Skip to main content

विचार

(अ)अपूर्ण

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 16/05/2020 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण समाधान किंवा आनंदाची आशा मनुष्याने धरूच नये. किंबहुना त्याची पूर्णत्वाची अपेक्षाच सर्वतया निरर्थक म्हणता येईल. कितीही पैसा असला तरी त्याच्या खर्चाच्या मर्यादा समाजाच्या नैतिक नियमनासमोर उघड्या पडतात. जे भौतिकाला लागु तेच भावनांनाही. प्रेम या प्राथमिक भावनेचा अनुभव कित्येकांना आयुष्याच्या शेवटापर्यंत येत नाही. ज्यांना योग्य वेळी आला त्यांना तो पचवता येतोच असे नाही. दररोज भूक शमवणारं अन्न कधीतरीच, 'व्वा! आज काय मस्त जेवण झालं' असं व्यक्त व्हायला भाग पाडतं. म्हणजे रोजच्या पोटभर जेवणातही या 'मस्त'पणाचा अभाव असतोच! आपल्याला ते सवयीने अंगवळणी पडलंय इतकंच.

कम्फर्टेबल..!!

लेखक आजी यांनी गुरुवार, 14/05/2020 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मला हवी तशी उशी मला अजूनही मिळालेली नाही. माझ्याकडे माझ्या खास बघून आणलेल्या अशा सात उशा आहेत, पण त्यांतली एकही उशी नंतर मला कंफर्टेबल वाटत नाही. मला त्यांतली एकही फायनली पसंत नाही. काही उशा फारच जाड तर काही फारच पातळ. उंच उशी फार उंच होते आणि पातळ उशी फार पातळ होते. दोन पातळ उशा एकमेकांवर ठेवूनही बात बनती नहीं. "मध्यम" उशीही मानेला कंफर्टेबल वाटेलच असं नाही. कुशीवर झोपलं की डोकं आणि खांदा यांत अंतर पडतं आणि मान लटकत राहाते.

श्री सो.डी.माहात्म्य - द्वितीय अध्याय

लेखक अभिदेश यांनी शनिवार, 09/05/2020 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
श्री सो.डी.माहात्म्य -- द्वितीय अध्याय आटपाट नगर होतं. नगरजन खाऊन पिऊन सुखी होते . दर पाच वर्षांनी तिथे नवीन राजा राज्यकारभार सांभाळी . थेट लोकांमधून राजा निवडला जाई. लोकांना कारभार नाही आवडला तर ते नवीन राजा निवडू शकत होते. अशी सगळी आदर्श राज्यकारभाराची पद्धती होती. जणू रामराज्यच. एकदा काय झालं , लोकांनी एका नवीनच स्वर्णकेशी नामक राजाला निवडून दिलं . त्याने निवडून आल्या आल्याच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली.

श्री सो.डी.माहात्म्य

लेखक अभिदेश यांनी शुक्रवार, 08/05/2020 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
श्री सो.डी.माहात्म्य अध्याय पहिला कैलास पर्वतावर शंकर पार्वती बसलेले आहेत. मुलं सुद्धा त्यांच्या त्यांच्या उद्योगात . समोर नंदी नेहेमीप्रमाणे आळसावलेलाय . आज अचानक पार्वतीला प्रश्न पडलाय, म्हणाली " हे नाथ, हे मी काय बघतीये. गेले काही दिवस अचानक पृथ्वी वरचे मळभ हटलंय . सगळं कसं स्वच्छ , सुंदर , निर्मळ. हे अचानक असं कसं काय घडलं नाथ ? " शंकरांच्या चेहऱ्यावर हलकेच स्मित उमटलं.

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

लेखक आपला अनिकेत यांनी गुरुवार, 07/05/2020 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

लेखक आपला अनिकेत यांनी गुरुवार, 07/05/2020 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

लेखक आपला अनिकेत यांनी गुरुवार, 07/05/2020 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...

दारू, लॉकडाऊन आणि अर्थशास्त्र

लेखक chittmanthan.OOO यांनी सोमवार, 04/05/2020 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
कोरोनामूळ लोकांचं बातम्या बघायचं प्रमाण लई वाढलंय . त्यात त्या काय सांगशील ज्ञानदान तर पोरसोरस्नी पण बातम्यांचा नाद लावलाय. तस रोजच्याच बातम्या असतील म्हणून टीव्ही लावला बघतोय तर काय कुठलं पण चॅनल लावा नुसत्या दुकानाबाहेर रांगा. तोंडाला मास्क,डोक्याला टोपी आणि हातात आठवड्याचा बाजार करायला लागेल एवढी मोठी पिशवी.दुपारच्या उनात रांगा किलोमीटर लांब गेल्या पण यांनी शिस्त काय सोडली नाही. मास्कने चेहरा झाकला होता पण डोळ्यातलं ते. समाधान तो आनंद कॅमेरामन च्या कॅमेरात कैद होत नव्हता.

सांग सांग भोलानाथ

लेखक शेखरमोघे यांनी सोमवार, 04/05/2020 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असतांना खरंच वाटायचं - सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का - असे विचारल्यावर भोलानाथ बरोब्बर उत्तर सांगू शकेल.  आता विचारावेसे वाटत आहे - सांग सांग भोलानाथ - बिअरचा पाऊस पडेल कां ? नाही, नाही, कोरोना व्हायरसमुळे माझ्या मेंदूवर काहीही परिणाम झालेला नाही - मी पूर्णपणे "होशोहवास के साथ (अविरत हिंदी चित्रपट बघण्याचा लिहिण्यावर मात्र परिणाम झाला आहे )" लिहितो आहे हे  थोड्याच वेळांत तुमच्या लक्षात येईल.  आपण वसंतोत्सव वगैरे करत थंडीच्या दिवसांतून हळूहळू उष्ण काळांत प्रवेशतो.

.....सोडी सोन्याचा पिंजरा

लेखक मी-दिपाली यांनी रविवार, 03/05/2020 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे अकरावी सायन्सवर बायोलाॅजीचं लेक्चर. प्राणीविश्वावर आधारित Kingdom Animalia हा धडा निव्वळ पुस्तकी अंगाने न शिकवल्यास विद्यार्थ्यांच्या मुळात आवडीचा. त्यामुळे अर्धी बाजी जणू मारलेलीच. प्राण्यांचे वर्गीकरण करताना एक सूत्र महत्त्वाचं. जसजसे आपण वर्गीकरण करत पुढे जातो तसतसे नंतरच्या गटातील प्राणी आधीच्या गटातील प्राण्यांपेक्षा शरीररचना,अवयव कार्यपद्धतीच्या दृष्टीने अधिक विकसित झालेले आढळतात.