Skip to main content

विचार

जिवनात तानतनाव येवु देवु नका

Published on 03/04/2020 - 17:12 प्रकाशित मुखपृष्ठ
शाळेत जात असणारा लहान बालक असो कि कांलेजमध्यें जाणारा किशोर असो जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत या तणावाचा प्रवेश झालेला आहेच. कोणतेही काम पूर्ण करण्याचा दबाव हळूहळू तणावाचे कारण बनते. कामाचा सराव असेल तर काम सहजपणे पूर्ण करता येउ शकते. तणावाची अनेक कारणे असतात. काम करूनहि परिणाम मिळणार कि नाही याबद्दल शंका असणे. यावर उपाय करण्यासाठी विचाराना सकारात्मक दिशा देउन सतत प्रयत्नरत राहून प्रामाणिकपणे कार्य पूर्ण करावे. जीवनात सतत व्यस्त राहावे म्हणजे निरर्थक विचार येणार नाहीत. मनावर कोणताही ताण न घेताही काम पूर्ण करता येऊ शकते. त्यासाठी वेळच्या वेळी व व्यवस्थित काम पूर्ण करावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4796

सोशल डिस्टन्सिंग

Published on 31/03/2020 - 12:05 प्रकाशित मुखपृष्ठ
सोशल डिस्टंन्सिंग एकदा टिळक स्मारकला वसंत व्याखानमालेला गेलो होतो. व्याखान आमच्या मित्राचच. सुरवातीला मी, व्याखाते व आमची एक मैत्रिण असे अनौपचारिक गप्पा संयोजकांशी झाल्या. ऑडिटोरियम मधे गर्दी भरपूर झाली होती. सुरवातीच्या रांगा राखीव होत्या. मैत्रिण तिथे पर्स शेजारच्या खुर्चीवर ठेवून बसली मी तिथे शेजारी बसावे अशा सहजप्रवृत्तीने गेलो. तिने नाईलाजाने पर्स मांडीवर घेतली असावी.( हा आपला अंदाज) काही काळा नंतर तिचे बहुतेक लक्ष लागेना. मग तिने माझ्या उजव्या बाजूला पर्स ठेवून पर्सच्या शेजारी बसली. मगच तिचे लक्ष व्याखानात लागले. मी मनातल्या मनात हसलो. कारण मला एक किस्सा आठवला होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3528

शैलेंद्रच्या निमित्ताने...

Published on 29/03/2020 - 11:42 प्रकाशित मुखपृष्ठ
एका मुलाला ओळखता का? डोंबिवली शहराबाहेरील पाथर्ली गावात शंकराच्या देवळाजवळ एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रहायचा. खाली रस्त्याला लागून त्यांचे दुकान होते. ज्या शाळेला मैदान नाही, स्कुल बस नाही. ते कशाला शाळेला स्वतःची इमारतही नव्हती. शाळेची किल्ली नाही मिळाली म्हणून किंवा धो धो पावसात छत गळत असल्यामुळे सुट्टी देणाऱ्या शाळेत शिकला तो. ४ थी, ७ वी शिष्यवृत्ती नाही, प्रज्ञा शोध परीक्षेचा शोध त्याला लागलाच नव्हता, होमी भाभा हे शास्त्रज्ञाचे नाव एवढीच माहिती होती, त्या नावाने परीक्षा बिरीक्षाही असतात हे काही त्याला ठावं नव्हते.

याद्या 15740

जगण्याला आधार हवा!

Published on 28/03/2020 - 22:35 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रत्येक जिल्ह्याच्या वेशीवर तात्पुरत्या निवारा शेडस उभाराव्यात व परिस्थिती धोकादायक नाही याची खात्री होईपर्यंत त्यांना तेथे आश्रय द्यावा. त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राबवावी. असे केल्यास तात्पुरते आयसोलेशन कॅम्प तयार होतील. गावेही सुरक्षित, गावकरीही सुरक्षित आणि स्थलांतरास निघणारे नागरिकही सुरक्षित राहतील. यंत्रणेवर ताण पडेल, पण अपरिहार्य परिस्थितीत तो गृहितच असतो. त्यालाच डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतात!आ
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1417

मन्त्र,स्तोत्र आणि आपण..

Published on 28/03/2020 - 14:56 प्रकाशित मुखपृष्ठ
श्रद्धा क्रमांक:-१)वेद/पुराण स्तोत्र आणि मंत्रामधून, मंत्रांना असलेल्या स्वरांमुळे येणाऱ्या लहरींचा भौतिक,जैविक स्वरूपाचा परिणाम आपल्या (शरीरावर) होतो श्रद्धा क्रमांक:-२)वेद/पुराण मन्त्र व स्तोत्र म्हटल्यामुळे त्या त्या स्तोत्रा/मंत्रात-असलेल्या देवता विशिष्ट शक्तीच्या स्वरूपात आपल्याजवळ येतात.

