विचार
दिनुची प्रेमकथा भाग १
लेखनविषय:
दिनुची प्रेम कहाणी
( एक सत्य कथा )
भाग १
आज दिनु थोडा ऊदास दिसत होता . रवी ने त्याला नाराजीच कारण विचारल पण दिनु आज काहीच बोलत नव्हता मुकाट्याने टेकडीची वाट चढत होता त्याच्या पाठीमागे रवी ,, शेवटी रवीने त्याचा हात पकडला व त्याला खोदुन विचारले तेव्हा कुठे दिनु ने तोंडातुन उच्चार काढला अगदी बारीक आवाजात तो बोलला ' अरे रवी काल तिला बघायला स्थळ आल होतं रे !
ओ हो अच्छा तर हे कारण आहे माझ्या मित्राच्या नाराजीच ,,
अरे रवी तुला मजाक वाटतोय का ? अरे मी तिच्या शिवाय नाही जगु शकत आणि ती तर जीवच देईल कारण कालच ती मला म्हणाली होती .
गप्पा संस्कृती
लेखनविषय:
लेखनप्रकार
"अगं अगं…समोर बघ…लागलं ना गुडघ्याला…!" गप्पांमध्ये रमली ना कि कशाचं म्हणून भान नसतं मिनू ला….अगदी डोळ्यांची बटणं होतात, हाताची बोटं दुखून येतात, खांदे, मान भरून येते…पण जरा म्हणून शुद्ध नाही या मुलीला. काकूंची हल्ली ही नेहमीची कानावर पडणारी तक्रार…चालता चालता हातातल्या mobile वर गुंतलेल्या नजर आणि मनामुळे समोरचं भलं मोठ्ठं टेबलही मिनुला त्या ४.५ इंच mobile स्क्रीन च्या प्रकाशात दिसलं नव्हतं.
टू वॉक ऑर टू जॉग; दॅट इज द क्वेश्चन
टू वॉक ऑर टू जॉग; दॅट इज द क्वेश्चन. चालावं की धावावं हा सवाल आहे. हा सवाल अनेकांना पडतो. मग हा सवाल ते अनेकांना विचारतात. आणि शेवटी आपल्या सोयीनुसार, इच्छेनुसार, इच्छेच्या तीव्रतेनुसार याचं उत्तर आपल्यापुरतं निश्चित करून या सवालावर पडदा टाकतात.
या दोन्हींकडे तटस्थपणे बघितलं की आपल्याला कळतं की अधिक फायदेशीर काय आहे. तरीही व्यक्तीची इच्छा, शारिरिक कुवत, असलेला वेळ, इत्यादी गोष्टीही बघाव्या लागतात. याची सुरुवात कधी, कशी होते ते बघू. उमेदीच्या वयात म्हणजे २० ते ३० वर्षे या काळात बहुतेक जण व्यायाम, आरोग्य या विषयाकडे लक्ष देतात. प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो, पण देतात साधारणपणे.
ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग ३)
भाग १
भाग २
_______________________________________________________________________________________
जी ए आणि त्यांचा ऑर्फिअस तुम्हाला सुरुवातीपासूनच धक्के देऊ लागतात. मी आणि माझ्या मित्रांचा, 'जर फक्त खात्री करायची होती की युरीडीसी येतेय की नाही तर मागे कशाला वळून पहायचे ? फक्त हाक मारायची की, लगेच कळले असते युरीडीसी येतेय कि नाही ते', हा बाळबोध मुद्दा जी एंनी एका फटक्यात खोडून काढला. त्यांचा ऑर्फिअस तर प्लुटोचा निरोप घेऊन वळतो आणि परतीच्या मार्गावर युरीडीसीशी गप्पा मारू लागतो. तो तिला तिच्या मृत्यूपूर्वीच्या जीवनातल्या आठवणी सांगू लागतो. तिच्या सौंदर्याच्या, फुलणाऱ्या फुलांच्या, खळखळ वाहणाऱ्या झऱ्यांच्या, मंजूळ आवाजाच्या पाखरांच्या, तृप्त निसर्गाच्या, आणि आता पुन्हा ते सुगंधी अनुभव गोळा करता येतील अश्या भविष्याच्या.
वळण...
लेखनविषय:
दुपारची वेळ. मी बसची वाट पहात स्टॉपवर उभा होतो. बाजूने वाहनांची भरधाव वर्दळ सुरु होती.
एक आलीशान गाडी उजवीकडून भर वेगात आली. समोरून तितक्याच वेगात पुढे गेली.
पाचपन्नास फूट गेल्यावर करकचून ब्रेक लागला. गाडी हळुहळू पुढे गेली आणि जागा मिळताच यू टर्न मारून वळली.
पुन्हा काही फूटावर वेगात गेली आणि तिथेही गाडीने यू टर्न घेतला.
मी काहीशा रागाने, काहीशा उत्सुकतेनं त्या महागड्या गाडीच्या कसरती पाहात होतो. सत्तरएक लाखाची असावी!
आता ती गाडी संथ गतीने माझ्या दिशेने येत होती.
अगदी माझ्यासमोर येताच थांबली.
डावीकडची काच खाली लयदारपणे खाली गेली...
'नमस्ते साब'...
ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग २)
भाग १
________________________________________________________________________________________
ऑर्फिअसने अट मोडण्याची कारणे आणि ऑर्फिअसच्या कथेचे प्राथमिक आकलन
काही कथा म्हणतात, ऑर्फिअस वेस ओलांडतो आणि मागे बघतो. पण युरीडीसीने वेस ओलांडली नसते. प्लुटो म्हणतो दोघांनी पाताळ लोक सोडून पृथ्वीवर पोहोचायच्या आधी मागे बघितलस, माझी अट मोडली म्हणून युरीडीसीला परत पाताळलोकात यावे लागणार. या कथेप्रमाणे ऑर्फिअस साधाभोळा दिसतो आणि प्लुटो शाब्दिक कसरती करून माणसाला फसवणारा दुष्ट मृत्युदेव दिसतो. यात ऑर्फिअस आणि युरीडीसी दोघंही सहजीवनाची आस असलेले पण नियतीच्या अगम्य चक्रात अडकून देवाकडून फसवले गेलेले प्रेमी जीव दिसतात.
मै तो चला
जसा चंद्र कविच्या मनाला मोहवतो आणि अनेक काव्य निर्माण होतात किंवा अनेक व्यक्ती, घटना आणि घ्येयासक्ती अनेक कथा किंवा कादबंर्यांच्या लेखनाच्या प्रेरणास्थानी असतात.
मला कधी रस्ता या विषयावर लिहाव लागेल अस वाटल नव्हत. रस्ते माणसे किंवा वाहने यांच्या वहातुक सोयीसाठी असतात इतकच मनावर बिंबल होत. एखादा रस्ता नविन झाला म्हणजे आजुबाजुच्या जागेचे भाव वाढतात. नविन दुकाने. व्यावसायीक संस्था त्या रस्त्यावर आपले स्थान पक्के करतात हे ही माहित होत. नविन रस्त्यामुळे अर्थकारणांना चालना मिळते हे ही माहित होत.
जुनाच रस्ता मात्र अर्थकारणांना चालना देतो हे मात्र पिंपरी- चिंचवड मधले रस्ते पाहिले की समजत.
मिसळपाव
.