Skip to main content

विचार

भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान भारताचे सर्वात निकृष्ट पंतप्रधान?

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 29/10/2019 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
1 पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पंतप्रधान झालेच नसते तर? (पूर्वप्रकाशन “’मैफल’ ई-दिवाळी अंक-परिसंवाद) लेखक: सुधीर काळे भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान भारताचे सर्वात निकृष्ट पंतप्रधान? भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हां मी ५ वर्षाचा होतो. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळच्या पहिल्या १० वर्षांच्या खेळ व शाळेच्या अभ्यासाखेरीजच्या कुठल्याच घटना मला आठवत नाहींत. मला साधारणपणे १९५६-५७ पासूनच्या आठवणी आहेत.

साक्षर, सुशिक्षित कि फक्त उदासीन!

लेखक मालविका यांनी शनिवार, 19/10/2019 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
साक्षर, सुशिक्षित कि फक्त उदासीन आपल्या भारत देशात तरुणांची संख्या खूप आहे . त्यातही मतदान करणारा टक्का तर अधिकच . मतदार हा निवडणुकीपुरता का होईना राजा असतो . पण सध्या माझ्या पाहण्यात काही असे राजे/ राण्या आल्यात जे फक्त साक्षर आहेत, सुशिक्षित नाहीत . दुर्दैवाने हे खरे आहे . तिकडे मोदी ओरडून सांगतायत कि आजच्या युवा पिढीमध्ये भारत बदलायची ताकद आहे. पण मोदी, फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत असताना आपण त्यातला मतदानाचा खारीचा वाटसुद्धा उचलू शकत नाही हि मोठी खंत आहे. दुर्दैवाने त्यांना हे कळत असूनही त्या दृष्टीने पावलं उचलणं त्यांना जमत नाही .

झोपा ग्राहक झोपा...

लेखक आजी यांनी मंगळवार, 15/10/2019 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
मी महिला मंडळाच्या एका पिकनिकला गेले होते. रस्त्यात मी एक दुकान पाहिलं. त्यात अनेक वस्तू होत्या. वेगवेगळी मशिन्स होती. अननसाची सालं काढायचं मशीन, त्याच मशीनमधे त्याच्या गोल चकत्या सुद्धा होत होत्या. बटाट्याच्या चकत्या करायचं मशीन होतं. सुईत दोरा ओवायचं मशीन, पुढच्या १०० वर्षांचं कँलेंडर, सफरचंदाच्या कमळासारख्या पाकळ्या करायचं मशीन. काही विचारु नका. मला इतकी भुरळ पडली की मी हरखून गेले. तो विक्रेता प्रात्यक्षिक करुन दाखवत होता. पिकलेल्या टोमॅटोचे बाहेर रस न सांडता पातळ काप करुन दाखवत होता. त्याचं ते करणं म्हणजे मला अशक्यप्राय चमत्कार वाटत होता.

टेक्नो सॅव्ही..

लेखक आजी यांनी सोमवार, 07/10/2019 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं ज्ञान हे वाळवंटातील एका कणाएवढं आहे" असं प्रत्यक्ष न्यूटन म्हणाला होता. माझं स्वत:चं अज्ञान तर जगातल्या सर्व वाळवंटांइतकं विस्तीर्ण आणि सर्व महासागरांइतकं अथांग आहे. जुनं माहीत आहे पण नवीन काही माहीत नाही. मी मोबाइल वापरते. पण त्याचा उपयोग आलेले फोन घेणे आणि आवश्यक तेवढे फोन करणे एवढाच मी करते. म्हणजे अलीकडेपर्यंत करत होते. आता कसेबसे व्हाट्सऍप वापरते. बस इतकेच. त्याचे काय झाले, मला माझ्या मुलाने वाढदिवसाला नवा फोन घेऊन दिला. कुणीतरी मला प्रश्न विचारला.

मन आणि पृथ्वी

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 05/10/2019 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणे एकदा पृथ्वी मनास, "चल, खेळ एक खेळू, आजमावू आपापली शक्ती खास." ऐसे म्हणुनी पृथ्वी क्षणात खेचे सर्व चेतन,अचेतनास, म्हणे हसुनी," रे मना! तुझ्यासकट ही शरीरांची रास, तुला आकर्षण्या न उरले काही आता, शांत का झालास?" हात जोडोनी सस्मित मन बोले, " माते, तुला हरवण्याची कधीच नव्हती आस, तुझ्या कृपेच्या ओझ्याने दबलेला मी क्षुल्लक अणूमय दास.

