Skip to main content

विचार

अनामिका

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 04/06/2020 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
मला प्रेम करायला तिने शिकवले. तिरस्कार कसा करावा हे ही मी तिच्याकडूनच शिकलो. तिचे डोळे नेहमी सांगायचे, की नजर बोलकी असते. ती रसिका होती अन् मी मनातला भावतरंग. ती दृश्य तर मी अदृश्य. मला माझ्याच शब्दांत पकडून हरवणे फक्त तिचीच मक्तेदारी होती. तिच्यासाठी माझे शब्दही माझ्याशीच दगा करायचे. आम्ही तासंतास सोबत असायचो. पण मी तिला कधी बोलूच द्यायचो नाही. वाटायचं की तिला असंच जपून ठेवावं. तिच्या जीवाला काही तोशीस नाही पडू द्यावी. मग तिच्या वाट्याचं बोलणं सुद्धा मीच बोलायचो... माझ्याशी. तिच्या नजरेचे वर्णन मी पामराने काय करावे? त्या पाणीदार डोळ्यांत जणू सारा समुद्र सामावलेला असायचा.

प्ले लिस्ट

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 31/05/2020 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
दररोज भेटणारी माणसं आणि प्ले लिस्टमधली गाणी यांच्यात मला कमालीचं साम्य वाटतं. नव्या माणसाला भेटण्याचा अनुभव एखादं नवं गाणं ऐकण्यासारखाच असतो की. कधी ते माणूस/गाणं इतकं भावतं की आपल्या प्ले लिस्ट मध्ये त्यांच एक हक्काचं स्थान तयार होतं. काही गाणी मात्र आपण आयुष्यात एकदाच ऐकतो आणि काही व्यक्तींशी आपला संबंध येतो तो ही आयुष्यात एकदाच. ती गाणी ऐकण्याची किंवा त्या व्यक्तीला भेटण्याची परत इच्छा होत नाही. याचा अर्थ त्या गाण्यात/माणसात काही कमी होतं असा मुळीच नाही. फारफारतर त्यांची आणि आपली 'ट्युनिंग' जमली नाही इतकंच.

ढासळला वाडा

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 29/05/2020 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ:- ढासळला वाडा - कविता ढासळला वाडा नुकतेच गावी जाणे झाले. या असल्या बँकेच्या बदली असणार्‍या गावातल्या एकटे राहण्यामुळे मुळ गावी आताशः जाणे होत नाही. अन त्यात माझी बदली मध्यप्रदेशातल्या गुना या जिल्ह्यातील एका खेडेगावी. खेडेगाव अगदीच आडमार्गाला असल्यामुळे तेथे सामान्य सुविधादेखील नव्हत्या. केवळ प्रमोशन टाळायचे नव्हते म्हणून ही बदली स्विकारली. मोठा दुद्दा मिळाला पण त्यासाठी कुटूंबाला नागपूरलाच ठेवावे लागले. मोठा मुलगा इंजिनीअरींगला नागपूरलाच होता.

लाल पिवळी ब्रेकिंग न्यूज..

लेखक आजी यांनी मंगळवार, 26/05/2020 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या टीव्हीवर नव्या मालिका प्रक्षेपित होत नाहीत, त्यामुळे सगळेच जण बातम्याच बघतात. बातम्या सगळ्या कोरोनाच्याच असतात. "एक मोठी बातमी येतेय" किंवा लालभडक पार्श्वभूमीवर "ब्रेकिंग न्यूज" असं म्हणत प्रत्येक गावात, जिल्ह्यात,मुंबईत, महाराष्ट्रात, भारतात, जगात (कंटाळा आला ना लिस्ट वाचून) रोज किती रुग्ण वाढताहेत, बळी पडताहेत, किती बरे होताहेत, याची आकडेवारी सांगितली जाते. ते महत्वाचं असेल, पण रिपीट रिपीट तेच बघायचा खरंच कंटाळा येतोय हेही खरं. या माध्यमांनीच आपल्याला सतत कुठल्या कुठल्या ब्रेकिंग न्यूज देऊन शेफारून ठेवलंय. आपल्याला आता बातम्यांतही नावीन्य पाहिजे.

