Skip to main content

समीक्षा

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

आधुनिक संगीत - एक चिंतन !

लेखक चिनार यांनी बुधवार, 25/03/2015 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
बप्पी लहिरी पासून सुरु झालेली आधुनिक संगीतातली क्रांती आता हनी सिंगपर्यन्त येउन स्थिरावली आहे. आधुनिक संगीत म्हणजे नवसंगीत नव्हे. संगीत आणि आधुनिक संगीत हे सर्वस्वी भिन्न विषय आहेत. संगीताची निर्मिती ही शब्द,सूर,लय,ताल, वाद्य ह्यांच्या अभ्यासपूर्ण एकत्रीकरणातून होते. शब्द कसे असावेत, ते ताल,सूर,लय यांचा वापर करून कसे वापरावेत या सगळ्या गोष्टींना संगीतामध्ये नियम आखून दिलेले आहेत. आधुनिक संगीत या असल्या प्रकारांना मानत नाही. शब्द आणि वाद्य ह्यापासून ध्वनीनिर्मीती हा आधुनिक संगीताचा एकमेव उद्देश आहे! त्यातही शब्द एकाच भाषेतले असले पाहिजेत असं काही नाही.

Veer Garjana | वीरगर्जना @ Gudhi Padwa 2015

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 23/03/2015 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
वीरगर्जना ढोल ताशे आणि ध्वज पथक, ठाणे याचा एक सदस्य अशी ओळख सांगताना मला नेहमीच अभिमान वाटतो. जरी वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदा-यांतून सरावाला वेळ मिळत नसला आणि त्यामुळे सध्या वादनात सहभाग घेता येत नसला, तरीही ती ओळख तशीच आहे असं मी मानतो. गुढीपाडव्याच्या आधी व्हॉट्सॅप्प वर फेसबुकवर नववर्ष स्वागत यात्रेतील वीरगर्जनेच्या वादनाचा संदेश फॉरवर्ड करताना मला खूप आनंद होत होता. आणि तो आनंद वीरगर्जना पथकाचं ढोल ताशे वादन ऐकताना कैक पटीने मोठा झाला. दिवसेंदिवस बहरत गेलेला हा तालाचा उत्सव ऐकताना कान, मन धुंद होतं.

पुस्तक परिचय - अमलताश

लेखक पारुबाई यांनी बुधवार, 18/03/2015 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
वनवास, शारदा संगीत सारखी मराठी साहित्यातील अभिजात कलाकृती लिहिणारे लेखक प्रकाश नारायण संत (भालचंद्र दिक्षित) यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नीने, सुप्रिया दीक्षित (पूर्वाश्रमीच्या सुधा नंदगडकर) यांनी लिहिलेले हे आत्मचरित्र. अमलताश हे एका झाडाचे हिंदी नाव आहे. त्याला मराठीमध्ये बहावा असं म्हणतात.लेखिका सुप्रिया आणि त्यांचा नवर्याच्या आवडीचे हे झाड. इंदिरा संत यांची हि थोरली सून. पुस्तकात सुप्रिया यांचे बालपण, तरुणपण, डॉक्टरकीचे शिक्षण, प्रकाश नारायण संत यांच्याबरोबरचे भावविश्व, त्यांचे कौटुंबिक जीवन आणि आयुष्यात आलेले चढउतार या सर्वाचा प्रवास आहे.

पुस्तक परिचय - आग्र्याहून सुटका भाग 2

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 17/03/2015 20:51 या दिवशी प्रकाशित केले.

पुस्तक परिचय - आग्र्याहून सुटका भाग 2

पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्र 3

नव्या प्रमेयाप्रमाणे -

1. शिवाजी महाराजांनी आग्र्याची नजरकैद हवेली 22 जुलैलाच सोडली! 2. महाराज नंतर धौलपुर, ग्वालेर, नरवर, सिरोंज, शिवपुरी, कोलारस, बदरवास करून 15 दिवसाच्या प्रवासात 250 मैल अंतरावर शहादरा गावात सुखरूप पोहोचले. त्यानंतर त्यांनी कळवल्यावर संभाजीराजांना हवेली बाहेर सुरक्षित स्थळी म्हणजे मथुरेला पाठवण्याचे संदेश महाराजांनी दिले. हा गुप्त संदेश 15 ऑगस्टला आग्र्यात मिळाला व सर्व लगेच कामाला लागले.

