Skip to main content

धोरण

वाळूचे अर्थकारण

लेखक अभिषेक९ यांनी मंगळवार, 23/10/2012 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
जगाचा इतिहास चाळून बघितला तर, प्रत्येक संघर्षामागे कुठले ना कुठले संसाधन आहे. 'ब्लड डायमंड' चित्रपटात एक संवाद आहे, "Throughout the history of Africa.. whenever a substance of value is found... the locals die in great numbers and in misery.. This was true of Ivory, rubber, gold and oil. It is now true for diamonds..." वरील वाक्य वाळूला देखील लागू आहे. तोच जागतिक कित्ता पण स्थानिक पातळीवर! वाळूचे साठे आहेत ग्रामीण भागात, नदीच्या काठी. पण त्याची गरज आहे नागरी भागात. मागणी-पुरवठ्याचे हे गणित सामन्यांच्या लक्षात यायच्या आधी व्यापारी, बांधकाम व्यावसायिक आणि राजकारण यांची भट्टी जमली.

धोबीपछाड

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 20/09/2012 06:28 या दिवशी प्रकाशित केले.
बोधकथा. तृतीयेला सकाळी सकाळी घरात चौघडा झडला. कारण कन्येन हरतालिकेच व्रत करण्याच . नवं रक्त ते. रगा रगात नुसता बालिशपणा अन आई पप्पा सांगतील त्याला विरोध भरलेला . नुसता आंधळा विरोध ! "अग आत्तापासून करशील तर जरा चांगला नवरा मिळेल" इत्यादी मी. "but why should I pray to God to get a good one? Can't I search it myself?" "अरे ! ऐक जरा आईंच. त्यांना बघा कसा छान नवरा मिळाला ?" सांगायला हव का? अर्थात पतीदेव. छाती चांगली दोन इंच फुगलेली (तरीही पोटाच्या घेराला माग न टाकू शकलेली .) नजरेत खट्याळपणा नुसता उतू चाललेला. "हे बघ असली उदाहरण देऊन तू तीला discourage करतोयस." मी "काय discourage ?

माणुसकी....

लेखक अमितसांगली यांनी रविवार, 16/09/2012 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
न मानला धर्म न मानली जात धरली फक्त माणुसकीची कास कारण हीच आहे माझी वाट ... बेभान उधळणाऱ्या पावसाच्या सरींनी नभी आकाशाच्या इंद्रधनुष्य उमटते माय-माउली मातीतून, मादक सुगंध दरवळतो जणू घेऊनी रूप परिसाचे, सृष्टीचे चराचर उजळिते इथे नसे कधी दुजाभाव, न कधी नरपशुंचा भेदभावाचा घाट, बरसावे आपणही कधीतरी यासवे, हाच मनी ध्यास कारण हीच आहे माझी वाट ... करुनी पैशाला श्वास, लाविली संवेदनांची वाट मारुनी ताव फुशारकीचे, समेटले सोंग सज्जनांचे घेऊनी शिक्षण इयत्तांचे, कातडे पांघरले माणुसकीचे, कातड्यालाच या लावावी आग, हाच मनी ठाव, कारण हीच आहे माझी वाट ...

लष्कर ए तोयबा - उच्चशिक्षित दहशतवादी

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 08/09/2012 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
देशामधे दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आजवर अडाणी, गरीब जनता यामधे सहभागी असेल असा समज होता. पण पुणे स्फोट आणि मुंबई दंगलीच्या पार्श्वभूमीवर बंगलोर, हैद्राबाद येथे पोलिसांनी कारवाई केली. त्यात अटक झालेल्यांमधे अनेक उच्चशिक्षितांचा समावेश आहे.

विशिष्ट अभिजाताच्या मंत्रसमाधीचे प्राक्तन

लेखक शरदिनी यांनी रविवार, 19/08/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
अनन्यशून्या गरळविशिष्टा मंतरलेली चरणप्रतिष्ठा अल्लडढोली धोतरजोडी चित्तरबद्धा जळमंजिष्ठा चपळ्शरीरी आटापीटा अल्फाबीटाग्यामाथीटा शोधनभंजक वरबालंटा कुठे कोणासी सचित्रघंटा अभिजाताची मंत्रसमाधी थिल्लर घोटा अतिकोलांटी कांक्षितबुद्धी धरणललाटी मेंदूक्रांती मेंदूक्रांती शरदिनी १८ ऑगस्ट २०१२ पुणे

मदतीची हाक

लेखक अनिकेत प्रकाश आमटे यांनी बुधवार, 01/08/2012 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्व. बाबा आमटे यांनी आदिवासीं करिता सुरु केलेल्या आमच्या लोक बिरादरी नागेपल्ली येथील प्रकल्पावर नविन डेअरी चे शेड तयार झाले आहे.....जवळपास १५ गाई राहू शकतील एवढे मोठे शेड आहे.....आता नविन गाई घ्यायच्या आहेत....आर्थिक मदत हवी आहे....चांगली गाय ४५ ते ५० हजार रुपयाला मिळते....मदत करायची इच्छा असणाऱ्यांनी माझ्या ईमेल वर संपर्क करावा.... aniketamte@gmail.com

राज ठाकरे यांची 'टोळधाड'

लेखक नर्मदेतला गोटा यांनी बुधवार, 25/07/2012 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या लिहायला फारसे काही सुचत नाही आहे. पण काहीतरी खरडायचे आहे. काय करावे ? म्हणून आता दिसेल ती नवी बातमी मिपावर चिकटवावी असे ठरवले आहे. कुणाचा वाढदिवस, कुणाचे परीक्षेतील यश, कुणाचे लग्न, कुणाचा जन्म हेही मिपावर चिकटवणार आहोत. याही पलिकडील बातमी असेल तर सोन्याहून पिवळे... टोल बाबत सत्य काय ते जनतेसमोर मांडण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी केली होती. त्याप्रमाणे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केल्यानंतर लक्षात आले की मूळ खर्चापेक्षा काहीपट टोल वसूल होत आहे. महाराष्ट्रात सर्वत्र टोल हा गंभीर प्रश्न बनला होता.

मिसळपाव मान्सून सम्मेलन - २०१२

लेखक प्रास यांनी रविवार, 15/07/2012 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
॥ जालिंदरबाबा की जय ॥
जुन्या-जाणत्या, वृद्धानुभवी मिपाकरांच्या आशीर्वादाने आणि नव्या-जाणत्या, होतकरू-तरुण मिपाकरांच्या पुढाकाराने
मिसळपाव धर्म वाढवावा। अवघा हलकल्लोळ करावा॥
या इराद्याने यंदाचे 'मिसळपाव मान्सून संम्मेलन - २०१२' मुंबईच्या पश्चिम दृतगती मार्गावर आयोजित केलेले आहे.

मंदी आली का हो !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 15/07/2012 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवाची गोष्ट. आमचा एक मित्र आहे. नुकतेच त्याचे कॉलेज संपले. नोकरीच्या शोधात आहे. म्हणून त्याचा बायो डेटा एका परीचिताकडे पाठवला. हा परीचित एका बँकींग क्षेत्रासाठी आय टी सर्व्हिस देणार्‍या कंपनीत काम करतो. म्हणाला 'अहो चूकीच्या वेळेला आलात." मागील आठवड्यातच आमच्याकडे काही शे लोकांना नारळ दिला. आम्हालाही नोटीस मिळालीये. निरोप समारंभ ३ महिन्यांनी होणार आहे. म्हणून तो बायोडेटा घेऊन गेलो दुसर्‍या मित्राकडे. त्याचे कम्पनी जागतिक, त्यामुळे बेंचही जागतिक.