हि धरती आपल्याला आंदन म्हणून दिल्यासारखी मानवाची वागणूक आहे. ह्या धरतीवर केवळ आणि केवळ मानवाचाच हक्क असल्यागत मानवाची इतर प्राण्यांबाबत क्रूर वागणूक असते. हि क्रूर वागणूक दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. स्वतःच्या सुखासाठी, चवीसाठी, सौंदर्यासाठी मानव हा इतर प्राण्यांचा बळी देताना जराही मागे पुढे पाहत नाही. मुख्यत्वे मांस, दंत, आणि कातडी यासाठी मानव स्वताच्या हव्यासासाठी त्याची हत्या करतो.