दि. १३/०४/२०३५, पुणे, आजचा होमवर्क : मराठी: निबंध लिहा : विषय : परीक्षा असत्या तर......
आज सरांनी हा भंगार विषय निबंध लिहायला म्हणून दिला. मुळात निबंध लिहायचाच का हेच आम्हाला कळत नाही. त्याही पेक्षा मुळात च्यायला लिहायचंच का ? वर्गात या,काय ते बोला आणि घंटा वाजल्यावर जा की..... आम्हाला काय हवं ते आम्ही घेऊ. बाकीचं सोडून देऊ. मुळात भाषा ही काय शिकायची गोष्ट आहे ? आता सायन्स, गणित, कॉम्प्यूटर वगैरे ठीक आहे. पण भाषा ! बोललेलं समजलं समोरच्याला की बास.... त्यात ते काय.... व्याकरण हवंय कोणाला ? पण सरकारला काय समजत नाय असं पप्पा म्हणतातच ना.... इंग्लिश, हिंदी, मराठी आणि शिवाय एक जागतिक भाषा.....