाहीत. कुळाचाराप्रमाणे चांदीच्या ताटातून गौरीचे मुखवटे घेऊन सौ. घरात आली. दारात हळदी-कुंकू/अक्षता वाहून ओवाळलं. दुधाने पाद्यपुजा केली, भाकर-तुकडा ओवाळून टाकला.

गौरी

लेखक बाकरवडी यांनी शनिवार, 29/08/2009 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती नंतर लगेचच गौरींचे आगमन म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. आमच्याकडेही गौरी बसवण्यात आल्या. परंपरेनुसार आम्ही शाडूच्या उभ्या गौरी बसवतो.सर्व सजावट मी आणि माझ्या भावाने केली. तर पक्वान्नं आई आणि आत्या यांनी केली. रव्याचेलाडू,चकली,करंजी ,मोदक हे सगळे पहील्या दिवशी ! तर गौरीपूजनाच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य होता. आमच्यात गौरी आगमनाच्या वेळी अंगणातील तुळशी वृंदावनापासुन घरात स्वयंपाक खोलीपर्यंत रांगोळीची पाउले काढली जातात आणि त्यानंतर प्रत्येक पावलावर मुखवटे ठेवले जातात.