Skip to main content

समीक्षा

'बॅंग बँग' अर्थात् 'संगीत डोक्याला शॉट'

लेखक घाटावरचे भट यांनी रविवार, 12/10/2014 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
हे प्रकरण परवाच पाहाण्यात आलं. आमचं कुटुंब हृतिक रोशनचं प्रचंड फ्यान असल्यानं जाणं भाग होत. त्यामुळे 'आज आपल्याला हे सहन करावं लागणार आहे' या विचाराने आणि जरा धडधडत्या हृदयानेच थेटरात प्रवेश केला. बाकी ज्यांनी हा सिनेमा पाहिलेला नाहीये पण पाहाणार आहेत, त्यांनी पुढे वाचू नये कारण गोष्ट उघड होते वगैरे.... सिनेमा सुरु होतो लंडनमधे.

मी, ग्रेस आणि १० रुपये

लेखक शरद यांनी बुधवार, 08/10/2014 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी, ग्रेस आणि दहा रुपये काय ? ग्रेसच्या कवितेसारखेच दुर्बोध वाटते की नाही ? आता ग्रेस म्हटले की दुर्बोधता आलीच. म्हणजे ग्रेसच्या आधीही मर्ढेकरांनी आपला क्लेम लावला होता पण त्यांचे "पिंपातले ओले उंदीर" आम्ही समीक्षकांच्या मदतीने केंव्हाच समजावून घेतले होते (पचविले म्हणणार होतो पण ओले उंदीर व पचवणे एकत्र आणण्याइतके सत्यकथेचे लेखक नव्हतो ना ! ते जावू दे, सांगत काय होतो ४५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका कंपनीत नोकरीला होतो व कंपनीच्या गाडीतून फॅक्टरीत जात येत होतो. दिवाळीच्या आधी प्रत्येक जण एकेक दिवाळी अंक खरेदी करावयाचा व मग गाडीत त्याची अदलाबदल व्हावयाची. मी सत्यकथा घेत असे.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

बँग बँग

लेखक श्रीरंग यांनी शुक्रवार, 03/10/2014 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच्या काळात, हिंदी चित्रपट हे डोकं घरी ठेवून बघायला जाण्याची गोष्ट आहे, व तत्सम कावा, डोकं वापरून चित्रपट बनवण्याची स्वतःची कुवत नसलेल्या बर्याच चित्रपटकर्त्यांकडून उघडपणे केला जाऊ लागला आहे. त्यांनी हाताशी धरलेल्या समिक्षकांनीपण "करमणूकप्रधान मसालापट" वगैरे विशेषणं लावून या निर्बुध्दपटांना उचलून धरण्याची केविलवाणी कसरत सुरू केली आहे. आजच प्रदर्शित झालेला बँग बँग हा प्रचंड खर्च करून बनवलेला चित्रपट याच मालिकेतील एक. असो.. आधी चित्रपटातील काही चांगल्या गोष्टी : १. हा चित्रपट "किक" इतका वाईट नाही. बस्स. यापलिकडे चांगलं म्हणावसं असं यात खरच काहीच सापडत नाही.

मेणाचा मृत्युंजय भावला

लेखक मारवा यांनी बुधवार, 01/10/2014 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
अरूण कोलटकर हे माझ्या मते मराठीतील महाकवीं पैकी एक आहेत. यांनी ज्या कविता मराठीत लिहीलेल्या आहेत तशा त्यांच्या अगोदर कोणी लिहील्या असतील असे वाटत नाही. त्यांच्या काही कवितांवर अतिशय सुंदर रसग्रहण पुर्वी मिपा वर आलेली आहेत. अनेक अर्थांनी अनोखा असा हा माणुस होता. यांचे कवितेतील अनुभव शैली इमानदारी सारेच काही विलक्षण होते. त्यांची एक विलक्षण कविता जी अतिशय अस्वस्थ करुन जाते तिच्यावीषयी त्याचा अर्थ जसा मला लागतोय तो सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यापुर्वी एक सांगावेसे वाटते की खालील कविते चे आकलन जर काही संदर्भ माहीत असतील तर सुगम होते. अन्यथा कविता क्लीष्ट वाटु शकते.

रटाळ 'फायंडिंग फॅनी'

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 22/09/2014 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
हे परीक्षण चार-पाच दिवस आधी लिहून ठेवले होते. कार्यालयात खूप काम असल्याने अर्धवट पडून होते. कसेबसे पूर्ण करून आज टाकतोय. चित्रपटाप्रमाणेच परीक्षण देखील रटाळ असल्यास उदार अंतःकरणाने क्षमा करावी. यथा पिक्चर, तथा परीक्षण!

पुस्तक : सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू !

लेखक डांबरट यांनी रविवार, 21/09/2014 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
मेनन : संरक्षण मंत्री की परराष्ट्र मंत्री ! (माझ्या अभ्यासाप्रमाणे परराष्ट्राचा मंत्री) आजचा म.टा. मधला सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू या पुस्तकावरचा लेख वाचला. हे पुस्तक मूलतः मेनन यांनी लिहिलेल्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. सामान्यतः आपल्याला या लेखाच्या नावावरून वाटतं की,कोण्या संरक्षण मंत्र्याने हे पुस्तक लिहिले आहे म्हणजे फार काहीतरी खळबळजनक खुलासे असणार.कारण सध्या राजकारणी, किवा तथाकथित नोकरशहा यांनी पुस्तकातून स्फोट करायचा धडाका लावलाय. पण तसे नाही. कारण मेनन सध्या हयात नाहीत. पण राहून राहून कोणाला न कोणाला नेहरू घराण्याबद्दल उमाळा येत असतो.

दहीहंडी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 24/08/2014 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षीप्रमाणेच कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह जोर धरत होता. दहीहंडीसाठी शहराशहरात, गावागावात गोविंदापथकं तयारी करत होती. पण जेमतेम दोन हजार लोकवस्तीच्या सुजाणपूर मधलं चित्रं काही वेगळंच होतं. सरपंचांच्या आदेशानंतर दहीहंडीला एक आठवडा उरलेला असल्यापासूनच गावात हंड्या उभारल्या गेल्या होत्या. गावाच्या प्रत्येक पाड्याची एक हंडी अशा प्रकारे एकूण दहा दहीहंड्या गावात उभारल्या गेल्या. या हंड्या गोपाळकाल्याच्या पाच दिवस आधीपासूनच उभारल्या गेल्या. या हंड्यांची उंची इतकी होती की जिथे लहानात लहान मुलाचाही हात सहज पोचेल. म्हणजे जेमतेम दोन फूट.

जगाच्या कल्ल्याणा संतांच्या विभुती (साईविलास) !!!!!!!!

लेखक विलासराव यांनी शनिवार, 16/08/2014 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या लोकांची या विषयावर टोकाची मते आहेत त्यांनी आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा. सक्ती नाही. प्रतीक्रिया मनमुक्त द्याव्यात जशा उमटल्या तशा. तेवढीच तेवढी तेवढी मुक्ती. शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) जिवनात चढउतार येतच असतात. हार-जीत,सुख-दुख,मान-अपमान, मनासारखे -मनाविरुद्ध काही घडणे अशा विरोधाभासी घटनांची निरंतर साखळी म्हणजे आपले जीवन. म्हणुन घडतय ते १००% आपल्या नियंत्रणात नाही याचा बोध व्हावा यासाठीच साधनावीधी.सोप्या शब्दात सांगायचं तर दोन्हीही विरोधाभासी घटनांमधे मनाचे संतुलन ढळु न देणे. कुठल्याही टोकावर न जाता मध्यम मार्गाने चालणे.