याद्या 9947

कथा : जोगवा

Published on 27/03/2020 - 12:32 प्रकाशित मुखपृष्ठ
मानसी लग्न होऊन एका गावी आली. तिला चांगले जमीनदाराचे स्थळ मिळाले. सगळ्यांना खूप कौतुक वाटत होते आणि मामा मामींना समाधान! एका दुर्दैवी अपघातामध्ये तिचे आई वडील गेले, पण ती मात्र वाचली. तेव्हापासून मामा-मामीच तिचे आई-बाबा झाले. ती ही मामाच्या घरात मिसळून गेली. मामाच्या मुलांबरोबर वाढली. मानसी लहानपणापासूनच खूप समजूतदार होत गेली. शाळेत अभ्यासात ती ठीकठाक होती पण तिला खरी आवड होती खेळाची. तिच्या शिक्षकांनी तिची ही आवड हेरून तिला प्रोत्साहन दिले होते. मामानेही तिला दुजोरा दिला होता. खेळ खेळल्यामुळे ती नेहमी उत्साही व प्रसन्न असायची. ती तब्बेतीनेही कणखर व चपळ होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1292

अनया.....

Published on 25/03/2020 - 20:03 प्रकाशित मुखपृष्ठ
एवढं सोपं नसतं आपल्या माणसाला दुस-याचं होताना पहाणं आणि तरीही त्याचं आपलंपण अबाधित ठेवणं.. त्यासाठी मत्सर, असूया, राग अशा अनंत फण्यांनी डसू पहाणा-या कालियाला सतत ठेचावं लागतं.. सहनशीलतेचा गोवर्धन उचलावा लागतो.. जिरवावे लागतात कढ अश्रूंचे, आतल्या आत आणि जगाला दर्शन होतं ते सुहास्यरुपाचं... हात बांधलेले असतात मायेनं, तरी तडफड धडपड होतेच मनाची, उन्मळून पडतात रुढी आणि परंपरांंचे वृक्ष आणि मोकळे होतात अपेक्षांचे आणि हक्कांंचे शापित गंधर्व.. अखंड पुरवत रहावं लागतं प्रेमाचं वस्त्र, उघड्या पडणा-या नात्याची लाज राखण्यासाठी.. अनया, खळखळणा-या धारेच्या खिजगणतीतही नसलेलं आपलं अस्तित्व स्विकारण्याचं बळ कुठू
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2477

तमसो मा ज्योतिर्गमय ...

Published on 22/03/2020 - 16:23 प्रकाशित मुखपृष्ठ
तमसो मा ज्योतिर्गमय ... मुख्याध्यापक केतन कदम सरांनी आपला शाळेचा फेरा संपवला. ते नेहमी शाळेत शाळा सुरु होण्याआधी अर्धा तास शाळेत येत आणि सर्व शाळेत एक फेरी मारीत असत. सगळीकडे अगदी बारीक नजरेने पहात ते आपल्या हातातील एका वहीत आपली निरीक्षणे नोंदवून ठेवीत असत. मग ऑफिसमध्ये गेले की योग्य व्यक्तीला ते ते काम सुपूर्त करत असत . असा त्यांचा दिनक्रम असे. आपण काम केव्हा सांगितले आणि ते केव्हापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे हे पण त्या व्यक्तीशी बोलून ते त्या वहीत ते नोंद करून ठेवीत असत. शाळेच्या पटांगणात दोन तीन महिन्यापूर्वी लावलेल्या झाडांची निगा हा त्यांचा आवडीचा विषय होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1131

कृतघ्न -5

Published on 22/03/2020 - 13:52 प्रकाशित मुखपृष्ठ
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 आता पुढे माऊली विचारात पडला कि या बाबतीत स्वतः हस्तक्षेप करावा कि नाही, रामदास ला तुकाराम च्या भरोश्यावर सोडून द्यावे कि आपण मदत करावी. मुलांच्या आणि बायकोच्या कानावर हि गोष्ट कळली तेव्हा त्यांनी या भानगडीत न पडण्याचा सल्ला दिला. त्यांचं तरी काय चुकीचं होत?? ज्यावेळी संधी होती तेव्हा रामदास ने सर्व विसरून चुकीच्या माणसांना निवडले आणि आता वाईट वेळेत आता आपण कश्याला मदत करावी?

याद्या 10890

स्फुटः आठवणी!

Published on 17/03/2020 - 01:29 प्रकाशित मुखपृष्ठ
काही दिवसांपुर्वीची गोष्ट. नुकताच लग्न झालेला एक कलीग. जाम वैतागून, तावातावानं, "आयुष्यात काय काडीचा रस राहिलेला नाही.." असं वगैरे म्हणत, आम्हा सगळ्यांचं डोकं खात बसला होता. डोकं खात बसला होता असं म्हणण्याचं कारण म्हणजे, कुणी कितीही काहीही सांगितलं तरी याची ऐकायची काही तयारीच नव्हती. थोडक्यात त्याला जागं करणं शक्य नव्हतं! पण [कितीही मदत करायची ईच्छा असली तरी] उगाच ऐकून घ्यायला अन् कचरा डेपो व्हायला कुणाला आवडेल? मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्लॅन बनवला.. दररोज, हा आला बोलायला, की कुणीतरी मागची एखादी चांगली आठवण काढायची आणि सगळ्यांनी मिळून त्यावर दंगा करायचा!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2310