बालकथा
बालकथा १
आजीची वामकुक्षी झाली होती आणि कडेला चार वर्षाच्या अनिशची चुळबुळ चालू होती.
आजी.....कधी उठायचं?
ही बघ उठलेच ....असे म्हणत आजी उठली.
आजी...आजोबा पण उठले...
हो रे बाळा....चल मी तुला आता दुध देते....असे म्हणत आजीने चहासाठी आधण ठेवले.
हे तू काय करतेस?? अनिश चिवचिवतच होता ...
चहा करतेय रे बाळा .....
आजी ..मला पण चहा ....
लहान मुलांनी चहा नसतो प्यायचा.....आजीने डोळे वटारले ..
मग मोठी माणसे का पितात?
हं....आजीबाई द्या आता उत्तर ...असे म्हणत आजोबा स्वयंपाकघरात आले...
बघा....चिमुरडा कसा शब्दात पकडतोय....असे म्हणत आजीने त्याला उचलून घेतले....व त्याची गोड पापी घेतली.
मिसळपाव
पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पंतप्रधान झालेच नसते तर? (पूर्वप्रकाशन “’मैफल’ ई-दिवाळी अंक-परिसंवाद)
लेखक: सुधीर काळे
भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान भारताचे सर्वात निकृष्ट पंतप्रधान?
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हां मी ५ वर्षाचा होतो. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळच्या पहिल्या १० वर्षांच्या खेळ व शाळेच्या अभ्यासाखेरीजच्या कुठल्याच घटना मला आठवत नाहींत. मला साधारणपणे १९५६-५७ पासूनच्या आठवणी आहेत.