मेंदुतला माणुस- ग्रंथ परिचय

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 17/03/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
हे पुस्तक माणसातल्या मेंदुवरच नाही तर मेंदुतल्या माणसावरच आहे. म्हणजे पुस्तकाच स्वरुप हे रोजच्या व्यवहारातल मेंदुविज्ञान अस आहे. रंजकता व सुलभीकरण हे वैज्ञानिक आशयाला बाधा आणणारे असते असा गैरसमज जो असतो तो या पुस्तकाने नक्की दूर होतो. पुस्तकाची शैली ही वाचकाभिमुख आहे. चांगले नातेसंबंध जपण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी विज्ञान हे एक साधन आहे अशी लेखकद्वयांची धारणा आहे. को॓हम्‍ हा प्रश्न अध्यात्मात जेव्हढा गहन आहे तेवढाच विज्ञानात. माझ्या जगण्याचे प्रयोजन काय? जाणीव म्हणजे काय? आकलन म्हणजे काय? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपापल्या परीने वैज्ञानिक व तत्वज्ञ करीत आलेले आहेत.

पुस्तक परिचय – आग्र्याहून सुटका भाग १

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 16/03/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.

पुस्तक परिचय – आग्र्याहून सुटका भाग १

लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन,188/2 शनिवार पेठ, पुणे, किंमत रु. 300

शिवरायांचा आठवावा प्रताप !

आज शिवजयंती निमित्ताने शिवाजीरायांच्या एका महत्वाच्या जीवनप्रसंगावर आधारित पुस्तकाचा परिचय करून देत आहे. 1 वरील चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरतीसारख्या ठिसूळ व नरम मिठायांना 60 -70 किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल.

Don't lose out; Work out - पुस्तकाची ओळख

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 04/03/2015 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नुकतंच एक पुस्तक वाचनात आलं. रुजुता दिवेकर यांचं - डोन्ट लूज आउट; वर्क आउट प्रत्येक पानागणिक एखादी ऐकलेली, बोललेली, वाटलेली, गोष्ट समोर येत गेली. 'अरे हेच.... अगदी हेच वाटलेलं...' किंवा 'ऐला मीही असंच म्हणतो...' असं मनाशी वाटल्याशिवाय पुस्तकातला एकही धडा संपला नाही. त्यामुळे हे पुस्तक वाचताना विशेष मजा आली. शीर्षकावरूनच पुस्तकाचा विषय कळतो. वर्काउट, किंवा व्यायामावर भाष्य करणारं हे पुस्तक आहे. व्यायाम महत्वाचा आहे कारण असंख्य जण तो महत्वाचा समजत नाहीत. लेखिकेची या विषयावरील पकड निर्विवाद असून त्याचा प्रत्यय पुस्तकातील मांडणीतून येत रहातो.

लावणी – एक मराठमोळी निशाणी (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 02/03/2015 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
‘टांग टांग टांग धडांग टांग टिक टिक..’ असा ढोलकी-हलगीचा आवाज कानावर पडला की सजग होऊन कान टवकारणार नाही तो मराठी माणूसच नव्हे ! तमाशा आणि खास करून लावणी ही खास ‘मऱ्हाटी’पणाची ओळख. मराठी भाषा लोकप्रिय आणि समृद्ध करण्यामध्ये मोलाचा वाटा आहे, तमाशा आणि त्यातही लावणी या नृत्य-प्रकाराचा. तमाशा ही गेल्या दोन शतकांपासून ग्रामीण मराठी माणसाची सर्वात लोकप्रिय लोक-कला आहे. सुरुवातीला मनोरंजनार्थ सुरु झालेल्या या कलेचा पाहता पाहता विकास होऊन ती सामान्य जन-मानसाच्या मुखात, बोलात सहज रुळून गेली.

झाडी बोली (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

लेखक शरद यांनी रविवार, 01/03/2015 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक भाषेचे "प्रमाण" किंवा "ग्रांथिक" व "बोली" असे दोन भाग आढळून येतात. मराठीत पुण्याच्या आसपास बोलली जाणारी ’पुणेरी" भाषा ही ग्रांथिक मानली जाते. मराठीतील विविध बोली भाषा उदा. कोल्हापुरी, वायदेशी, नगरी, बागलाणी, खानदेशी, अहिराणी, बालेघाटी, वर्‍हाडी, गंगथडी, बैतुली, नागपुरी, मालवणी, कोंकणी, कारवारी इ. आपल्याला (निदान ऐकून तरी) माहीत असतात.व याचीही कल्पना असते की या बोली भाषा महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागांमध्ये प्रचलित आहेत व त्यांची नावे त्या त्या भागांवरून पडली आहेत. उदा. मालवणच्या आसपास बोलली जाते ती मालवणी बोली.