आपला मानुसच्या निमित्ताने
लेखनप्रकार
'आपला मानुस'च्या निमित्ताने
आजच आपला मानुस प्रेक्षागृहात झळकला. सतीश राजवाडे दिग्दर्शित आणि नाना पाटेकर, सुमित राघवन आणि इरावती हर्षे अभिनित हा चित्रपट पहिल्याच दिवशी बघितलाच पाहिजे हे मी कधीच ठरवलं होत. अर्थात त्याच कारण अगदीच स्पष्ट आहे. सतीश राजवाडे सारखा सशक्त दिग्दर्शक साक्षात नाना पाटेकर सारख्या 'नटसम्राट' व्यक्तीला पडद्यावर कसं दाखवतो ही उत्सुकता तर होतीच. पण सोबत तेवढाच सशक्त अभिनय करणारा सुमित राघवन आणि स्वतःच वेगळेपण कायम सिद्ध करत आलेली इरावती हर्षे असे सशक्त कलाकार होते. खरच चित्रपट अप्रतिम जमून आला आहे यात वादच नाही. नानांच्या अभिनयाबद्दल काय बोलणार? ते जितके off screan खरे आहेत तितकेच ते on screan खरे आहेत. सुमित राघवनने मनात होणारी घालमेल अगदी लहान लहान कृतींमधून उत्तम दाखवली आहे. इरावती हर्षेने कुठेही नकारात्मक न होता देखील आपली भूमिका चोख बजावली आहे. अर्थात सुमित कात्रीत सापडल्याच सांगून आणि इरावती नकारात्मक असूनही नाही हे सांगून मी तुमच्या मनातली उत्सुकता वाढवली आहे अशी आशा करते. चित्रपटगृहात जाऊन पाहणायासारखा हा चित्रपट आहे हे नक्की. पण तरीही....
चित्रपट उत्तम जमला असला..... सर्व कलाकारांचा अभिनय A१ असला....... तरीही एकाच पिढीचा काहीसा एककल्ली विचार करून मांडणी आहे आहे अस माझ वय्यक्तिक मत आहे. पाहून आलात की नक्की आपलं मत कळवा.
वाचन
16354
प्रतिक्रिया
0