Skip to main content

विरंगुळा

न लिहिलेल्या खरडी

लेखक सन्जोप राव यांनी शुक्रवार, 07/05/2010 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविकः खरडवह्या व त्यांचा वापर याविषयी नव्याने काही लिहिण्याची गरज नाही. पण खाली दिलेल्या खरडी कोणीही कुठेही लिहिलेल्या नाहीत. या खरडींचे लेखक प्रत्यक्षात अस्तित्वात असले तरी हे लिखाण पूर्णतः काल्पनिक आहे. खरड लिहिणार्‍याच्या नावाचे फक्त आद्याक्षर लिहिले आहे. ती खरड कुणी कुणाच्या खरडवहीत लिहिली असेल ते ज्याने त्याने ठरवायचे आहे. 'ता' म्हणजे 'ताकभात' समजा वा 'ताडी' समजा. पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना. सदर लेखन गंभीरपणे घेण्यास सक्त मनाई आहे. तसा प्रयत्न करणारे परिणामास 'खुद जिम्मेदार' राहातील याची कृपया नोंद घ्यावी. प्रास्ताविक संपले. टा: ओ काका, तुमचं लक्ष कुठं आहे?

मीटींगा

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 05/05/2010 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
कार्यालयात चालणार्‍या मीटींगा हा एक फार गमतीदार प्रकार आहे. अर्थात यात विविध प्रकारची ज्ञानवाटणी सत्रे (नॉलेज-शेअरींग सेशन्स), दूरध्वनी मीटींगा (कॉल्स), एखाद्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आयोजित केलेली मेंदूवात सत्रे (म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स अर्थात मेंदूला वात आणणारी सत्रे) इत्यादी देखील ग्राह्य धरता येतात. मला नेहमीच खूप लांबलेल्या मीटींगांमध्ये सगळ्यांना येते तशी झोप येत नाही पण कंटाळलेल्या सदस्यांचे निरीक्षण करण्यात खूप मजा वाटते. अर्थात मी देखील कंटाळलो असेल तरच!

मै ऐसा क्यूं हूं?

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 03/05/2010 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून घरात पुस्तकंच पुस्तकं असायची. त्यामुळे मला वाचनाची मुद्दाम सवय लावावी वगैरे लागली नाही कुणाला. मला अगदी लहानपणचं जे आठवतंय त्यापैकी एक असं... रात्रीची वेळ. सगळे जेवायला बसले आहेत. आणि मी काही तरी पुस्तक वाचतो आहे. आई जेवायला बोलवून बोलवून थकली आहे आणि शेवटी आता वाचन पुरे म्हणून एक धपाटा घालून जेवायला नेलं मला. :) बरं पुस्तकं खूप म्हणजे किती असावीत? अक्षरशः घरात माणसांच्या अगदी बरोबरीने पुस्तकांची दाटी असावी. घरात आजोबा, आजी, आई, बाबा, दोन काका, एक आत्या, ताई आणी सगळ्यात लहान मी. एवढी माणसं. प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं.

राजमाची ट्रेनींग कॅम्प - समीट माउंटेनिअर्स (१६,१७,१८ एप्रील, २०१०)

लेखक बज्जु यांनी रविवार, 02/05/2010 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या पालकांशिवाय ३ दिवस दुर रहाण्याची बहुतेक मुलांची ही पहिलीच वेळ होती. मुलं गाडीत निट चढ्तील कि नाही?, नीट रहातील ना? जेवतील कि नाही? रात्रीची रड्णार तर नाहीत ना? अशा शेकडो शंका पालकांना. त्यामुळे १६ तारखेला सकाळी ६.३० ला ठाणे स्टेशनला मुलांना सोडायला आलेल्या पालकांच्या चेहर्‍यावरच जास्त काळजी दिसत होती. मुलं एकदम बिनधास्त. मोहिमेचे आयोजक सुजीत साठे यांनी पालकांना आणि मुलांना सर्व सुचना दिल्या आणि ४१ मुलं आणि १० इन्सट्र्क्टर असे आम्ही ५१ जणं इंटरसिटी एक्स. पकड्ण्यासाठी ५ नं. प्लॅट्फार्म कडे रवाना झालो. रिपोर्टींग साठी पहाटे ६.३० ला ठाणे स्टेशन १ नं.