१-जी

लेखक आजी यांनी सोमवार, 30/09/2019 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या नातवाच्या मते मी सेकंड, थर्ड वगैरे जनरेशनची नव्हे तर अगदीच फर्स्ट जनरेशनची आहे. म्हणजे १-G म्हणे. तो काय बोलतो त्याचं बरेचदा मला ज्ञान नसतं. तो माझ्या खोलीत येतो ते बिजनेस {मराठीत व्यापार डाव } खेळण्यासाठी. त्यात तो सरळ सरळ मला गंडवतो.

कळावे, लोभ असावा...

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 29/09/2019 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे ३५ वर्षांपूर्वीचा काळ. संगणकाशी माझा अद्याप परिचय झालेला नव्हता. मोबाईल फोन तर स्वप्नातही नव्हते. तेव्हा संदेशवहनासाठी दोन मुख्य साधनांचा वापर प्रचलित होता – एक स्थिर-फोन आणि दुसरे पत्र. फोनचे दर हे आजच्यासारखे किरकोळ नव्हते. त्यामुळे फोनचा वापर विचारपूर्वक आणि मर्यादित असे. परदेशी फोन तर फक्त अत्यावश्यक किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत केले जात. पत्रलेखन विविध कामांसाठी बरेच होई. जसे की व्यक्तिगत, कार्यालयीन, विविध आमंत्रणे, जाहिराती, पत्रमैत्री, इ. महाविद्यालयीन जीवनात मी माझ्या परगावी आणि परदेशात असलेल्या आप्तस्वकीयांना हटकून पत्रे लिहीत असे.

radio ga ga

लेखक क्षितिज जयकर यांनी शुक्रवार, 27/09/2019 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
RADIO GA GA……………… ह्या लेखाचं शीर्षक जरी इंग्लिश मधून असलं तरी ते मराठीत सुद्धा तितकंच सार्थ आहे. रेडिओ गा!!!!! गा!!!!. १९८४ साली QUEEN ह्या ब्रिटिश वाद्यवृंदाने हे गाणं रचनाबद्ध केलं , ते आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्याला रेडिओ वर हमखास ऐकायला मिळतं. मला हा लेख लिहिण्यासाठी जी स्फूर्ती मिळाली ती ह्याच गीतावरून. त्यामुळे सर्वप्रथम ह्या गाण्याबद्दल थोडीशी माहिती देतो. मगाशी लिहिल्याप्रमाणे QUEEN ह्या वाद्यवृंदाचा DRUMMER (त्याला ढोल वादक म्हणणं माझ्या जीवावर येतं) रॉजर टेलर याने ते १९८३ साली प्रथम ते रचनाबद्ध केलं , आणि मग १९८४ साली ते स्वरबद्ध करून सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलं.

ऑब्जेक्षनेबल..

लेखक आजी यांनी सोमवार, 23/09/2019 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी रिटायर होण्यापूर्वी एकूण एकतीस वर्षे रेडिओत नोकरी केली. आकाशवाणीवर असताना कोणते शब्द,वाक्यं, गाणी प्रसारीत होऊ द्यायची याबाबत काटेकोर नियम होते. ते पाळावेच लागत. म्हणजे पाळले नाहीत नाहीतर मेमो मिळत. मग मेमोवर न भागलेल्या केसेसना गांभीर्यानुसार प्रसंगी सस्पेन्शन ही भोगावे लागे. तर ते असो. आता "अबीर गुलाल उधळीत रंग" हा तसा किती रसाळ अभंग आहे की नाही ?! पण तो आम्ही रेडियोवर लावू शकत नव्हतो, कारण त्यात "उंबर्‍यासी कैसे शिवू आम्ही यातीहीन " अशी ओळ आहे.

तुझं माझं जमेना...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 20/09/2019 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या पाच वर्षांत भाजपसोबत सत्तेत असूनही शिवसेनेने भाजपला खूप त्रासच दिला हे खरे आहे. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारतच राहू असे म्हणत ठाकरे व त्यांच्या सेनेने अनेक मुद्द्यांवर सरकारची आणि भाजपची कोंडीच केली. सेनेच्या या आक्रमकपणामुळेच सरकारला आपले काही धोरणात्मक निर्णयही मागे घेणे किंवा रद्द करणे भाग पडले होते, तेव्हा शिवसेना विजयी वीराच्या आवेशांत सरकारवर अंकुश चालवत होती हे वास्तवच आहे. पण तरीही भाजपने किंवा फडणवीस सरकारने शिवसेनेचे आभारच मानले पाहिजेत. ते दोन गोष्टींसाठी...