वासुकाका

लेखक अभिबाबा यांनी गुरुवार, 21/05/2020 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
वासुकाका आमच्या आधीच्या अर्ध्या पिढीतले. . . आयुष्याच्या अर्ध्यावरच गेले. . . किरकोळ बांधा व सरळ लांब केस.पण जात चाललेले केस मागे घेऊन तेल लावून ते चापून चोपून बसवण्याच्या वासू काकांचा नेहमीचाच खटाटोप. एक पांढरा सदरा व स्वच्छ लेंगा. आपल्या शरीराच्या रंगाशी असलेल कॉन्ट्रास्ट मॅचिंग त्यानी आयुष्यभर बाळगलं, अगदी पांढऱ्या समुद्रावरच्या भागोजी शेठ कीर वैकुंठ धामापर्यंत ! एकूणच वासु काकांचा नीटनेटके राहण्याकडे कल होता.त्यांनी ना कधी कसले व्यसन केले ना कसला शैाक केला.पण नाटके पहाण्याचा छंद मात्र त्यांनी जोपासला.

हाक फोडी चांगुणा..

लेखक आजी यांनी सोमवार, 18/05/2020 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी उठल्या उठल्याच रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी कळली आणि सुन्न व्हायला झालं. कालच म्हणजे "सतरा मे"ला रात्री साडेअकराच्या सुमारास ते गेले. ज्येष्ठ साहित्यिक,नाटककार,रंगकर्मी,राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक अशी त्यांची बहुरंगी ओळख होती. सेवन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. इतके दिवस बातम्यांत ऐकू येणारा कोरोना आता परिचिताला झाला होता. मी तरुण वयात होते. एका दिवाळी अंकात त्यांची "पावसातला पाहुणा" ही कथा छापून आली होती. विलक्षण सुंदर गूढकथा होती ती! मला-आमच्या घरातल्या सर्वांनाच-आवडली होती.

रत्नाकर मतकरी यांना आदरांजली

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 18/05/2020 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
a ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री निधन झालं. नाटकं, बालनाट्यं, कथा, कादंबरी, गूढकथा, सामाजिक लेखन, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध प्रकार त्यांनी लिलया हाताळले. रत्नाकर मतकरींचे लेखन जरी चतुरस्त्र असले तरी मला सर्वात जास्त आवडल्या त्या त्यांच्या गूढकथा. काय एकाहून सरस गूढकथा लिहिल्यात त्यांनी. धारपांच्या भयकथा लेखनात प्रामुख्याने अतिंद्रिय शक्ती, सुपरनॅचरल पॉवर्स असंत.

जातं

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 17/05/2020 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस जात्यात पडतो किंवा टाकला जातो. जातं फिरत राहतं निरंतर स्वत:च किंवा नियंत्याकडून. दोन भागांच्या मध्ये तितकीशी जागा नसते ऐसपैस आणि नसते अगदीच कमी सुद्धा. कुणी सहज सामावून जातो किंवा कुणी अडून बसतो. जातं अडत नाही, फिरत राहतं. स्थिरावलेल्यांची सोलतं कातडी आणि हिसकावून घेतं जास्तीची जागा. फटीतली जागा बदलत राहते आणि बदलतात सोबती, सुख-दु:ख दोन्हींतले. जातं तेच राहतं. मार्ग तोच राहतो पण बदलते गती. दिशा एकच असते नेहमी, वळणं ओळखीची नसतात. जात्याला असतात खाचाखोचा घडवलेल्या किंवा घडलेल्या. त्या अवघड जागा आकार देतात जीवनाला चांगला‌ किंवा वाईट, पण‌ नवा.

'नालंदा विहार' - अंदमान तुरुंगातील अपारंपरिक विद्यास्त्रोत.

लेखक अभिबाबा यांनी शनिवार, 16/05/2020 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
अंदमान - निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेला व आजही तितकाच स्वच्छ व सुंदर असलेला द्वीपसमूह. अरसिकालाही सौंदर्याची प्रेरणा देणारा हा आपला भूभाग; पण काळया पाण्याच्या शिक्षेवर दंडाबेडी घातली असताना अंदमानात पाऊल टाकणाऱ्या बॅरिस्टर सावरकरांना मात्र या ठिकाणी आढळले ते संरक्षणदृष्टया महत्वाचे असलेले हिंदुस्तानचे पूर्वेकडील प्रवेशद्वार. २०१० सालच्या मार्च महिन्यात पोर्ट ब्लेअर येथे झालेल्या स्वा.सावरकर मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अंदमानला जाण्याचा योग आला.