दंतविहीनांचे दाताळ अनुभव

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 01/05/2010 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
(खालील लेख मी बर्‍याच महिन्यांपूर्वी माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आज मिपाकरांसाठी इथे देत आहे. प्रस्तुत लेखात कोणाची खिल्ली, थट्टा उडवण्याचा मानस नसून आयुष्यातील एका अटळ सत्याकडे विनोदी चष्म्यातून बघण्याचा प्रयत्न केला आहे! :D ) आयुष्यात मला आजवर तोंडाचे बोळके असणाऱ्या माणसांविषयी कौतुक वाटत आले आहे. किती छान दिसतात ते! परंतु मला त्यांच्याकडे बघून गालातल्या गालात हसताना पाहून कोणालाही ही गोष्ट खरी वाटत नाही त्याला काय करावे?

फुकट वेळ असला की हे असं होतं...

लेखक मेघवेडा यांनी शुक्रवार, 30/04/2010 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
किती दिवस झाले मुखपृष्ठावरचा डावीकडचा 'लेखन करा' टॅब खुणावत आहे! आज मात्र मी मनावर घेतलंय. आज मी काहीतरी लिहिणारच! एखादा वैचारिक लेख लिहावा लिहावा असं कधीपासून मनात होतं. मीही विचारवंत होणार! मीही काहीतरी अर्थपूर्ण लिहिणार.. माझ्याही लेखावर प्रतिसादाच्या खिरापती वाटल्या जाणार!! केवळ विचारानंच बघा कसं गारगार वाटतं! मग एका क्षणात भावी विचारवंताच्या मनाला एक विचार हलकेच स्पर्श करून जातो.. कशाला इतका तो प्रपंच? वैचारिक लेख लिहिणं म्हणजे काय विचार करण्याइतकं सोप्पंय होय? शिंप्याने कपडे शिवावे- ते त्याचं काम, धोब्याने ते धुवावे.. ('ते' म्हणजे कपडे..

नैनिताल : एक काकडलेला अनुभव

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 29/04/2010 02:27 या दिवशी प्रकाशित केले.
नैनिताल म्हटले की डोळ्यांसमोर येते विशाल पर्वतराजी, नेत्रसुखद निसर्ग, मनाला आल्हाद देणारे नैनी सरोवर..... बर्‍याच वर्षांपूर्वी केलेला माझा नैनितालचा प्रवास म्हणजे या सर्व सुंदर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर बाह्यतः केलेली मौजमजा व अंतर्यामी विचारमंथन असा दुहेरी अनुभव होता. परवाच एका वर्गमित्राने ओर्कुटवर त्या प्रवासाचे व सहलीचे काही फोटोज अपलोड केले आणि ते पाहिल्यावर मनात त्या सहलीच्या स्मृती रुंजी घालू लागल्या. महाविद्यालयाच्या अखेरच्या पर्वातील अभ्यास-सहल म्हणजे सर्व मित्र-मैत्रिणींच्या सोबत धमाल करण्याचा अधिकृत परवानाच जणू! मी व आमच्या वर्गातील सहाध्यायी मित्र-मैत्रिणीही याला अपवाद नव्हतो.

तू माने या ना माने दिलदारा

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 27/04/2010 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेले दोन दिवस मला सूफी गाण्यांनी घेरलंय! असाच कधी अवचित येतो मूड आणि सुरू होते एक अद्भुत स्वरमयी भक्तीयात्रा! ही गाणी अवीट गोडीची, गूढ अर्थांची, आत्मा - परमात्म्याशी संवाद साधणारी तर आहेतच; शिवाय कधी मनुष्याच्या मूर्खतेला शाब्दिक चपराक देणारी तर कधी लडिवाळपणे प्रियतमाचे आर्जव करणारी आहेत. सशक्त, समर्पक शब्दरचना आणि अपार भक्तिभावाने कृतकृत्य करणारे मधुर, हृदयाला हात घालणारे संगीत.... ...