Skip to main content

विरंगुळा

काही ओल्या आठवणी...

लेखक येडाखुळा यांनी सोमवार, 17/05/2010 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार...मिपावरचं पहिलंच लेखन... संभाळून घ्या... सध्या उन्हाळा असह्य झाला आहे. आणि पावसाळ्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत आहोत. मला भटकंतीची आवड असल्याने सध्या मोठी पंचाइत झाली आहे..कुठेही फिरायला जाता येत नाही. सगळं शुष्क वातावरण. जुन्या ट्रेक्स च्या आठवणी मनात पुन्हा पुन्हा येत आहेत आणि उन्हाळा संपल्यावर कधी एकदा बाहेर पडतोय असं झालंय.

कानुन का बेटा...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 17/05/2010 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
"कानुन का बेटा" "मै हर काम कानुन के दायरेमें रहकर करता हूं! कोइ गुनाह भी करता हूं तो इस तरह की कानुन कि कोइ भी दफा उसे गुनाह ना कह सके! कानुन की दफाओंके बीच सुरंग बनाकर कानुन को भी इन्साफ दिलाता हूं मैं! लोग मुझे कानुन का जादुगर कहते है... मगर मै हूं "कानुन का बेटा!" हिंदीचं वेड शाळेत असल्यापासुनच होतं, कदाचित त्यामुळेच वैकल्पिक भाषा म्हणून संस्कृतच्या ऐवजी हिंदी घेतली होती. अगदी दहावी - बारावीलादेखील हिंदीला ९५ च्या पुढे मार्क होते. पुढे पुढे जसे हरिशंकर परसाई, प्रेमचंद, शैल चतुर्वेदी, अशोक चक्रधर हे वाचनात येत गेले तसे हिंदीचे वेड अजुनच वाढत गेले. कॉलेजला आल्यानंतर मात्र टेस्ट बदलत गेली.

मलंग आणि माणुसकी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 15/05/2010 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
काही वेळा आयुष्यात फार गमतीशीर प्रसंग घडतात. पण त्या त्या वेळेस तुम्ही त्या प्रसंगातील अनोखेपण अनुभवू शकालच ह्याची काहीच हमी नसते. आपले आधीचे पूर्वग्रह किंवा समज बदलून टाकायला एखादी घटनाच पुरेशी असते. असाच एक प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबाने अनुभवला. त्याचीच ही कहाणी. माझे आई-वडील फार ''देव-देव'' करणाऱ्यातले नाहीत. जगात ईश्वर आहे, तो सगळीकडे आहे आणि त्याला आपण मानतो अशी त्यांची विचारसरणी. त्यात कोणत्याही प्रथा परंपरांचे अवडंबर नाही. स्वधर्माचा अभिमान आहे पण इतर धर्मांविषयीही यथायोग्य आत्मीयता.

परीक्षा असत्या तर...... एक भयनिबंध!!!

लेखक प्रमोद काळे यांनी शुक्रवार, 14/05/2010 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
दि. १३/०४/२०३५, पुणे, आजचा होमवर्क : मराठी: निबंध लिहा : विषय : परीक्षा असत्या तर...... आज सरांनी हा भंगार विषय निबंध लिहायला म्हणून दिला. मुळात निबंध लिहायचाच का हेच आम्हाला कळत नाही. त्याही पेक्षा मुळात च्यायला लिहायचंच का ? वर्गात या,काय ते बोला आणि घंटा वाजल्यावर जा की..... आम्हाला काय हवं ते आम्ही घेऊ. बाकीचं सोडून देऊ. मुळात भाषा ही काय शिकायची गोष्ट आहे ? आता सायन्स, गणित, कॉम्प्यूटर वगैरे ठीक आहे. पण भाषा ! बोललेलं समजलं समोरच्याला की बास.... त्यात ते काय.... व्याकरण हवंय कोणाला ? पण सरकारला काय समजत नाय असं पप्पा म्हणतातच ना.... इंग्लिश, हिंदी, मराठी आणि शिवाय एक जागतिक भाषा.....

एक प्रसंग - पुण्य लादण्याचा

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 12/05/2010 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो .. उठा .. लवकर उठा" - बायको मला झोपेतून उठवण्यासाठी गदगदा हालवून जागं करत होती. तिच्या आवाजाचा सूर आग लागली आहे किंवा भूकंप झाला आहे अश्या सूचनेसारखा वाटत होता. मी दचकून उठत विचारलं " काय गं ? " "अहो, बाहेर तर या ..गॅलरीत". मी डोळे चोळंत, चष्मा घालून गॅलरीत आलो. " ते पहा अंगणात" ती म्हणाली. अंगणात विशेष असं काहीही दिसलं नाही . फक्त एक कावळा एका बारक्या सरड्याला चोचीत धरून जमीनीवर आपटंत होता. तो सरडा जरा चोचीतून सुटला कि कुंपणाच्या दिशेने धावायचा प्रयत्न करायचा आणि हा त्याला परत धरून उचलून आपटायचा. इथे कुठे काय आहे ? कावळाच तर दिसतोय .. मी " कावळा ? ... अहो चष्मा घातलाय नां ?

'तो'

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 12/05/2010 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
दादरला झालेल्या मराठी ब्लॉगर्सच्या मेळाव्याला हजर राहून मी वाशीला घरी परतत होतो. शिवाजी पार्कहूनच निघणारी बस पकडली आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेल्या राखीव जागेवर स्थानापन्न झालो. शेजारी माझ्याच वयाचे एक गृहस्थ येऊन बसले. बेस्टच्या बसमध्ये शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाबरोबर बोलायची पध्दत नाही. एकाद्या सीटवर आजूबाजूला बसलेल्या दोन व्यक्तींचे बोलणे ऐकू आलेच तर त्या बहुधा आपापल्या सेलफोनवरून निरनिराळ्या लोकांशी बोलत आहेत असे दिसते. माझे तिकीट काढून झाल्यावर मी सुध्दा आपला मोबाईल काढला आणि त्यावरची बटने दाबायला सुरुवात केली.

उद्धव ठाकरे यांचे "महाराष्ट्र देशा" पुस्तक

लेखक पांथस्थ यांनी मंगळवार, 11/05/2010 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमी प्रमाणे यावेळी देखील पुण्यात गेल्यावर अप्पा बळवंत चौकात भटकुन आलो (बायकोला माहेरी सोडायला आणी पुस्तक खरेदि करायला). यावेळी मनाला जरा आवर घालुन निवडक खरेदि केली. कारण दर वेळी २/३ डझन पुस्तकं घेउन येतो आणि नंतर वाचायला वेळच मिळत नाहि. असो. यावेळी एक छान पुस्तक हाती लागले आहे. साधारण पणे ६/७ वर्षापुर्वी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या हवाई छायाचित्रणाचे प्रदर्शन बालगंधर्व मधे पाहिले होते. आपल्या आवडत्या किल्ल्यांची, मंदिरांची, सागरकिनार्‍यांची भिंत भिंत लांबी ऊंचीची स्थिरचित्रे बघुन मी तर थक्क झालो होतो.