Skip to main content

विचार

अंधानुकरण

Published on शनीवार, 10/08/2019 प्रकाशित मुखपृष्ठ
"अंधानुकरण" काही वर्षांपूर्वी पाहिलेला एक व्हिडिओ आज पुन्हा बघायला मिळाला, हेच निमित्त. आंधळा माणूस इंग्रजीमध्ये क्रिकेट समालोचन करतो, एवढंच नव्हे तर गर्दीचा आवाज हुबेहूब काढतो. सरावलेला समालोचक असावा अशी शब्दफेकीची शैली. " हे कसं जमवलं? " असं विचारलं असता म्हणतो की रेडिओ व टिव्ही ऐकून ऐकूनच शिकलो, इंग्रजी येत नाही त्यामुळे चूका होण्याची शक्यता आहे. हे सांगताना थोडासा ओशाळल्यासारखा हसतो. असंच एकदा एका सभेनंतर पांढरी काठी टेकवत टेकवत जाणाऱ्या व्यक्तीला पाहिले. त्याच्या अंगाखांद्यावरून सुटलेल्या सभेची गर्दी ओसांडत होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 9923

नृत्यांगना.................... अहं........ नेत्रांगना!!!

Published on शुक्रवार, 09/08/2019 प्रकाशित मुखपृष्ठ
नृत्यांगना.................... अहं........ नेत्रांगना!!! खरं सांगू का माझं नृत्यकलेवर खूप खूप प्रेम आहे. त्यामुळे कोणत्याही चित्रपटातील कलात्मक नृत्याविष्कार मला आकर्षित करतो. मला असं वाटतं की नृत्य म्हणजे केवळ पदंन्यास किंवा हस्ताविष्कार किंवा चेहेऱ्यावरील भाव दाखवणे नाही; तर केवळ एखाद्या बोलक्या डोळ्यांच्या अभिनेत्रीकडून फारशी नृत्यकला अवगत नसताना देखील एक अजरामर गीत आपल्याला मिळतं. हिंदी चित्रपटांमध्ये अशी अनेक अजरामर गाणी आणि मास्टर पिस आहेत की जे कधी त्यातील नृत्यामुळे तर कधी नृत्यांगनेमुळे सर्वश्रुत आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 8055

सेकशन ३७० आणि संस्थानिकांचा तनखा काहि प्रश्न

Published on सोमवार, 05/08/2019 प्रकाशित मुखपृष्ठ
वरवर पाहता दोनही वेगळे विषय ,एक तर देशभक्ती शी निगडित पण साम्य पण बरेच आहेत भारत स्वतन्त्र झाला तेव्हा ह्या दोन्ही अतिरिक्त सोयी मंजूर केल्या तनखा पण एकदा रद्दबातल करायचे विधेयक नामंजूर झाले पण नंतर मंजूर केले ३७० तर बऱ्याच वेळा चर्चा झाली आज गेले संस्थानिकांना तनखा मंजूर केला कारण त्यांनी संस्थाने विलीन केली व फक्त तिजोरीवर ओझे म्हणून रद्द केला केला माननीय इंदिराजी ह्यांकडून ह्या निमित्ताने पडलेले काही प्रश्न १) ज्या संस्थानिकांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला त्यांना पण तनखा का दिला जात होता ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3590

श्रीकृष्ण

Published on सोमवार, 05/08/2019 प्रकाशित मुखपृष्ठ
श्रीकृष्ण (महाभारतातील व्यक्तिचित्रे ) काही वर्षांपूर्वी " महाभारतातील व्यक्तिचित्रे " या लेखमालिकेत भीष्म, द्रौपदी, पार्थ, इ. पांच पात्रांचा; महाभारतात म. व्यासांनी त्यांच्याबद्दल काय लिहले याचा परिचय करून दिला होता. एका विषयावर किती लेख लिहावयाचे व असे लेख किती लांबवावयाचे याबद्दल मीच साशंक असतो त्यामुळे वाचकांचा आग्रह होता तरी थांबलो. पण हेही खरे की श्रीकृष्णाबद्दल लिहले नाही तर "महाभारताबद्दलच " लिहावयाचे राहिले असे म्हणावे लागेल ! कृष्ण व कर्ण समोर ठेवून तर महाभारत लिहले. श्रीकृष्णाविषयी म.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 31778

दिव्यांची कहाणी

Published on शुक्रवार, 02/08/2019 प्रकाशित मुखपृष्ठ
(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) ) ऐका दीपांनो तुमची कहाणी. कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’ ‘काय झाले?’ ‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’ सदाशिवाने सूर्याला बोलावले. सूर्य आला. कैलासाच्या आडच थांबला. कैलासपतीने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही.

याद्या 11712

एक राजकीय सूड : बँकांच्या राष्ट्रीयकरणाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष : दूरगामी वाताहत

Published on गुरुवार, 01/08/2019 प्रकाशित मुखपृष्ठ
Nationalisation Of banks 29 जुलै 1969 रोजी केलेल्या लोकसभेतल्या आपल्या भाषणात इंदिरा गांधी यांनी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची भलामण करताना सांगितले की शेती, निर्यात आणि लघु उद्योगांना चालना देण्याच्या भव्य उद्देशाने हे पाऊल त्यांनी उचलले आहे. स्वातंत्र्यानंतर चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण हा आजवर घेतलेला सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय असावा किंवा कदाचित सर्वात मोठा आर्थिक आघात. प्रत्यक्षात या तीनही क्षेत्रात कितना तीर मारा ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3321

तिहेरी तलाकच्या उंटाला लगाम लावण्यात मोदींना यश

Published on बुधवार, 31/07/2019 प्रकाशित मुखपृष्ठ
मागच्या डिसेंबर महिन्यात 'एका घोषात तिहेरी तलाक' विरुद्धच्या विधेयक निमीत्ताने सुप्रीया सुळेंच्या मांडणीतील निसटत्या बाजू आणि 'वों' च्या ऐस्या (निसटत्या) बाजू या दोन प्रदिर्घ लेखातून विधेयकाच्या बाजूने असलेली माझी भूमिका मांडण्याचा मी प्रयत्न केला होता. त्यावेळी विधेयक लोकसभेत पास झाले तरी राज्यसभेत बहुमताच्या अभावी मोदी सरकारला ते पास करून घेता आले नव्हते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 19035

'पागोळी वाचवा अभियान' शंका आणि समाधान

Published on मंगळवार, 30/07/2019 प्रकाशित मुखपृष्ठ
'पागोळी वाचवा अभियान' हळूहळू पसरत चाललंय. सुरवातीला आम्हाला आमच्या दापोली तालुक्यातूनच त्याबद्दल विचारणा होत होती, परंतु सांगायला आनंद वाटतोय की आता आमच्याकडे सावंतवाडी, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, चीपळूण, म्हसळा, श्रीवर्धन,अलिबाग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली पासून ते पुणे, नाशिक, इंदापूर, जुन्नर, नंदुरबार, शहादा, धुळे, औरंगाबाद, बुलढाणा, सेलू, परभणी, सांगली, कोल्हापूर पर्यंतच्या लोकांकडून ह्या अभियानाबद्दलची माहिती विचारली जात आहे. आतापर्यंत नऊशेपेक्षाही जास्त लोक ह्या अभियानाशी जोडले गेले असून अभियानाची माहिती घेत आहेत आणि इतरांनाही देत आहेत. दिव्याने दिवा लागत आहे.
लेखनविषय:

याद्या 3344

लग्न... सवय, गरज की जुळवून घेणे?!

Published on शुक्रवार, 26/07/2019 प्रकाशित मुखपृष्ठ
लग्न... सवय, गरज की जुळवून घेणे?! कशी गम्मत असते बघा.... लग्न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला विचारलं की तू लग्न करून सुखी आहेस का तर तो/ती नक्कीच म्हणतात की उगाच या फंदात पडलो/पडले. एकटं असणं जास्त सुखाचं असतं.... आणि तरीही या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मुलांनी लग्न करायला हवंच असतं. असे किती पालक असतील जे म्हणतात की बाळा, तू अजिबात लग्न करू नकोस.  अगदी धीट मत मांडायचं तर लग्न हे उमेदीच्या काळात शरीरसौख्यासाठी आणि उतरत्या वयात सोबतीची गरज म्हणून केलं जातं. भावनिक गुंतवणूक - आयुष्य जोडीने जगण्यासाठी - तिचे/त्याचे विचार पटले म्हणून एकत्र येण्याचा निर्णय घेतला.......
लेखनप्रकार

याद्या 6742

शोले चित्रपट ,मिपा च्या नजरेतून ( शुद्धलिखित )

Published on शुक्रवार, 26/07/2019 प्रकाशित मुखपृष्ठ
१) शोले जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा चालला नव्हता ,तो किंवा गेला बाजार हम आपके हैं कौन पण प्रदर्शकानी लग्नाची कॅसेट म्हणून नाके मुरडली होती मिसळपाव वर पण बरेच धागे प्रदर्शित होतात एक दोन दिवस प्रतिसाद नाही मग अचानक रतीब सुरु होतो २) ठाकूर ची सून जया दिवसभर पणत्या मध्ये तेल टाकत असते तसे बरेच लोक जिलब्या टाकत असतात ३) कधी कधी संपादकानेमध्ये ठाकूर ( दुर्गा गोगटे फेम ) शिरतो व यह हाथ नाही फासी का फंदा म्हणून आयड्यांना उडवून टाकतात ४) मग त्या आयड्या ड्यू डाकू बनून धुमाकूळ घ
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 8979